सोमवार, २४ मे, २०२१

शेतकऱ्यांची दशा आणि दिशा

शेतकऱ्यांची दशा आणि दिशा



कृषीप्रधान भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. शेतीचे संगोपन अर्थात काळया मातीतून सोनं  पिकवण्याची धमक भारतीय शेतकऱ्यांमध्ये आहे. अर्थव्यवस्थेचा कणा शेती जरी असली, तरी तिला भक्कम आणि सक्षम ठेवण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्याला आपण कणा म्हटलं, तर काही वावगे ठरणार नाही. शेती, शेतकरी आणि देश म्हणजे भारताच्या आर्थिक, भौतिक आणि सामाजिक ऐक्याचा त्रिवेणी संगम. शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी या व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरा उत्पादन निर्माता स्वतः निर्माण केलेल्या उत्पादनास योग्य मोबदला प्राप्त करू शकत नाही. मोबदला अर्थात नफ्याचा धनी हा दुय्यम स्थान असलेल्या व्यापाऱ्यास मिळत आहे. प्रमुख असणारा व्यवसाय हा आज कनिष्ठ मानला आहे. जिरायती शेतकऱ्यांच्या यामध्ये प्रकर्षाने उल्लेख करावासा वाटतो. वास्तविक पाहता बागायतदार आणि जिरायती शेती करणारा शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक आपत्ती आपण समजू शकतो, परंतु मानव निर्मित मागणीचा तुटवडा करून अमाप पैसा कमवणे, हे व्यापाराचे प्रमुख वैशिष्ट्य. याच व्यापाराला शासनाचा अप्रत्यक्ष पाठिंबा, हे दुर्दैव. 1965च्या  भारत-पाक युद्धानंतर जी परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीवर आधारित तत्कालीन भारताचे पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांनी, "जय जवान, जय किसान" हा नारा दिला होता. शास्त्रीजींनी त्यावेळी या नाऱ्या द्वारे भारतीय लष्कर आणि शेतकरी यांचा गौरव केला होता. स्वातंत्र्याच्या केवळ अठरा वर्षानंतर अशी घोषणा केली, तेव्हा शेती व्यवसायाला चांगले दिवस येणार असे शेतकऱ्यांना वाटले होते. कालांतराने सरकार व सरकारमधील सत्ताधारी लोक बदलली. शेती व्यवसाय सरकारी योजनांपासून वंचित, नव्हे फक्त कागदोपत्री राहीला. भारत देशामध्ये एक ऑगस्ट क्रांती नंतर क्रांतिपर्व सुरू झाले होते. औद्योगिक क्रांति  निर्णायक ठरते. हरितक्रांती, श्वेतक्रांती होत गेल्या. भारतीय शेतीला योग्य असे महत्व प्राप्त झाले. 1965 शास्त्रींच्या गौरव उदगारानंतर भारतीय शेतकरी वंचितच राहिला तो आजपर्यंत. प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळेला शेतकऱ्यांना आश्वासित केले जाते. त्यांच्या पिकांना हमीभाव, योग्य मोबदला मिळवून द्यायचे, अनेक पर्याय खुले करून ठेवले जातात. बिचारा शेतकरी या सर्वावर विश्वास ठेवून आपले अमूल्य मतदान दान करतो. निवडणुका होतात. बहुमतात असणारा पक्ष, सरकार स्थापन करतो. वास्तविक पाहता दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा माणस सत्ताधारी पक्षात असला पाहिजे. पण..पुढची पाच वर्ष आश्वासने हवेतच विरली जातात. प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी आणि त्यांचे प्रयत्न कुठेच दिसत नाहीत. शेवटी पाच वर्ष संपण्या ची वेळ येते, तेेंव्हा मात्र आश्‍वासनांची खैरात पुन्हा केली जाते. दिलेले आश्वासनं कितपत मार्गी लागली याचा कोणीही विचार करत नाही. 

कोरोना महामारी काळामध्ये सरकारने कृषी विषयक कायदा 2020 अमलात आणला. देशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. खास करून पंजाब आणि हरियाणा या शेतकऱ्यांनी तर या कृषिविषयक कायद्याच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. आजही ते आंदोलन सुरूच आहे. सरकार तर सांगते, कायदा शेतकरी उद्धारासाठी आहे. दिल्लीमध्ये चाललेले आंदोलन हे जगाचे लक्ष वेधून घेते. मग या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध का? 


कृषी विषयक कायदा 2020 च्या कायद्याकडे दृष्टिक्षेप टाकूया , 2020 च्या कायद्यामध्ये तीन विधेयके पास करण्यात आली. तीन विधेयकाचे स्पष्टीकरण सरकार देत असताना सांगते हा कायदा कृषी उद्धारासाठी आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिले आहे. असाही उल्लेख केला जातो. केंद्र सरकारने पुढील विधेयके पारित केली १) शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020. २) शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार 2020. ३) अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती ) विधेयक 2020

विधेयक एक, संवर्धन आणि सबलीकरण विधेयक 2020 नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात राहील,परंतु बाजार समिती शिवाय शेतकरी आपला उत्पादित माल   इतर राज्यांमध्ये किंवा बाहेर देशांमध्ये डायरेक्ट विकू शकतो. एवढेच नाही तर शेतकरी स्वतःचा मालमाल ई- ट्रेडींग द्वारे ज्या ठिकाणी जास्त भाव असेल त्या ठिकाणी माल विकू शकेल. 

विधेयक क्रमांक 2,शेतकरी सशक्तीकरण व संरक्षण यानुसार शेतकरी स्वतः व्यापारी, कंपन्या आणि शेतीमालावर प्रक्रिया करून उत्पादन करणाऱ्या उद्योजकांशी जोडला जाईल. त्याद्वारे तो योग्य मोबदला मिळवु शकेल.शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करण्यापूर्वी किंवा एखाद्या पिकाच्या हंगामापूर्वी त्या पिकाची किंमत कंपनी व शेतकरी यांच्या संमतीने ठरवली जाईल. त्यामुळे पेरणी च्या अगोदर मालाची किंमतीबाबत शेतकरी  आश्वासित केला जाईल. यापुढे हा कायदा असं सांगतो ठरल्यानुसार शेतकरी आणि कंपनी यांच्यामध्ये वाद उद्भवल्यास, भावाची हमी आणि बाजार भाव यांच्यामध्ये प्रत्यक्ष भाव न मिळाल्यास निर्माण झालेला तंटा प्रांत अधिकार्‍याकडे सोडवला जाईल. प्रांत अधिकाऱ्याला त्यावर निर्णय देण्यासाठी तीस दिवस असतील. 30 दिवसाच्या आत यावर निर्णय देणे बंधनकारक असेल. प्रांत अधिकार्‍याच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा अधिकार शेतकऱ्याला असेल. त्यानुसार तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकतो. जिल्हाधिकारी सुद्धा 30 दिवसांच्या आतच निर्णय देईल. कंपनीला मात्र उच्च न्यायालयात दाद मागता येणार नाही.शेतकरी मात्र उच्च न्यायालयात दाद मागू शकतो. 

विधेयक क्रमांक तीन नुसार तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कांदा,बटाटा यांना आवश्यक वस्तू कायद्यातून वगळण्यात आले आहे. केंद्र सरकारने एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड याद्वारे एक लाख कोटी साठवणुकीचे गोदाम, कोल्ड स्टोरेज यासाठी प्रयत्न केले आहे. 

वरील तीनही विधेयकांचे अवलोकन केले असता, शेतकरी आंदोलन का पेटले? आणि त्यांच्या समस्या कोणत्या? शेतकऱ्या समोर उपस्थित झालेले प्रश्न असे आहेत. १)कृषी उत्पन्न बाजार समिती संपुष्टात येणार का? सरकारच्या मतानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती संपुष्टात येणार नाही. परंतु तिची एकाधिकारशाही संपुष्टात येईल. समितीला व्यापारया बरोबर स्पर्धा करावी लागेल. तर शेतकऱ्यांना असे वाटते,  कृषी उत्पन्न बाजार समिती संपुष्टात आली, तर त्यांचा माल कंपनी  कवडीमोल भावाने खरेदी करतील,शेतकऱ्यांची पिळवणूक करतील,अशी शंका शेतकऱ्याचे मनात निर्माण होत आहे.हमी भावानुसार सर्व व्यापारी कंपनी माल विकत घेईल. हे कशावरून? तशाप्रकारची लेखी हमी सरकार देत नाही किंबहुना विधेयकामध्ये तशी तरतूद करत नाही. २) शेतकऱ्याची कंपनी आणि व्यापारामधून फसवणूक  होईल का? विधेयका नुसार शेतकऱ्याने विकलेल्या मालाचे पैसे तीन दिवसाच्या आत देणे बंधनकारक राहील, असे जरी असले तरी शेतकऱ्याच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते. तीन दिवसाच्या आत जर पैसे नाही आले किंवा करारानुसार पैसे नाही दिले तर प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या मध्ये वाद सोडवण्यासाठी कित्येक दिवस लागू शकतात तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचे. वाद निर्माण झाला तर प्रांताधिकारी कडे 30 आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे 30 असे एकूण आठ दिवस लागतात.त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यावर भयावह संकट ओढवू शकते. आशी शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होते. ३) शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची मालकी नष्ट होईल का? विधेयकानुसार शेतकऱ्याच्या शेतीतील  उत्पादनावर  कंपनी करार करेल अर्थात कंपनी शेतकर्‍यांच्या शेतीवर हक्क घेऊ शकत नाही.परंतु शेतातील उत्पादनावर तिचा हक्क असेल. शेतकऱ्याच्या मनामध्ये येथे शंका निर्माण होते- करारानुसार उत्पादन पिकले नाही तर त्यात निर्माण होणारी तूट भरून काढायची कशी? 


कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू राहील तिला कंपनीबरोबर स्पर्धा करावी लागेल आणि जर स्पर्धा करता नाही आली तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व राहील काय? अस्तित्वात राहून शेतकऱ्याकडून ठरलेल्या हमी भावानुसार खरेदी करण्याचे धोरण सुरू ठेवेल? अशी कोठेही विधेयकात तरतूद नाही. हमी किंमतीला शेतीमाल विकत घेण्याचे स्पष्ट आश्वासन,  विधेयकात नसेल तर हमीभाव निरर्थक ठरतात. शेतकऱ्यांना आपला माल विकण्याच्या स्वातंत्र्यापेक्षा तो माल सरकारने खरेदी करण्याची हमी जास्त महत्वाची वाटते. कारण किमान आधारभूत किंमत (एम. एस. पी. ) ठरवण्याचा पूर्ण अधिकार हा कृषीमंत्रालय, भारत सरकार ला आहे. कृषी मंत्रालय ज्या पद्धतीने एम .एस .पी.(MSP) ठरवते त्यानुसार त्या मालाची आधारभूत किंमत ठरत असते त्यालाच आपण हमीभाव असे म्हणतो. सरकारने पारित केलेले सर्वच कायदे, शेतकऱ्यांना समजतात असे नाही शेतकऱ्याला एवढंच माहित असतं की, शेतात खूप राबल्यावर पीक जोमात येतं,परंतु त्या पिकलेल्या उत्पादनावर भाव ठरवण्याचा अधिकार नसतो. उत्पादनाचे भाव कायद्यानुसार ठरतात. हे त्याला शेवटी माहीत होते. म्हणूनच शेतकऱ्याची दयनीय अवस्था, कृषिप्रधान देशामध्ये पहायला भेटते.


जगाचा पोशिंदा म्हणून त्याचा मान सन्मान केला जातो. वास्तविक पाहता त्याचे अर्थकारण मात्र हतबल झालेले असते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी परिस्थितीपुढे आणि कर्जापोटी हतबल होऊन, नको असलेले कार्य करतो. ते म्हणजे आत्महत्या. आत्महत्या रोखण्यासाठी सरकार विशेष करून काही कायदे अमलात आणेल असे काही दिसत नाही. शेतकरी आत्महत्या करणारच नाही अशी उपाययोजना सरकारने करावी असे मनोमन वाटते. शेतकरी आत्महत्या होऊ नये असे वाटत असेल तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तंतोतंत लागू केल्या पाहिजेत. 


शेती केवळ उपजीविकेचे साधन नसून राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे. ही बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. देशातील सर्व कृषी विद्यापीठांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी योग्य असे उत्पादनाचे स्रोत निर्माण करायला हवे. ज्याद्वारे शेतकरी निसर्गावर आधारित शेती करू शकेल. कारण, बहुतेक ठिकाणी सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. सरकारने सिंचनावरती लक्ष देऊन खास करून दुष्काळी भागात सिंचन वाढवावे. शासनाने आयोजित केलेल्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात की नाही याची शहानिशा करणे सुद्धा आवश्यक आहे. योजनांमध्ये दलाली कमी करून थेट बांधावर योजना राबविल्यास शेतकरी मेटाकुटीला येणार नाही. शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. हा उद्योग जर संकटात सापडला तर भविष्यातील येणाऱ्या अडचणी खूप  मोठ्या असतील. 

हरित क्रांतीचे जनक म्हणून प्रोफेसर स्वामीनाथन यांनी मोलाचे कार्य पार पाडले. पंजाबी गहू आणि मेक्सिको येथील गहू त्यांच्यावर प्रक्रिया करून भरपूर उत्पन्न देणारा गहू निर्माण केला, तांदूळ निर्माण केला. 1965 नंतर झालेली हरितक्रांती जगाला अचंबित करते आहे. त्या धर्तीवर आधारित कृषी विद्यापीठातील प्रोफेसर यांनी काम  करून शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली तर शेतकरी स्वाभिमानाने जीवन जगेल  आणि आत्मनिर्भर बनेल. सरकारने सुद्धा स्वामिनाथन यांनी केलेल्या शिफारशींवर जर विचार केला तर कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही. वर उल्लेख केलेल्या सिंचनावर भर द्या सांगतात. स्वामीनाथन यांनी सांगितलेली वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम जशी योग्य प्रकारे राबवली जाते. त्याच पद्धतीने इतर शिफारशी लागू केल्यास देशातील शेतकरी हा सक्षम बनेल. 

शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज ,जर शेतीवर अनावधानाने नैसर्गिक आपत्ती आल्यास बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये. विनाअडथळा त्यांना पिक विमा कवच द्यावे. शेतकरी आत्महत्या नंतर दिली जाणारी आर्थिक मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. शासनाची मदत अधिकची करून त्या कुटुंबाला दुःखातून सावरण्या बरोबर त्यांना सबलीकरणासाठी मदत करावी. ग्रामपातळीवर जलसिंचन, नैसर्गिक स्त्रोत संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार देऊन गुणगौरव केल्यास ग्रामपंचायती या क्षेत्राकड वळतील. 14 व्या वित्त आयोगमध्ये स्वतंत्र तरतूद करावी. वेगवेगळ्या भूभागानुसार पीक उत्पादनास प्रोत्साहन द्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून, शेतकऱ्याकडून अचूक माहिती घेऊन झालेल्या नुकसानीस योग्य तो मोबदला देण्यात यावा. त्यामुळे शेतकरी हताश व जीवन संपवण्याच्या मार्गाकडे जाणार नाहीत. शेती शेतकरी व शासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी असणार तलाठी हा सुद्धां हितचिंतक असणे महत्वाचे आहे. कारण हा महत्त्वपूर्ण दुवा आहे. शासनाच्या योजना योग्य लाभार्थ्यास पोचण्याचे काम शेती व शासन यांच्यामध्ये दुवा ठरणारे अधिकारी सक्षम पणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास, शेतकऱ्यावर निराश होण्याची वेळ येणार नाही. 

जय जवान! जय किसान !!जय विज्ञान!!!    ||जय 🇮🇳भारत||

                     -राहुल डोंगरदिवे

                       

सोमवार, १० मे, २०२१

Break the chain



Due to the covid-19 virus, everyone tried to keep away from this pandemic. The world's major countries are also worried about this pandemic and its panic. Researchers and scientists find out the remedy, but the final solution is not finished. This process is going on a vast. The major problem is, how to break the chain? Which is the weapon to stop this pandemic disease? And the answer is a lockdown. It is the major weapon to stop the chain and the best remedy for covid. The second wave of the covid-19 virus is powerful and destroyed a lot of people. From the last year, the first wave and the symptoms of the covid are different from today. The spreading ratio is so high. The world is aware of it and its side effects. 1st, 2nd, 3rd and fourth waves will come, but we are not fit for that. We have a lot of deficiencies and we are struggling with a lack of strategy. One of the most important deficiency is politics. The politician has played a different kind of politics. High Court said to the central government, 'We are doomed '. The Supreme Court is aware of the central Government takes action against citizens who criticize the situation. This is the condition of the current ambience.


If the central government played a role just like partiality that's not fair.  It's inhuman. Politician plays politics always but it's not time to play cunning tricks. It's the moment to come together and fight against the covid -19 pandemic. We should forget all past event and tie up a new bond for a healthy India. If there is only a scare in front of the people at that time don't forget what's the next ambience? Everyone tries to save themselves and they can do everything for their life. Sometimes the situation will be converted into wrath.  So we must compromise with them and try to solve the problem honestly. If we ignore them then see one day will come, on that day only chaos and arbitrariness will be sustained. It's totally in our hand, how to handle the current situation, and provide all things related to human beings. At first, we should help the people and make them positive look at this pandemic. Support them and provide medical facilities without discrimination.

People must follow the instructions given by the government. If the people's do not follow such type of instructions then the covid-19 is not controlled. If the disease is spreading all over as fast as wind speed,  we can't imagine, what's next? According to the expertise, 3rd phase will be uncontrolled and we have no chance to control it. The central task force committee says, if you want to prevent the third phase, there is no way without 'strictly lockdown'. The central government could not seriously think about that. Stay home, stay safe, stay alert the formula of long life. 

Don't afraid when similar symptoms are seen related to covid. Go to the doctor and consult and take medicine.  A viral doctor's prescription is not suitable for everyone. So keep you a secure distance from that viral video and message. Always use the weapon ( mask, hand gloves, sanitiser and regular rules.) battel against covid- 19. If we have all things then we beat the pandemic disease. We have experienced, a lot of people, who are not going to the hospital? and tells us the problem ( survey representative). Few persons had prejudiced information about the civil hospital,  because of their misunderstanding about the civil hospital. They think all are not going to good. So they afraid and worried about the future. 

The scare of covid, many people without consultation taking medicine and another hard dose. Doctors also suggested the HRTC because of the exact diagnosis and treatment. Dr Guleria said, in critical cases HRTC essential but in a mild symptom, there is no need for an HRTC report. In such type of critical cases, take the consult of a specialist. Follow the instructions and does and don't. Don't go forward with overconfidence. Nowadays if a man infected to covid, and then whole family members pass away(it's happened in Nanded, Maharashtra). No coherence between the family and society. So we must find out the symptom and contact doctors. Don't live in an imaginary world. Accept the truth about this pandemic, take proper treatment, and support your family. It's also a national service.

According to the High court and the Supreme Court, we must take care of all.  To handle this critical position, Supreme Court established a task force for transparent oxygen allocation. What does Central Government for covid prevention? It's a huge question. Now, the condition is so poor and we are going to the third position of the corona. All we are alerted and make a unique strategy for preventing the third phase. 

We should not trust baseless news viral on social sites. Just like it's a huge conspiracy or other. We the People of the world must ignore dirty politics, bad things, understanding - misunderstanding. We must forward positive news, support each other and a little contribution against covid. It's the necessity of the present era. If we just find out only difficulties and deficiency, the situation will be converted into a big disaster. So do something to prevent covid. From today, start the battle against spreading the hidden virus. Follow the local government & Unicef instructions -

#  when you are around other people wear a  mask that covers your nose, mouth, and chin.

# Keep a safe distance from others.

# If you must gather other people, meet outdoor or choose species with good airflow.

With full of confidence be ready to fight for lives. 

# Be alert, stay home, stay safe.




सोमवार, ३ मे, २०२१

COVID-19 : भय इथले संपत नाही

 COVID-19 : भय इथले संपत नाही




भारतामध्ये प्रथम मार्चमध्ये एक दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रधानमंत्र्यांच्या सूचनेवर सर्व भारतवासीयांना त्याचे पालन आणि अनुकरण केले. नंतर लॉकडाऊन मे-जून पर्यंत वाढत गेला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक होते. कोरोनाच्या साखळीने माणसांची साखळी मात्र तुटत होती. मिडीया मधून प्रसारित होणाऱ्या बातम्या व संसर्ग पसरण्याची तीव्रता पाहता स्वकीयांच्या भेटीसाठी किंवा जीव वाचवण्यासाठी लोक आपापल्या गावी, शहराकडे परतू लागले. अनेक मजुरांचा नाहक बळी गेला. त्या रेल्वेखाली चिरडल्या गेलेल्या किंचाळ्या, उपासमारी याने आजही काळजाचे ठोके स्तब्ध होतात. हृदयद्रावक घटना आजही मन सुन्न करतात. आज तब्बल चौदा महिन्यानंतरही तीच परिस्थिती पुन्हा अवतरते काय? अशी शंका मनात निर्माण होत आहे. आज दोन मे 2021 रोजी कोरणा संसर्ग चा विक्रमी आकडा, तीन लाख 92 हजार 488 अशी नोंद झाली. कोरोना प्रमाण कदाचित वाढलेलं असेल किंवा कमी झालेलं असेल. भारतीय राजकारणाचा विचार करत असताना स्वार्थापुढे देश मोठा नाही असेच सिद्ध होताना दिसते आहे. आज झालेल्या निवडणुक निकालानंतर राष्ट्रीय स्तरावर कोरोना नियंत्रण च्या बैठका आपले पंतप्रधान घेताना दिसतात. पाच राज्यांच्या निवडणुकांमधे मात्र प्रचार रणधुमाळी मध्ये याचा विसर पडलेला आपण सर्वांनीच पाहिला. अलोट गर्दी मध्ये स्वतः खुद्द पंतप्रधानांनी प्रचंड मोठ्या सभा घेतल्या. त्यातून कोरोनाचा प्रसार झाला याचे आकडे आता बाहेर येऊ लागलेले आहेत. स्वतःचा पक्ष आणि सत्ता समीकरणे यापेक्षा देश मोठा नाही, हे स्पष्ट होते. 

सत्ता मोहापायी दस्तुरखुद्द पंतप्रधान आपल्या मंत्रीमंडळात सहकारी असणारे दिग्गज केंद्रीय मंत्री प्रचारात उतरले तेव्हा मात्र कोरोना चा विसर पडला होता. या धामधुमीत मध्ये भारतामध्ये अनेक भयावह घटना घडल्या. मुंबईतील विरार येथे वल्लभ हॉस्पिटल ला लागलेल्या आगीमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला. कोरोना ऋग्न पॉझिटिव्ह असणाऱ्या हॉस्पिटलची अशी अवस्था होती, अनेक निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्ली येथील पलंगाच्या शोधा करिता भटकणाऱ्या एका रुग्णाचा कारमध्येच मृत्यू झाला टाइम्स ऑफ इंडिया न ही बाजू लावून धरली होती. नागपूर येथील रुग्णालयांमध्ये सुद्धा चार जणांचा मृत्यू झाला. गुजरात मधील भरूच येथे हॉस्पिटलला लागलेल्या आगीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत देशांमध्ये 215 542 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही हे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. सर्व जगच हतबल झाले आहे.भारताची स्थिती ही आवाक्याबाहेरची झाली आहे. भारतासारख्या विशाल देशामध्ये ऑक्सिजन अभावी आणि औषधोपचार अभवी लोक तडफडून मारताना दिसतात. एवढी भयंकर स्थिती असताना सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार संबंध ताणलेले दिसतात. राज्य सरकार केंद्रावर आरोप करते, तर केंद्र सरकार राज्य व लोक  यांच्यावर आरोप करताना आपण पाहत आहोत. आरोपाच्या फैरी झडत असताना, स्वतंत्र असणारी न्यायव्यवस्थेला दखल घ्यावी लागते. नाईलाजाने न्यायव्यवस्था हळहळते आणि केंद्र व राज्य सरकार यांचे कान टोचण्याचे काम सुद्धा करते.या  वस्तुस्थितीची आपणास मीडियातून चर्चा होताना दिसते. ऑक्सिजन, ऑक्सीजन प्लांट साठी अनेक देशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे, ही झाली मानवता. पण विश्वगुरू बनू इच्छिणार्‍या भारताकडे मात्र याचा अभाव आहे,असेच दिसते. कारण, राजकारणापलीकडे त्यांना अंदाधुंद करून सोडणारा सत्ता मोह सुधरू देत नाही. कोरोना संसर्गाच्या लढ्यात अनेक लोकांचा बळी तर गेलाच,  परंतु या लढ्यामध्ये जनजागृती करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे पत्रकारिता. पत्रकारिता करत असणारे 165 पत्रकारांना प्राणांची आहुती द्यावी लागली, हे शाश्वत सत्य दडवून ठेवता येणार नाही. न दिसणाऱ्या शत्रूच्या लढ्या पेक्षा राजकारणातील संसर्ग हा खूप मोठा दिसतो. संकट समयी सर्व राजकारण्यांनी एकत्र येऊन या लढ्याला साथ दिल्यास कोरोना संसर्गाची साखळी आपण पटकन तोडून टाकू. विविधतेतील एकता, संकट पूर्वी दाखवली तर तिचा योग्य उपयोग भारतमातेसाठी होईल. अंतिम संकटापर्यंत आपण असं शांत राहायचं का? जेव्हा पर्यायच उरत नाही तेव्हा मात्र एकत्र पाहिजे. अगोदर शत्रूला पोसायचे, त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा आणि नंतर त्याला हाकलून देण्यासाठी भारतीय ऐक्य दाखवायचे. ती स्वातंत्र्य पूर्वीची परंपरा पुन्हा वेगळ्या पद्धतीने अवतरण्याची भीती मनामध्ये  कासावीस करते. 

जागतिक आपत्तीमध्ये भारताची सध्याची अवस्था खूपच गंभीर आणि चिंताजनक आहे. भारतातील सर्व हॉस्पिटल कोरोना रुग्णाने हाउसफुल झालेले आहेत. राजधानी दिल्लीची तर अवस्था खूपच बिकट आहे लोक स्वतःच्या कार मध्ये औषध उपचार घेताना, ऑक्सीजन सिलेंडर गाडीच्या बाहेर असताना रस्त्यावर दिसत आहे. देशातील एका आमदाराला उपचाराअभावी मृत्यू येत असेल तर,  सामान्य माणसांचे हाल कसे असतील? याची कल्पनाच करणे व्यर्थ ठरेल. प्रत्येक जिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि औषधोपचाराचा तुटवडा या समस्येने ग्रासलेले आहे. खूप आरडाओरड केल्यानंतर केंद्राकडून राज्याला ऑक्सिजन पुरवला जातो. सर्वांसाठी देश मोठा की देशासाठी राजकारण मोठे, अशा शंका निर्माण होणे ही खूप मोठी निंदनीय बाब आहे. शासकीय रुग्णालयाची अशी अवस्था असताना खाजगी रुग्णालयात औषध उपचार करणे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे आहे काय? खाजगी रुग्णालयांमध्ये ऍडमिट होतानाच हजारो लाखो रुपयांचे डिपॉझिट भरा, त्याशिवाय ऍडमिट करूनही घेतले जात नाही. त्याचबरोबर शासकीय रुग्णालय विषयी असणारे ग्रामीण भागातील गैरसमज ही एक मोठी चिंतेची बाब बनली. त्या अकारण भीतीपोटी लोक आपले आजार लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हाच आजार बळावला तर मृत्यू निश्चित आहे. हे या लोकांना कोण समजावून सांगणार. समजावण्याचा प्रयत्न केलाच तर लोकांचे उद्धटपणाची वर्तनं, त्यांच्याच जीवाशी खेळ खेळत आहे. गंभीर परिस्थितीमधून सुखरूपपणे बाहेर पडायचे ठरवले, सर्वच राजकीय पक्षांनी ,घटक पक्षांनी , स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन लोकांच्या मनातील भिती काढण्याचा प्रयत्न करून सदृढ मनाने, निस्वार्थपणे देश हित लक्षात ठेवून निकराचा लढा दिला पाहिजे. 

लोक प्राणाशी झुंज देत असताना, कोरोना नंतर निमोनिया सारख्या गंभीर आजारावर रामबाण उपाय म्हणून रेमडिसीवर या औषधाचा वापर केला जातो. या औषधाचा गैरवापर व साठेबाजी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. औरंगाबाद सारख्या ठिकाणी तर वापरलेल्या बाटल्यांमध्ये सलाईन चे पाणी भरून हजारो रुपयांना विकले जात आहे. रेमडीसिवीर या औषधाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. आहे ते औषध, योग्य त्या किमतीला मिळत नाही. मूळ किमतीच्या दहापट पैसा वसूली दलालांमार्फत केली जाते. सामान्य माणसाला तर तो मिळतच नाही,आणि जर मिळालाच तर वरदहस्त लागतो. एक वेळच्या औषधाची किंमत जर तीस ते चाळीस हजार असेल तर, सात ते आठ दिवसानंतर येणारे बिल किती असेल? यामुळे लोकांना औषध मिळत नाही. अनेक संसार उद्ध्वस्त होताना दिसतात. रुग्णालयांमध्ये एवढा मोठा न परवडणारा उपचार करूनही रुग्ण दगावत असेल, यापेक्षा भयंकर शोकांतिका कोणती होता आसु शकते? 

हॉस्पिटलच्या खर्चापोटी अनेक कुटुंबे उध्वस्त होताना पहायला मिळतात. कृत्रिम औषध तुटवडा गंभीर झालेल्या रुग्णासाठी मृत्यू ठरत आहे. चांगल्या गोष्टींचे श्रेष्ठत्व स्वतःच्या नावे घेण्यासाठी राजकीय मंडळी अग्रेसर असतात. अपयश मात्र कोणी माथी मारून घेत नाही. आज प्रत्येक पक्षाचे उत्कृष्ट हॉस्पिटल असायला हवे होते.श्रद्धे साठी मंदिर जशी हवी असतात, त्याचप्रमाणे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अस्तित्वात असणे आवश्यक आहे. वास्तवातील ज्यावेळेला संसर्गजन्य किंवा इतर साथीचे रोग येतात तेव्हा, मात्र या रुग्णालयाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. भयंकर असणाऱ्या जागतिक साथीच्या रोगांमध्ये राज्यकर्ते, राजकारणी मंडळींनी रुग्णांसाठी अभय शिबिरे, त्याचबरोबर जनजागृती करणे आवश्यक ठरते. राजकारण करण्यासाठी आपल्याला आयुष्य पडलेल आहे. परंतु, ज्यांच्या जीवावर आपण राजकारण करतो, ती जनताच नसेल तर, राजकारण कोणासाठी करणारा? आणि कशासाठी?  कोरोना सारख्या भयंकर संसर्गजन्य आजारात औषधोपचारा बरोबर मानसिक आधाराची सुद्धा गरज आहे. मानसिक आधार राजकारणी उत्कृष्टपणे देऊ शकतात. हे ज्याने त्याने ओळखले पाहिजे. सृजनशील समाजनिर्मितीसाठी आरोग्यसंपन्न, सुदृढ व्यक्ती टिकणे आणि निर्माण होणे आवश्यक आहे. समाजातील समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने संयमाची भूमिका घेऊन उपाययोजना व नियोजन केले तर या संकटातून सर्वजण सुखरूप बाहेर पडू. रुग्णालयातील आगीचा प्रश्न  असो अथवा कृत्रिम औषध तुटवडा या सर्व आरोपींवर  योग्य ती कारवाई झाली तर भविष्यात अश्या गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही.  परंतु हे प्रश्न जर असेच डोळ्याआड केले जातील , तर समाज आणि सरकार त्याबरोबर इतर राजकीय  पक्ष यांच्यात समन्वय साधला जाणार नाही. परिणामतः भय इथले संपत नाही.!

Writer:-

#RAHUL R. DONGARDIVE