भाग : 04
मातृभूमीची आस...
स्वामी निगमानंद महाराज |
अखंडपणे सलग 14 वर्षाच्या काळात योग साधना, सर्व शास्त्रांचा अभ्यास, आणि चिंतन-मनन केलेल्या ज्ञानार्जनाचा उपयोग, हा मानवी कल्याणासाठी व्हावा. हा त्यांचा मानस, त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. पुढील आचार्य पदाचे शिक्षण घेऊन आश्रमात ज्ञानदानाचे कार्य करावे. असा विचार मनात येत होता. पण ..त्यात त्यांना स्वारस्य वाटले नाही. भारत भ्रमनामध्ये त्यांना आलेले अनुभव, हे सतावत होते. परंतु , त्यावर ज्ञानाच्या अनुभूतीने उपाय काढता येतो. ही त्यांची स्वयम् इच्छाशक्ती, मात्र त्यांना त्या दुःखितांचे आधार बनू पाहत होती. भ्रमंती करत असताना त्यांनी समाजातील अंदाधुंद अअत्याचार, फसवणूक , एखाद्याच्या दुःखाचा गैरफायदा, लोक कसे घेतात? हे ही पाहिले होते. शेवटी त्यांनी या समाजाला भौतिक सुखापेक्षा, भगवंताच्या सेवेमध्ये आगळेवेगळे सुख आहे . हा त्यांचा महत्प्रयास त्यांना मायंबा कडे आकर्षित करत होता.
ज्ञान प्राप्ती नंतर सिताराम बाबा आता श्रीगुरूंच्या आशीर्वादाने "निगमानंद" झाले होते. निगमानंद बाबा आता आपल्या मात्रुभूमिकडे मार्गस्थ झाले. आपला पूर्व भूतकाळ डोळ्यासमोर तरळत होता. माऊलींच्या त्या मागणीचा त्यांना विसर पडत नाही. माझा जन्म हा फक्त आणि फक्त 'मायंबा' च्या सेवेसाठी आहे. वास्तविक पाहता वडील बंधू नरहरी बुवा स्वतः या कामासाठी तयार होते. नव्हे, त्यांना त्यांची खूप आवड होती. बाल सीतारामाना त्यांनी सदैव सांगण्याचा प्रयत्न करत होते - "मी मायबाची सेवा करतो, तू संसार सांभाळा. " निगमानंद बाबा मात्र त्यांना आपल्या आईच्या मायंबा ला केलेल्या मागणीचा पुनरुच्चार करत असत. तेव्हा मात्र नरहरी बुवांना माघार घ्यावी लागत असे.
नांदेवाली- निमगाव -राळेसांगवी या तिन्ही गावच्या मध्यभागी, ओसाड माळरानावर ती मायंबा ची दोन मंदिरे. मधेच झुळझुळ वाहणारी सिंसिंदफणा, साथ देण्यासाठी किना नदी. सिंदफणा व किना नदीवरच्या संगमावर संगमेश्वराचे मंदिर. मधेच घंटेचा निनाद, कानाला अल्हाददाय व मंत्रमुग्ध करत असायचा. बालपणी शिक्षकांना झालेला पश्चाताप. पोहायला गेल्यावर मुले, मासा, त्यांच्या अंगावर फेकून देत असत. माळ आडकवण्याचा प्रयत्न करत असत.. हे स्मरण होत होते . बाबांना, आता हा फक्त पूर्व भूतकाळ स्वप्नाळू वाटत होता. आता त्यांच्याकडे ज्ञान आणि या ज्ञानाचा वापर समाज सुधारण्यासाठी करायचा होता.
सन 1967 ला बाबा मायंबा वर वर पोहोचले. चेहऱ्यावर सूर्य प्रकाशा एवढे तेज, रोम रोम प्रसन्नता, भगवे कपडे धारण केलेले, डोक्यावर जटा, दाढी वाढलेली, उंच सडपातळ शरीरयष्टी, असंन अवस्थेत बाबा मायंबा वर येऊन स्थिर झाले होते. सकाळच्या प्रहरी परिसरातील माणसे, आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी ये जा करू लागली. मायंबा पासून जात असणाऱ्या वाटेवरून एका वाटसरू ने पाहिले, कोणीतरी एक जटाधारी साधूमहाराज, मायंबा वर आसनस्थ आहे. त्याने ओळखण्याचा प्रयत्न केला, पण....तेजाने भरलेल्या, त्या मूर्तीची त्याला ओळख पटेना, बोलण्याची हिम्मत होत नव्हती. गावात येऊन ही वार्ता कळत, ना कळते. तोच ही वार्ता, मायंबा परिसरात वार्यासारखी पसरली. निमगाव, नांदिवली, राळेसांगवी गावचे लहान-थोर मंडळींनी मायंबा वर धाव घेतली. आजूबाजूच्या गावातील माणसांच्या रांगाच्या रांगा लागल्या. प्रत्येकाला कुतूहल वाटत होतं. साधू आणि तोही जटाधारी, अगंणया कपड्यात, मराठी बोलता येत नाही. नक्कीच कोणीतरी महान व्यक्ती असणार, पण..कोण ? हा यक्षप्रश्न त्यांना अनपेक्षित असाच होता.
खूप मोठ्या प्रमाणात मायंबा वर लहानांपासून थोरांपर्यंत गर्दी झाली. बाबांचे ते तेज पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होत होता, ओळख मात्र पटत नव्हती. काही ज्येष्ठ मंडळींनी मात्र या अनोळखीचे, ओळखीत रूपांतर केले. कोणीतरी म्हटले, " अरे, हे तर, सिताराम बाबा! " प्रत्येक जण एकमेकाकडे आश्चर्याने पाहू लागले. सर्व ज्येष्ठांना सिताराम बाबांची ओळख पटली. सिताराम बाबा मायंबा वर आले, ही बातमी बाबांच्या आईच्या कानावर धडकली. आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचक्षणी सर्व कुटुंबाने मायंबा वरती धाव घेतली. आईने सिताराम बाबांना ओळखले. आईला, भावाला काय करावे ? ते सुचत नव्हते. आनंदाने गहिवरून आले,तेजाने ओथंबून भरलेली साधूची मूर्ती मनाला गहिवरून टाकत होती. सर्वजण दर्शन घेऊन तृप्त झाले होते. आईच्या ममत्वाने मर्यादा पार केल्या, " माझा सिताराम!!!! " ही हाक सारखी टाहो फोडत होती. ती हाक, बाबांनी ऐकले असावी, आणि बाबा उद्गारले..
"हम किसी के कोई नही लगते, हम निगमानंद है |
अलख निरंजन|"
बाबा ज्या सहवासात 14 वर्षे राहिले, तेथे 'हिंदी बोलीभाषेचा वापर होता. त्यामुळे, त्यांना मराठीचा अडसर येत होताा. आईच्या हाकेला दिलेलं बाबांचं, हिंदीतील उत्तर मात्र सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेलं. संन्याशाला ना जात, ना पंथ, ना नात, ते फक्त निगमानंद होते.
बाबांचा सहवास हा त्या परिसरासाठी एक विलक्षण होता. बाबांना ते एक वेगळेच होते. ज्ञान आणि वास्तव परिभाषा, ही निराळीच होती. बाबांची परिसर भेट, ही त्या परिसरातील , एका- एका पैलूंचा उलगडा करत होती. प्रत्येक गावात अन्याय - अत्याचार, या राक्षसी प्रवृत्तीचा संचार होता. सद्विचारी माणसांची भेट तर मुश्कील होती. सर्व परिसरात असूरी प्रवृत्ती बोकाळली होती. कोणी कोणाचे ऐकायला व सांगायला तयार नव्हते. प्रत्येक जण आपल्या वाईट व्यसनांमध्ये मशगुल होता.
अनेक संसार मोडकळीस आले होते. अनेकांची वाताहात होत होती. अनेक जण फक्त चैन विलास व मद्यधुंद अवस्थेत जीवन जगत होते. गोरगरिबांचे जीवन तर जगणे तर खूप कठीण होते. गावात जलसे, तमाशे, गावचा अंदाधुंद, अनैतिक व्यवहार आणि पशुहत्या या गोष्टीने बाबांना घायाळ करून टाकले. समजावण्याचा प्रयत्न केला, तर लोक ऐकायला तयार नाहीत. ही समाजाची विघातक अवस्था बाबांना अस्वस्थ व घायाळ करत होती. बाबांना, काय करावे? असा प्रश्न पडला.
बाबांना एवढे दुःख झाले की, या लोकांना सुधारणे पाहिजे तेवढे सोपे नाही. समजून सांगूनही उपयोग होत नाही. बाबा चिंतन करत असायचे. शेवटी आपण परत हिमालयात निघून जावे, असा त्यांचा निश्चय झाला. तो निश्चय त्यांनी, सद्गुणी लोकांना बोलून दाखवला. तो निर्णय निगमानंद बाबांचा आहे बाबा आता परत हिमालयात जाणार अशी वार्ता परिसरात पसरली आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना याचा आनंद झाला. परंतु, नियतीला हे मान्य नव्हते. कारण, मायंबा परिसराचा उद्धारकर्ता, या भूमितून परत जाऊ देईल कशी ? ही जन्मभूमी!
निगमानंद बाबा पुन्हा परत हिमालयात निघून जाणार, ही वार्ता गहिनीनाथ गडावर वामन भाऊंच्या कानावर पडली. त्याचबरोबर भगवानगडावर सुद्धा पोहचली. संत वामनभाऊंना आणि भीमसिंह महाराजांना माहीत होते. निगमानंद महाराज ही साधी हस्ती नाहीयेत. तेव्हा, या संत महात्म्यांनी मायंबा कडे धाव घेतली. नांदेवाली येथे आल्यावर, संत वामनभाऊ नि त्यांना निरोप दिला. संत वामन भाऊंना बाबा खूप मानत असत. संत भाऊंचा निरोप मिळाल्यावर बाबा मायंबा वरून नांदेवाली ला गेले.
भाऊ विषयी असणारा आदर आणि अपार श्रद्धा, बाबांना पाहताच दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली. भाऊंनी बाबांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. भाऊंनी त्यांच्या ज्ञानाची सत्वपरीक्षा पाहिली. बाबांना उद्देशून म्हणाले, "सीतारामा, हे निगमनंदा. तू स्वहित करून आत्मकल्याण करून घेतलेस. आता या बुडत असलेल्या, दिशाहीन झालेल्या जनतेचा सांभाळ कर, त्यांचा उद्धार कर, हिमालयात परत जाऊ नकोस, जनकल्याण हे तुझ्या हातून होणार आहे. " संत भिमसिंह महाराजांनी मायंबा वर राहण्यास सांगितले . पुढे मायंबा चे मच्छिंद्रगडाच्या स्थापनेत , भिमसिंह महाराजांचे खूप मोठे योगदान होते. भाऊंच्या सल्ल्यानंतर , निगमानंद महाराजांनी आपले मौन वृत्त सोडून दिले. 'रामकृष्णहरी' म्हणून मौन वृत्त सोडून, अंदाधुंद समाजाला कल्याणकारी मार्गावर आणण्यासाठी आज पर्यंत कार्य सुरू आहे . मायंबा चे आज विशाल आशा मच्छिंद्रगडामध्ये रूपांतर झाले आहे.
क्रमशः...