गुरुवार, २५ मे, २०२३

जिलेटिनचा स्फोट

 


जिलेटिनचा स्फोट शेतकरी आणि शेतकऱ्याची स्वप्न  चिंधड्या चिंधड्या झाली... 


प्रस्तुत लेख हा सत्य घटनेवर आधारित आहे दिनांक 24 मे 2023 रोजी सकाळी साडेसहा वाजता राक्षसभुवन तालुका जिल्हा बीड घडलेली घटना. पंचक्रोशी मध्ये दुःखाचे  सावट पसरले आणि एक शेतकऱ्याचे कुटुंब विध्वंस झाले."

एक साठी ओलांडलेले शेतकरी . आयुष्यभर शेतामध्ये राबराब राबले , हाडाची काड केली, मुलांना शिकवलं, शेती पिकवली. नवरा बायको ने शेतीमध्ये कष्ट करत असताना ना दिवस पाहिला आणि रात्र पाहिली . शेतामध्ये रक्ताचे पाणी करायचं ,...पण शेत पिकवायची! पिकलेल्या धान्यातून वर्षभराची धान्य खाण्यासाठी घरी ठेवायचं आणि उरलेलं धान्य बाजारात विकून घर प्रपंच भागवायचा . ती शेतीही निसर्गावर अवलंबून आहे . निसर्ग बऱ्यापैकी उदार झाला तर शेती पीकायची . तो कमी झाला आणि जास्त झाला तरी शेतीवर आसमानी संकटांना का काहुर माजायचं. अशी विचारधारा घेऊन शेतकरी आलेल्या संकटातून देवाच्या परमश्रद्धेतून देवालाच साकडे घालायचा. माझी शेती पिकू दे, मुलांना शिक्षण देईल एवढा पैसा दे , मला फुकटचं नको ,माझ्या शेतीच्या पिकलेल्या आणि शरीरातून निघालेल्या घामाच्या हिमतीवर दे, माझी संसार रुपी वेल अशीच  बहरू दे , हे ईश्वरा जगाचही कल्याणकर आणि त्या पाठोपाठ माझ्या मुलाबाळांचही भलं कर . अशी टाहो फोडणारा बाप आणि आई ही प्रत्येक कुटुंबाची आधारस्तंभ असतात . त्या कुटुंबासाठी एक मैलाचा दगड असतात. त्या कुटुंबासाठी तो पाठीचा कणा असतो. तोच आधारवड सुद्धा असतो! 

अपार कष्टातून असाच गगनाला भिडणारा वेलु भरला होता . आप्पासाहेब सोपानराव मस्के यांनी जिद्दीच्या जोरावर मुलांना शिक्षण दिले होते. एक मुलगा डॉक्टर बनवला दुसऱ्या मुलांना शिक्षण देऊन त्याला सक्षम करण्यासाठी ते सदैव तत्पर होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली झाली होती. आप्पासाहेबांची स्वप्न साकार करण्याची प्रत्यक्ष वेळ आली होती. त्यानुसार त्यांच्या इच्छेनुसार मुलांनी शेतामध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू केले. विहीर खोदण्याचे काम पोकलेन मशीन द्वारा सुरू होते. माती काम झाल्यानंतर खडक फोडण्यासाठी जिलेटिन कांड्याचा वापर केला जातो. त्याद्वारे खडक फोडला जातो म्हणून ट्रॅक्टरने विहिरीत बार घेण्यासाठी जिलेटिन कांड्या बांधावर ठेवण्यात आल्या होत्या. शेतकऱ्याच्या घरातील सर्वांनी याची माहिती होती.पण..आप्पाराव मात्र यापासून अनभिज्ञ होते. विहिरी शेजारी बांधावर गवत वाढलेले असल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे बांधावरील गवत जाळण्याची प्रथा शेतकऱ्याच्या मनामध्ये तरळत होती. आप्पासाहेब सकाळीच उठले आग काडीपेटी घेतली, शेतातील बांध पेटवण्यासाठी गेले. बांधाचे एका साईड पासून त्यांनी बांध पेटवला . वाळलेल्या गवत असल्यामुळे बांध पेटत पेटत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात होता. विहीरीजवळच्या टोकाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवलेल्या होत्या, हे दृश्य त्यांच्या मुलाने पाहिले तोही जोरात धावत वडिलांकडे धावत गेला.तो ओरडून सांगत होता त्या ठिकाणी जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या आहेत. तेथील आग विझवा नसता तेथून दूर जा. सोपानराव सुद्धा घाबरून गेले त्यांना काय करावे कळत नव्हते. आग विझवावी  कि तिथून पळून जावे,संभ्रमात असतानाच पेटलेला बांध मात्र जिलेटीनच्या कांड्यावर पोहोचला आणि नको ती गोष्ट घडली. क्षणामध्ये सोपान रावणच्या स्वप्नांचा चकनाचुर झाला . सोपानरावांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या जिलेटिन कांड्याचा स्फोट एवढा भयंकर होता की परिसरात चार ते पाच किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज घुमला ,घरावरची पत्रे थरथरली, प्रचंड असा आवाज येऊन आकाशामध्ये धुळीचे लोळची लोळ उडाले . प्रत्यक्ष स्फोटापासून आप्पासाहेबांच्या देहाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या,  मृतदेह चाळीस ते पन्नास फूट उंच उडून पडला आणि एका  सदग्रहस्थाचा अंत झाला. जवळच असणारा त्यांचा मुलगा ऋषिकेश पाहत होता . त्याला काय करावे? कळत नव्हते. त्या स्फोटामध्ये उडालेल्या माती व खडे त्याच्या चेहऱ्यावर जाऊन आरपार घुसले डोळेही अधू झाले. डोळ्यांवरती उपचार जालना येथील गणपती रुग्णालयात सुरू आहेत.




घडलेला प्रकार हा अत्यंत निर्दयी आणि संयमाचा बांध  फुटणारी आहे . आपण सहज म्हणतो , ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला फळ मिळते . परंतु , या ठिकाणी अशी घटना घडल्यानंतर कर्म सिद्धांत थोडासा विक्षिप्त वाटतो. कारण , चांगले कर्म  करणाऱ्याच्या वाट्यालाही अशी परिस्थिती निर्माण व्हावी. याला योगायोग समजावा की दुर्दैव समजावे. धार्मिक कर्म सिद्धांत थोडासा बाजूला ठेवला तर विज्ञान युगात वावरत असताना सत्य कडू जरी असले तरीही ते मान्य करावेच लागते. सूर्य कधी तळ हाताने झाकता येत नाही. अगदी त्याचप्रमाणे विज्ञान युगात मशिनरी किंवा स्फोटकांशी खेळत असताना चुकीला माफी नाही हे सिद्ध होते. मग ती चूक कळत नकळतपणे का असेना चूकच सिद्ध होते. त्या ठिकाणी कोणाचीही गय केली जात नाही. अशा गोष्टी घडल्या म्हणजे आपण त्याला निव्वळ योगायोग किंवा प्रारब्ध असे समजतो प्रत्यक्षात मात्र वास्तव वेगळे असते म्हणून प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी.

शेतकऱ्यांना आवाहन... 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे.... असे म्हणत असताना आपण त्या वृक्षांची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे शेतातील बांध पेटवत असताना वृक्षलगत न पेटवता त्या ठिकाणी खुरपणी करून गवत काढावे. त्यामुळे त्या वृक्षाची निगा राखली जाईल. परिसरातील सर्व शेतांमधून चक्कर मारत असताना बरेचसे लिंबाची झाडं जळालेली ही आढळली. त्यामुळे निसर्गाची खूप मोठी हानी होते. अशा प्रकारची हानी होऊ नये म्हणून, बांधावरील गवत पेटवताना काळजी घ्यायला शिका.  शेतकऱ्याच्या बांधावरील झाड कधीही तोटा देणार नाही त्याचा फायदाच करून जाईल.


📝#Rahul Dongardive




शनिवार, २० मे, २०२३

नोटबंदी - Demonetisation 2.0

 

8नोव्हेंबर 2016 रोजी रात्री ठीक आठ वाजता सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संबोधत असताना रात्री बाराच्या नंतर 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद होणार..अशी घोषणा केली आणि पाचशे रुपयांच्या एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्या. भारतामध्ये पंतप्रधानाच्या संबोधनानंतर प्रत्येकाची धावपळ आणि धांदल उडाली. नोटबंदी करत असताना, पंतप्रधानांनी काळा पैसा याविषयी सविस्तर विवेचन केले होते. काळ्या पैशाचे दुष्परिणाम किती भारतासाठी घातक आहेत ? याची बाजू मांडत असताना लोकांच्या अशा पल्लवीत केल्या गेल्या. लोकांना भविष्यासाठी पारदर्शक भारत तर दाखवला. त्याचबरोबर सामान्य कुटुंबापासून मध्यमवर्ग व व्यापार उद्योगातील वर्ग राष्ट्रीय कर प्रणाली मध्ये आणण्यात आला . कोणतीही वस्तू खरेदी पासून ते मोठमोठ्या वस्तूंपर्यंत राष्ट्रीय  कर प्रणाली द्वारे देशाची आर्थिक सुबत्तता आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचे योग्य असे मार्गदर्शन  देशाल परिस्थितीनुसार  देण्यात आले.


पंतप्रधानाच्या उद्घोषनेनंतर दुसऱ्या दिवसापासून बँकांमध्ये रांगाची रांगा लागल्या. सामान्य माणसापासून श्रीमंत माणसापर्यंत प्रत्येकजण बँकेच्या दारामध्ये असणारी पुंजी बदलण्यासाठी बँकेमध्ये  खेट्या मारू लागला. अनेक लोकांना आपले प्राणही गमवावे लागले ,ही  दाहकता मनाला संवेदनशील बनवते. नोटबंदी झाली आणि कमिशन एजंट चा भस्मासुर प्रत्येक बँकेच्या दारामध्ये पाहायला मिळाला. नोटबंदी मध्ये मोठा बदलण्यासाठी काही बंधन होती. त्यामुळे सामान्य माणसाचे हाल झाले . ही वस्तुस्थिती जरी असली, तरीही गडगंज संपत्ती वाले माणसं कोणी बँकेच्या दारात उभा राहिलेला आपण पाहिला नाही. घरपोहोच नवीन नोटा त्यांना मिळाल्या प्राप्त झाल्या.  पण सामान्य माणूस रांगांमध्ये उभा राहून व्याकुळ झाला होता. हे चित्र सर्व भारताने पाहिले अनुभवले.

नोटबंदी मधील प्रमुख दावा.... 

पंतप्रधानाच्या उद्घोषनेनंतर नोटबंदी झाली नोटबंदी का करण्यात आली ? याचे स्पष्टीकरण स्वतः महोदयांनी दिले होते . त्यामध्ये प्रथम कॅशलेस इकॉनॉमिचा प्रचार व प्रसार करण्यासाठी डिजिटायझेशन किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यात आले. त्याचा परिणाम आज आपल्याला दिसत आहे. खेडोपाडी डिजिटायझेशन झाले की, वस्तुस्थिती आहे. त्यानंतर दुसरा दावा करण्यात आला होता. नकली चलनावर लगाम घालण्यात येईल शासनाची भूमिका ठाम आणि कौतुकास्पद होती.परंतु, डिजिटायझेशनच्या  जमान्यामध्ये झेरॉक्स मारलेल्या नोटा सुद्धा जनतेने अनुभवल्या . रियल इस्टेट मध्ये पारदर्शकता येईल असे सर्वांनाच वाटले होते . काही ठिकाणी यशही आले असेल . पण.....बहुतेक ठिकाणी पारदर्शकता ही फक्त कागदपत्रेच राहिली. प्रत्यक्ष व्यवहार होत असताना कसा होतो? कसा केला जातो? त्याची प्रत्यक्ष अनुभूती ही प्रत्येकाची वेगळीच आहे. त्यामुळे रियल इस्टेट पारदर्शक झाले असे म्हणता येणार नाही.



सर्वात महत्त्वाचा शासनाद्वारे प्रकाश झोतामध्ये येणारा मुद्दा म्हणजे, 'काळे धन', 'व्हाईट  कॉलर ' पेक्षा ब्लॅक मनी भारतात सर्वात जास्त आहे . हे खुद्द पंतप्रधानांनी सांगितले होते . हा काळा पैसा जर वापरात आला तर भारत हा विकसित राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही . त्याचबरोबर भारतातील प्रमुख समस्या असलेल्या सर्व गोष्टी या पैशाने सोडवता येतील . एवढेच काय तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये सुद्धा येऊ शकतात. निवडणुकी साठी अपप्रचार ही करण्यात आला परंतु जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा हा काळा पैसा गेला कोठे ?  कारण आरबीआयच्या सर्वेनुसार आणि आकडेवारीनुसार जवळपास 99% च्या वर बँकेमध्ये पैसा जमा झाला . मग हा काळा पैसा गेला  कोठे ? या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. नोटबंदीमुळे टॅक्स प्रणाली वाढणार यामध्ये वाढ सुद्धा झाली . परंतु शासनाचे दावे केले होते ते पूर्णपणे फलप्राप्तिस उतरले का ?याची शाश्वती देता येत नाही.

आरबीआय ने दोन हजार रुपयाच्या नोटा वितरणातून काढून घेतल्या... नोटबंदी नाही! 

19 मे 2023 रोजी आरबीआय ने केलेल्या घोषणेनुसार दोन हजार रुपयाच्या नोटा वितरण व्यवस्थेतून काढून घेण्यात आल्या आहेत,असे सांगण्यात आले . त्यानुसार दोन हजार रुपयाची नोट वितरण व्यवस्थेतून संपुष्टात आली. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रत्येकाला ह्या नोटा बँकेत जमा करता येतील. परंतु, एका व्यक्तीला फक्त दहा नोटा बदलता येतील, त्यापेक्षा जास्त नोटा एक व्यक्ती बदलू शकत नाही. आरबीआय ने हे नियम घालून दिले.

आरबीआय या ठिकाणी स्पष्ट करते की, ही नोटबंदी नसून दोन हजार रुपयांच्या नोटा फक्त वितरण व्यवस्थेतून काढून घेण्यात आल्या आहेत. त्याची कारण  समोर करत असताना पुढील काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात. कारण गुलाबी नोटांची छपाई 2019 पासूनच बंद केली गेली होती.

1. दोन हजार रुपये नोटा छापण्याचा उद्देश वेगळा

सदरील मुद्द्यांचे स्पष्टीकरण असताना आरबीआय सांगते . दोन हजार रुपयाच्या नोटा छापण्याचा उद्देश हा वेगळा होता. नोटबंदीनंतर व्यवहारातील प्रमुख मोठा असणाऱ्या पाचशे रुपये व एक हजार रुपये यांची तूट भरून काढण्यासाठी मोठ्या रकमेची नोट छापण्यात आली होती. त्याचबरोबर पाचशे रुपयांच्या एक हजार रुपयाचे नोटा अचानक व्यवहारातून बंद झाल्यास त्याचा खूप मोठा परिणाम जनतेला सोसावा लागला असता. परिणाम कमी होण्यासाठी म्हणून गुलाबी नोट छाटण्यात आली होती.

2. गुलाबी नोटांचे आयुष्य संपले

आरबीआय पुढे जाऊन हेही स्पष्ट करते की दोन हजार रुपयांच्या  नोटांचे आयुष्य हे फक्त चार ते पाच वर्षांचे होते आरबीआयने 89 टक्के नोटा वितरित केल्या होत्या. गुलाबी नोटाचे आयुष्य संपल्यामुळे त्या वितरण व्यवस्थेमध्ये जास्त दिवस ठेवता येणार नाही.त्यामुळे गुलाबी नोट वितरण व्यवस्थेतून  काढून घेण्यात आली आहे . 

3. चलनामध्ये गुलाबी नोटांची संख्या कमी झाली.. 

वितरण व्यवस्थेतील वितरणानुसार दोन हजार रुपयांच्या नोटा ज्या पद्धतीने वितरित केल्या होत्या त्या प्रमाणात त्या चलनामध्ये राहिल्या नव्हत्या याचा अर्थ त्याचा कुठेतरी साठा केला गेला असावा 31 मार्च 2018 रोजी 6.73 लाख करोड रुपयाच्या नोटा वितरीत केल्या होत्या एकूण नोटांच्या तुलनेत त्याची हिस्सेदारी 37.3% होती वितरित हिसेधारीनुसार प्रत्यक्ष त्याचा व्यवहारातील उपयोग खूपच कमी झाला होता तो फक्त 10.8 % राहिला होता.

4. गुलाबी नोटांचा उद्देश पूर्ण झाला

नोटबंदी नंतर ज्या उद्देशासाठी गुलाबी नोटा छापण्यात आल्या होत्या अर्थात दोन हजार रुपयाची नोट तो उद्देश पूर्ण झाला . पाचशे रुपये आणि 1000 रुपयाच्या नोटा यांच्या वितरण व्यवस्थेतील नोटबंदीमुळे जनतेला जो नाहक त्रास होणार होता . तो त्रास दूर करण्यासाठी आरबीआय ने 2000 च्या नोटा छापून वितरित केल्या होत्या. त्यामुळे भारतातील आर्थिक तूट निर्माण झाली नाही नोटबंदी यशस्वी झाली.

5. दोन हजार रुपयाची नोट चलनात कमी झाली

आज पाचशे रुपयांच्या आणि इतर नोटांचा मुबलक प्रमाणात असणारा उपयोग हा योग्य पद्धतीने होतो आहे . दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामध्ये कमी जरी असल्या तरी त्याचा परिणाम हा कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे इथून पुढे दोन हजार रुपये नोटांची गुलाबी नोटांची गरज नाही असे या ठिकाणी आरबीआय स्पष्ट करते.

आरबीआय ने दिलेल्या स्पष्टीकरणातून सत्यता जरी समोर येत असली तरीही, गुलाबी नोटा वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. बँकेच्या वर्किंग डे मध्ये पुन्हा आपल्याला एकदा नोटबंदीचे चित्र पाहायला मिळेल . बँकेच्या दारासमोर रांगाची रांगा लागलेल्या दिसतील . ह्या रांगा नोटबंदी इतक्या नसतील. हे तितकेच खरे . ह्या नोटा सुद्धा सामान्य लोकांकडूनच बदलून घेतले जातील . कोणतेही  धनिक लोक बँकेच्या दारात दिसणार नाहीत . गुलाबी नोट वितरणातून काढून घेतल्यानंतर गुलाबी नोटांचा साठा कमी होईल . असे असले तरीही, त्या रिकाम्या झालेल्या जागेची जागा पुन्हा दुसऱ्या नोट घेतील ही मानसिकता कधी बदलेल कोणीही सांगू शकत नाही.

#📝Dongardive Rahul. 




मंगळवार, १६ मे, २०२३

The Kerala story - A conspiracy

 


स्त्री एक उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. संकुचित प्रवृत्तीने अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवणे आधुनिक युगा नुसार जरी अयोग्य असले, तरीही आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्या प्रकारचा विचार, मानव प्रवृत्ती मध्ये दिसून येतो.  यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण, प्रस्तुत प्रकरणांमध्ये जेव्हा जेव्हा मानवी अस्मितेची भावना निर्माण होते, तेव्हा..तेव्हा, मानव म्हणून मानवतावाद आणि मानवता याचा विहंगम दृश्य रंगवताना आजचे सुधारणावादी लोक आपण पाहतो.   तेव्हा मात्र वास्तव हे वेगळेच आहे.कारण  बोलणे आणि कृती करणे यात जमीन आसमानचा फरक आहे. स्त्री विषय असणाऱ्या मानव विकृती , ही जेवढी गंभीर तेवढीच भयंकर आहे . सुधारणावादी विचार मांडत असताना किंवा करत असताना समाजाकडे आपण सहज अंगुली निर्देश करतो. पण आपणही त्या समाजाचा एक बिंदू आहोत हे विसरतो. स्त्री विषयी हीन भावना आजही बदलत नाहीये. तिचे स्वरूप समाज व्यवस्था ,जातीय व्यवस्था, धर्म व्यवस्थापन व्यवस्था यामध्ये रुजलेले आपण पाहतो. फरक एवढाच आहे प्रत्येक जण आपली भूमिका आणि इतरांची भूमिका यात भेद करतो आहे. त्यानुसार आपण कसे वेगळे आहोत . असा ससे मीरा मिरवताना आपण पाहतो किंबहुना भ्रमनिरासपणे मृगजळ दाखवतो. याचाच परिपाक आणि पक्व हेतू म्हणजे, 'द केरला स्टोरी होय.'

प्रस्तुत चित्रपटांमध्ये ही कथा पूर्णपणे एक 'कट 'आहे. चित्रपट एका नर्सिंग कॉलेजमध्ये सुरू होतो. त्या ठिकाणी त्यांना समाजसेवा , समाजाप्रती आपली बांधिलकी आणि कर्तव्य शिकवले जाते. त्यानुसार त्या मुली कार्यही करतात अर्थात शिक्षणात सुरू होते.  नरसिंग चे शिक्षण घेत असताना तीन मैत्रिणी त्याचबरोबर एक चौथी मैत्रीण सुद्धा त्यांना मिळते. शालिनी उन्नीकृष्णन  अर्थात फातिमा, निमा ,असिफा, गीतांजली या चार मैत्रिणी. नर्सिंग चे शिक्षण घेण्यासाठी एकत्र आलेल्या, एकाच रूम मध्ये राहतात. चौघींचीही कॉलेजमध्ये एन्ट्री होते . शालिनी,  निमा आणि गीतांजली या नवख्या मैत्रिणी एकत्र राहत असताना त्यांच्यासोबत असणारी 'असिफा' ही देखील नर्सिंग शिक्षण घेत होती. चित्रपटांमध्ये असिफाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. कारण ,यांच्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात राबवणारी आणि त्या गोष्टींना योग्य प्रकारे वळण देणारी, कट रचनारी व इस्लाम धर्म विषयीचा सकारात्मक ब्रेन वॉश करून 'अल्ला' कसा मोठा आहे. याविषयी आपली भूमिका आणि सकारात्मक पाऊल पुढे उचलताना  इसिसचे संबंधित दाखवली आहे. आय. एस. आय. एस. म्हणजेच, 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' या ठिकाणी अशा बळी पाडून आणलेल्या स्त्रियांना भरती केले जात असायचे. तेव्हा इसिसचे महत्त्व  आणि इतर धर्म कसे तुच्छ आहेत . 'अल्लाह' एकमेव महान आहे. याची व्याख्याने देताना असिफा  चित्रपटात दिसते.

शालिनी असिफाच्या चर्चेने आणि दिलेल्या व्याख्यानाने एवढी प्रभावित होताना दिसते की, आशिफाचे बोलणे शालिनीच्या गळी लवकर उतरते. आसिबाच्या प्रत्येक बोलण्यावर ती लक्ष देऊन ऐकते . शरीयत कानून जाणून घेण्याचा प्रयत्न करते, काही दिवसाच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. दिवाळीच्या सुट्टी असतील किंवा इतर सुट्ट्यांमध्ये शालिनीचे गाव दूर असल्यामुळे ती जास्त करून गावी जात नसायची. असिफा  मात्र तिला आपल्या घरी घेऊन जात होती. ईद असेल किंवा इतर सणांच्या दिवशी आसिफा- शालिनी, निमा, गीतांजली एकत्र येऊन सर्व परिवारासोबत सण उत्सव साजरा करत असत. जेव्हा संधी भेटेल तेव्हा असे असिफा मात्र मुस्लिम धर्म कसा श्रेष्ठ! आणि अल्लाह कसा महान आहे.  याची एकही संधी सोडत नव्हती. दोन हिंदू आणि एक ख्रिश्चन मैत्रीण असणारी फक्त असिफाच बोलणं ऐकून घेतात. मुस्लिम धर्माच्या अनुकरणाचा किंवा त्यानुसार बदल करण्याचा त्यांच्यामध्ये कोणताही लवलेश दिसत नाही. तेव्हा मात्र या तिघी जनीची पूर्वनियोजित कटकारस्थानानुसार एका दुकानांमध्ये वस्त्रे फाडली जातात. त्यांना खुलेआम- चेतावणी दिली जाते. एवढ्या मोठ्या दुकानांमध्ये कोणीही त्यांच्या मदतीला येत नाही. त्यामुळे तिघेही खचून जातात. तेव्हा ही गोष्ट असिफाला कळते .  तेव्हा मात्र  ती हिजाब अर्थात बुरखा महत्त्व समजावून सांगते . बुरखा तुम्ही घातला असता तर , तुम्हाला कोणीही छेडले नसते. तेव्हापासून तिघी हिजाब घालायला सुरुवात करतात. 


हिजाब जेव्हापासून या तीन मुली घालायला सुरुवात करतात, तेव्हापासून त्यांची कोणीही छेड काढत नाही.तेव्हा मात्र शालिनी पूर्णपणे इस्लाम  धर्माकडे झुकलेली दिसून येते . तिची ओळख  संबंधित असणाऱ्या कथित डॉक्टर भावाबरोबर होते. याच ठिकाणी आपल्याला ' लव्ह जिहाद',  दिसून येतो . कारण , घडणारी स्टोरी ही पूर्वनियोजित कटकारस्थान दिसून येते . त्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढून घेण्यासाठी त्या मुलांना हवे ती रक्कम व नको ते स्वातंत्र्य दिले गेलेले असते . त्यावरच पुढील पैसा त्यांना ठरलेला असतो .  पूर्णपणे एक धर्म मोठा आणि बाकीचे सगळे छोटे कसे आहेत? त्याची विचारधारा कशी अचूक आहे ? हे त्यांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. इथे एक प्रश्न पडतो, एवढ्या सुशिक्षित असणाऱ्या मुली, चांगल्या घराण्यातील मुली यांच्या विरोधात एखादं कटकारस्थान केलं जातं. तरीही त्यांच्या लक्षात येत नाही . ही गोष्ट मात्र थोडी विरोधाभासात्मक वाटते.

परत एकदा एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जी मुलगी आपल्या प्रियकरापासून गरोदर राहते , तोच प्रियकर अचानक गायब होतो. शालिनी अर्थात फातीमाच्या अब्रूची लुटा लुट करून इज्जतीची लक्तरे वेशीला टांगतो. काही दिवसानंतर आपला प्रियकर आपल्याला सोडून गेला, तेव्हा मात्र ती अत्यंत खचून जाते. जीवन संपवावेसे वाटते ,आपण फसलो याची तिला जाणीवही होते . घरचे आपणास स्वीकारणार नाही , दोष द्यायचा कुणाला? आणि याच्यावर उपाय काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र तिला शोधूनही मिळत नाही. शेवटचा पर्याय म्हणून  मौलवींचे मार्गदर्शन घ्यावे . यासाठी ती मुलगी जाते . इज्जत जाऊ नये म्हणून मौलवींच्या सांगण्यानुसार दुसऱ्या तरुणाला आपला पती मानते . मौलवींचे  शब्दही तितकेच प्रखर आणि करारी असतात , ' निकाह  अगोदर प्रियकरा बरोबर आलेल्या संबंधातून जे आपत्य पोटात वाढत आहे हे पाप आहे.  हे पाप धुऊन काढण्यासाठी एका नवीन पुरुषाबरोबर निकाह करणे आणि त्याच्याबरोबर भारतात बाहेर सीरीयाला जाणे हा एकमेव पर्याय मौलवी देतात. याला अंधश्रद्धा म्हणावे की धर्मांधता ? 



जो 'अल्लाहशी' काफीर होतो, जो काफीर असतो तो पापी असतो त्याच्यातून जर मुक्ती मिळवायचे असेल तर काफीर झालेल्या व्यक्तीला दगडाने मारावे किंवा त्याच्या तोंडावर थुंकावे तरच अल्ला नाराज होत नाही तो खुश होतो अशी दाहक प्रतिमा गीतांजलीच्या समोर उभी करून मृत्यूच्या दारावर उभा असणाऱ्या पित्याच्या तोंडावर गीतांजली थुंकते आणि काल्पनिक असणाऱ्या पापातून मुक्ती पाण्याचा केविलवाणा प्रयत्न करते. ही तिची आपल्या धर्माविषयी अर्थात नवीन धर्माविषयी आपुलकी आणि ओढ होती, हे इथे निश्चित होते. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करावे ,त्याच्यासाठी माता, भगिनी, वडील यांचा त्याग करून मुस्लिम धर्म स्वीकारावा . इसिसमध्ये समाविष्ट व्हावे. यासाठीचे प्रयत्न जेव्हा तिच्या लक्षात येतात, तेव्हा मात्र तिची नग्न चित्रे सोशल मीडियावर व्हायरल करून तिच्या घराची, तिची इज्जत चव्हाट्यावर आणली जाते ..तेव्हा मात्र आपण या कटामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालो आणि आपला मार्ग चुकला याची जेव्हा तिला जाणीव होते.तेव्हा मात्र, जग संपलेला असतं.कारण , समाज काय म्हणेल ? आपल्या इज्जतीचा चोळामेळा आपल्या प्रियकराने असे सार्वजनिक करावा.. त्याचा तिला एवढा पश्चाताप होतो की, जवळच असलेल्या हिजाबने गळफास घेऊन आत्महत्या करते. शेवटी पर्याय उरलेला नसतो.

चित्रपट हा वस्तुस्थितीशी संबंधित आहे  किंवा जवळीकता आहे. असे असले तरीही चित्रपटात पूर्ण राजकारण दिसते आहे. कम्युनिस्ट कार्यकर्ता व्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टीचा विचार करताना स्वतःच्या मुलीला धर्माचे शिक्षण देत नाही ही बाब प्रकर्षाने दाखवली आहे. त्यामुळे तिच्यावर संस्कार रुजले नव्हते. म्हणूनच तिच्यावर इस्लामी धर्माचा प्रभाव पडला, अशी झलक पाहायला भेटते.



वरील तीनही मुली जेव्हा धर्म शिक्षण घेतात तेव्हा त्या ठिकाणी इतरही मुली असतात. त्यांचेही तीच काम असते, त्यांनाही असंच फसवलेलं असतं,अशी भाग्यलक्ष्मी सांगते. असं निष्पाप मुस्लिम मुलावर प्रेम करणाऱ्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींची अशीच फसवणूक झालेली या चित्रपटातून दिसते. सुरुवातीला ह्या मुलींना लव जिहादच्या नावाखाली आणि  इसिसच्या  भरती करिता कसे ब्रेनवॉश केले जाते. याचीसुद्धा एक कूटनीती आणि पूर्वनियोजित षडयंत्र पावलो पावली दिसून येते. सुरुवातीच्या प्रेमलीला मात्र जेवढ्या सुखद आणि आल्हाददायी चित्रित केलेले आहेत, त्यापेक्षा भयंकर त्या मुलींची भरती  इसिस मध्ये होते.तेव्हा मात्र, त्यांच्यावर एका वेळेला अनेक जण बलात्कार करताना दिसतात. हवस भागवण्याची ती एक मशीन म्हणूनच तिचा वापर केला गेला. जिन विरोध केला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला तिच्या डोक्यात गोळीच दिसली! !आधुनिक युगामध्ये मोबाईल बंदी आहे , हा आश्चर्यचकित करणारा  विषय . त्याचबरोबर ज्यांनी वापरला ,त्या महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आलेली आहे . ही एक अत्यंत निंदनीय बाब असून स्त्री स्वातंत्र्यावर मोठा घाला आहे. शालिनी गरोदर असताना तिच्यावर केलेला बलात्कार  अत्यंत निंदनीय वाटतो. मानवतावादी दृष्टिकोनाला एक मोठी चपराक  आहे. असे दुष्कृत्य होत असेल तर मग 'अल्लाह'चा अनुयायी तो खरच आहे  का? 

चिंतन... 

 वरील सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते, प्रत्येक समस्या ही निर्माण होत असते. पण....ती समस्या अंतिम असू शकत नाही. सुशिक्षित असणाऱ्या मुली छोटीशी कट रचना त्यांच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्ष देते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग आत्महत्या  शिवाय दुसरा पर्याय उरत नाही . म्हणून ,सर्व सुजाण मुलींनी प्रलोभनाच्या पाठीमागे किंवा दिखाउ सौंदर्याच्या पाठीमागे न लागता ,आई-बाबांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासावर विश्वास ठेवून त्यांच्या विश्वासांना तडा जाता कामा नये असे वर्तन करावे. ज्यामुळे आई-बाबांना गर्व वाटेल, देशसेवा ,समाजसेवा आणि समाजाप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आलेल्या संधीचे सोने करावे  अशी शिकवण मनी बाळगावी . शंभर लोक म्हणतात म्हणून, ते सत्य आहे . ही गोष्ट टाळावी . स्वतःच्या मनपटलावर उमटणाऱ्या छटा चांगल्या किंवा वाईट सत्याची सचोटीवर त्या उतरतात किंवा नाही. दूरदृष्टीचा विचार ठेवून पावले उचलली तर, ती व्यर्थ जाणार नाही असा विश्वास वाटतो . जगातील असा कोणताही धर्म नाही जो वाईट शिकवण देतो. प्रत्येक धर्म हा प्रेम शिकवतो, दया , करुणा, माया- ममता या सर्व धर्मामध्ये नीती पाहायला मिळतात . फक्त मांडणी आणि संरचना वेगळे असू शकते . पण प्रत्येक धर्माचे हित आणि सार मानव कल्याण हेच आहे. यावरून स्पष्ट होते . कोणताही धर्म मानवहिताशी किंवा मानव देहाची खेळत नाही . तो फक्त 'मानव कल्याण ' समर्पित आहे. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.

अशा घडलेल्या, मानव कल्याणाच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या घटना  निंदनीय आणि कलंकित जरी असल्या तरी, त्याचे योग्य मार्गदर्शन करून उपाय शोधणे काळाची गरज आहे. पण जेव्हा जेव्हा राजकीय पक्ष चित्रपट प्रमोट करतात.  काही राज्यांमध्ये बंदी होते तर, काही राज्यांमध्ये टॅक्स फ्री साठी मागणी केली जाते . एवढेच काय तर राजकीय लोक चित्रपट  गृहे बुक करतात. म्हणजेच प्रेक्षकांना फुकट सिनेमा दाखवतात आणि तेही कुठेतरी राजकारण , प्रचार, प्रसार आणि निवडणुका  तोंडावर , असं होतं. निश्चितच ही  लांच्छनास्पद बाब आहे.


# 📝डोंगरदिवे राहुल






गुरुवार, ११ मे, २०२३

इम्रान खान अटक,गृहयुद्ध ,सुटका !

इम्रान खान अटक - गृहयुद्ध - सुटका



पाकिस्तानातील सद्यस्थिती व श्रीलंकेतील राजसत्तेच्या विरोधात घडलेली घटना यावरून एक गोष्ट लक्षात येते, "सत्ते पुढे शहाणपण चालत नाही." अशी एक प्रचलित म्हण आपल्याकडे आहे. असणारी म्हण ही निश्चितच योग्य आहे . एखादी विनाअंकुश  सत्ता स्वैराचारी  कारभार करत असेल तर उलथवून टाकण्याची क्षमता जनतेमध्ये असते जगामध्ये जेव्हा जेव्हा राजसत्ता अनाचार करते दुराचार करते सत्तेचा गलथान कारभार सुरू होतो तेव्हा तेव्हा जनतेने राज सत्तेला जागेवर आणण्यासाठी सत्तेची सूत्रे मोर्चा आणि आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःच्या हाती घेऊन लोकशाहीवादी मार्गाने आगे कूच करण्याचा प्रयत्न केला आहे मोठमोठ्या क्रांत्या झाल्या क्रांती होऊन शतकोन व शतके गेली. क्रांतीतून निर्माण झालेली गोड बीज आजही जगाने जोपासताना पाहिली इथून पुढे कित्येक वर्ष मानव जातीच्या अस्तित्वापर्यंत राहतील यात शंका नाही.

पाकिस्तान हे एक छोटसं राष्ट्र .  विकासासाठी धडपडणारा देश म्हणून जगाच्या पाठीवर त्याची ओळख. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये अनेक सत्ता आल्या गेल्या . सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे , जी सत्ता अस्तित्वात येते, ती सत्ता उद्या संपणार आहे. हे शाश्वत सत्य जरी असलं, तरीही निर्माण होणारच सरकार पहिल्या सरकार प्रमुखाला एक तर देश सोडायला भाग पाडतोय किंवा पूर्व पंतप्रधानांची हत्या होते. अशी पाकिस्तानची व नेतृत्वाची कहाणी सर्व जगाने पाहिले. एखादा मोठा नेता मृत पावतो किंवा त्याची हत्या होते? मीडियाच्या माध्यमातून किंवा सत्तेच्या माध्यमातून एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप केले जातात. त्यामध्ये कितपत शाश्वत सत्यता आहे हे पडताळून किंवा संशोधन करण्यापेक्षा पंतप्रधान होणारा नेता मात्र गमावला जातो हे दुर्दैव.


पाकिस्तानच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी नुसार नवोदित पंतप्रधान म्हणून  शहबाज शरीफ यांची 11 एप्रिल 2022 ला निवड झाली. नवीन पंतप्रधान म्हणून शहबाज शरीफ यांची सत्ता सुरू झाली.
पाकिस्तानच्या हिताचा किंवा विकासात्मक विचार करण्यापेक्षा ' गतवैमानस्य'  त्या एका गोष्टीने ग्रासलेल्या सर्वच पंतप्रधानांना सूडबुद्धी सुचते आणि तो सुडाने पेटून उठून पायउतार झालेल्या माजी पंतप्रधानांवर नको ते आरोप करून अथवा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याला सिद्ध करून सोयीनुसार कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते व त्यानुसार त्याला एक तर देश सोडून जाणे भाग पाडले जाते. हीच ऐतिहासिक परंपरा पुढे सध्याचे असणारे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राबवलेली दिसते

23 वे पंतप्रधान म्हणून आपली नावलौकिकता मिळवण्यापेक्षा त्यांनी सूडबुद्धीचे राजकारण सुरू केले आणि पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना 'अल कादिर ट्रस्ट ' साठ अरब रुपये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कायदेशीर पद्धतीने 9 मे 2023 रोजी दुपारी तीन वाजता पाकिस्तानी रेंजर्स करून अटक करण्यात आली. त्यांना पकडून पोलीस पथकाच्या गाड्यांमध्ये बसवताना सर्व जगाने पाहिले. इम्रान खान जेलमध्ये गेले खरे पण पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे नुकसान इमरान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानला आपल्या घरातूनच सोसावे लागले. पाकिस्तानच्या इतिहासामध्ये याची 'काळा दिवस' म्हणून नोंद केली जाईल. परकीय आक्रमणांपेक्षा घरगुती आक्रमणाने पाकिस्तान होरपळतो आहे, जळतो आहे, रस्त्यावरती अग्नि तांडव सुरू आहे. अगोदरच  अनेक समस्याने बळी ठरलेला पाकिस्तान काही दिवसापूर्वी रेशन साहित्य पळवताना आपण पाहिला. महागाईचा उच्चांकही पाहिला. सर्वसामान्यांचे जीवन अत्यंत दयनीय झालेले सर्व जगाला दिसत आहे. श्रीलंके पेक्षाही भयंकर परिस्थिती पाकिस्तान मध्ये आज पाहताना सर्वजण अवाक होतात .  पर्याय हा तेथील जनताच करू शकते. लोकशाही पद्धतीचे सरकार या देशाला उन्नतीकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती जोपर्यंत तेथील मिल्ट्री च्या लक्षात येत नाही. तोपर्यंत ते अशक्य आहे. कारण आज पर्यंत कोणाचेही सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. ही दाहक वास्तविकता कोणीही नाकारू शकत नाही.

पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाली. ते चूक आहेत की बरोबर आहे हे तेथील न्यायव्यवस्था पाहिल. परंतु, राजकीय सुडापोटी पाकिस्तानातील येणारा सत्ताधीश कोणत्याही मार्गाने निरंकुश सत्ता हकतो. आतापर्यंत त्यांना यशही येत होते. जनता हे पूर्वीपासून पाहत होती. इमरान खान यांच्या अटकेनंतर मात्र पाकिस्तान मध्ये अराजकता, अनागोंदी ,स्वेराचार याची परिसीमा ओलांडली गेली. पाकिस्तान मध्ये प्रथम वेळ असेल जनतेने मिल्ट्री वर आक्रमण केले. बहुतेक ठिकाणी प्रत्येक सैनिकांना मारहाण करण्यात आली. आगीचे लोट, अग्नी तांडव करत होते. देशातील अंतर्गत कलह विकोपाला गेले होते. त्याचे पडसाद आजही तीन दिवसापासून जगाला दिसत आहे. प्रत्येक देशाने आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी अर्थात पाकिस्तान सोडण्यास सांगितले आहे. पेशावर, कराची, लाहोर रावळपिंडी अशा प्रमुख शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही जनता रस्त्यावर उतरलेले आणि जाळपोळ करणारी पाहतो. यावरून पाकिस्तानला योग्य तो धडा स्वतःहून शिकला पाहिजे अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तान मध्ये हा हा कार... 



पंतप्रधान इमरान खान यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानमधील अनागोंदी निर्माण झाली होती. ती हाताबाहेर बाहेर गेली होती. शहबाज शरीफ सरकारला त्यामध्ये अपयश येत होते . इम्रान समर्थकांनी पूर्ण यंत्रणा हातात घेतली होती. सैनिकांना ते कसलेही प्रकारचे भीत नव्हते, उलट पक्षी त्यांच्यावर आक्रमण करत होते. अटक करण्याच्या अगोदर इमरान खान यांनी दिलेले कारमधील बाईट हे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे होते. रावळपिंडी, पेशावर, कराची, लाहोर, पंजाब प्रांत पूर्णपणे आटोक्याबाहेर होता. रस्त्या रस्त्यावरील अग्नितांडव होते. लोक कोणाचेही ऐकत नव्हते. बेधुंदपणे मरणालाही भित नव्हते. सरकारी कार्यालय, सेना, रेडिओ टावर यांना टार्गेट करत होते. जिना हाऊस तर राख करून टाकले होते. इस्लामाबाद मध्ये तर गोळी आणि पेट्रोल बॉम्ब चे गोळे खुलेआम रस्त्यावर फेकताना लोक दिसत होते. रावळपिंडीमध्ये कोर कमांडर ची तोडफोड करण्यात आली. टोल नाके तोडण्यात आले. लाहोर मधील ऑडी शोरूम ला आग लावण्यात आली. पेशावर मधील रेडिओ टॉवर व बिल्डिंग आग लावण्यात आली. पेशावर ते इस्लामाबाद पूर्णपणे  आगीचे लोळ रस्त्या रस्त्यावर दिसत होते . त्यामध्येच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जनतेला संबोधन करत असताना, अल  कादिर ट्रस्टच्या साठ अरब रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे सांगितले. न्यायालयीन कोठडी मध्ये आठ दिवसाची रिमांड देण्यात आली. ह्या संवेदनशील घटना एकापाठोपाठ एक घडत होत्या. तसा पाकिस्तान पेटत होता. नियंत्रणाच्या बाहेर जात होता. रस्त्यावरील अनेकांच्या गाड्या जाळल्या जात होत्या आणि सरकारी कार्यालयांना जनतेकडून लक्ष केले जात होते. सत्ताधारी पक्षाने कारवाईची सीमा ओलांडली होती. अनेक निरपराध लोकांचे बळीही गेले.



अल्पायुषी पंतप्रधान... 

पाकिस्तानच्या प्रारंभिक पासून ते आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाला आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्याला इतिहास साक्षी आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर बसणारा व्यक्ती हा सुरक्षित आहे का असुरक्षित ? हा मोठा प्रश्न भेडसावताना दिसतो. कारण, पंतप्रधान या पदावर बसणारा माणूस ज्या दिवशी बसला त्या दिवसापासून त्याच्या विरोधामध्ये विश्वासघात सारखा त्याचा पाठलाग करत असतो. एक पक्ष असो किंवा दुसरा पक्ष असो, पक्षांतर्गत सुद्धा बंडाळी झालेली आपल्याला पाहायला मिळते पूर्वाश्रमीचा  तो मुस्लिम लीग हा पक्ष सुद्धा असो अनेक प्रकारची विश्वासघाताची किस्से पाकिस्तानच्या राजकीय सत्तापटलावर उमटलेली आपण पाहतो. सैन्य , सरकार हा पाकिस्तानचा सर्वात मोठा दुवा आहे.सैन्य ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे सत्ता बनते. त्यामुळे सैन्याचे प्राबल्य सत्तेवर जास्त प्रमाणात दिसते. पंतप्रधान हा लोकशाही मार्गाचा असल्यावर त्याला बाजूला सारण्याचे काम ही सैन्याद्वारे केले जाते. नवीन येणारा पंतप्रधान हा थोडाही लोकशाहीवादी निर्णय घेत असल्यास त्याला बाजूला सारण्याचे काम सैन्य करताना दिसत. परंतु देशाच्या विकासासाठी सर्वांनीच एक  भावना ठेवल्यास विश्वासघात आणि हत्या हे शब्द खूप दूर जातील अशी आशा बघायला हरकत नाही.

पन्नास तासानंतर इम्रानची सुटका... 



9 मे 2023 रोजी पाकिस्तानी पूर्व पंतप्रधान इम्रान खानला अटक केल्यानंतर 75 वर्षाच्या काळामध्ये जेवढे नुकसान अंतर्गत बंडाळीमुळे किंवा गृहयुद्धामुळे झाले नसेल तेवढे नुकसान पाकिस्तानला सोसावे लागले . तरीही सद्यस्थितीमध्ये असणारे पंतप्रधानांनी सैन्याच्या बळावर आरोपीला कठोर सजा झाली पाहिजे . असा पवित्रा घेतला होता. अटकेनंतर देशाची स्थिती अत्यंत  दयनीय बनली होती. यावर सैन्य आणि पंतप्रधान विचार करत नव्हते. यावर विचार शेवटी सर्वोच्च न्यायालयाला विचार करावा  लागला. सर्वोच्च न्यायालयाने जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी निरपराध लोकांचा बळी जाऊ नये. म्हणून, आज 11 मे २०२३ इमरान खानची सुटका केली. पाकिस्तान इतिहासामध्ये पहिली वेळ आहे , त्या ठिकाणी आतापर्यंतच्या विश्वासघात सत्रामध्ये इमरान खानला यश आले. त्याची सुटका करण्यात आली. आतापर्यंत पाकिस्तानच्या सत्तेने कोणालाही माफ केले नाही. मानव कल्याण, समाज हित यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय हा त्या देशासाठी योग्य असेल.

सर्व जगाचे कल्याण होवो हीच अपेक्षा.







सोमवार, ८ मे, २०२३

भूकंप - Earthquake

भूकंप - राजकीय अस्थिरतेचा


 

नैसर्गिक संतुलन ही निसर्गाने संतुलित ठेवण्यासाठी स्वनिर्मित स्वरचना आहे . या ठिकाणी कोणत्याही एका गोष्टीचा उद्रेक झाल्यास तिला नियंत्रित ठेवण्यासाठी निसर्गाने त्यावर उपायही निसर्गनिर्मित करून ठेवले आहेत . पृथ्वीच्या अंतरंगाचा विचार करताना भूकवच, मध्यावरण आणि गाभा अशी रचना आहे . पृथ्वीच्या पृष्ठभागावर निसर्गनिर्मित सजीव सृष्टी आहे. यामध्ये कोणी कोणावर आक्रमण जर करत असेल तर, त्या ठिकाणी निसर्गाचे संतुलन बिघडायला लागते आणि त्यानुसार निसर्गर त्याच्यावर उपाय योजना करतो.याचाच परिणाम म्हणून पृथ्वीवर येणारी सुनामी ही भूगर्भातील हालचाली अर्थातच भूकंपामुळे येतात.. भूकंपाची तीव्रता आणि दाहकता जशी पृथ्वीवर असणाऱ्या सजीवांना जाणवते ,त्यापेक्षाही तीव्र असे होणारे मानवनिर्मित भूकंप भयंकर असतात. एक भाग म्हणून आपण संवेदनशील या विषयाचा विचार करत असताना मानवनिर्मित अणुबॉम्ब त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा सहारक्षस्त्राने जीवित हानी तर होतेच , त्याचबरोबर त्याचे दुष्परिणाम शतकानू शतके भोगावे लागतात . गेल्या दोन वर्षापासून अशा प्रकारची दाहकता आपण पाहत आहोत . युक्रेन युद्धापासून जागतिक राजकारण ते प्रत्येक देशाचे राजकारण आणि त्याचा झालेला जगावर दूर गंभीर परिणाम सर्व जग अनुभवत आहे . जगाच्या बाबतीत अशा गोष्टी घडतात की,त्याचा प्रत्येक देशावर परिणाम होतो . परंतु भारत या देशांमध्ये जागतिक वातावरणाबरोबरच प्रादेशिक वातावरण व राजकारण, केंद्र व राज्य संबंध, राजकारणातील कूटनीती व त्यासाठी आखली गेलेली रणनीती ही काही आगळी वेगळीच आहे.

भारतातील एकंदरीत एकूण राजकारणाचा विचार केला असता, आपले एक गोष्ट सहज लक्षात येते की, चालू असलेली परिस्थिती पक्ष व विरोधी पक्ष यांच्यामध्ये एक प्रकारची एकमेकांची कुरघोडी करण्याचा प्रयत्न. अंतिम विचार हा कोणत्याही मार्गाने सत्ता प्रस्थापित करणे व ती सत्ता टिकवण्यासाठी आणि भविष्यात पुनरसत्ता प्राप्त करण्यासाठी नको त्या स्थराचे राजकारण गलिच्छ पद्धतीने कसे राबवले जाते, याची सीमा ओलांडताना आपण पाहतो. प्रत्येक जण माझंच खरं, पण खरं ते माझं कोणीही म्हणत नाही. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेला मीडिया मात्र 'गोदी मीडिया' म्हणून नावारूपास येत आहे . एखाद्या पत्रकारांना जर त्या विरोधात आवाज उठवला तर तो देशद्रोही संबोधला जातो . त्याच्यावर नको त्या एजन्सी वापर करून त्याला चांगलीच अक्कल घडवली जाते. असा सर्व विरोधी पक्षाचा सूर आहे..हे आपण दररोज भारतीय न्यूज चैनल वरून पाहत असतो . प्रत्येक राज्यामध्ये आपल्या पक्षाची सत्ता कशी आणायची व ती कशी टिकवायची याचा अत्यंत लेखाजोखा राजकीय पक्ष ठेवतात विचारसरणी व नैतिक मूल्य पायदळी तुडवतानाही कोणाला काहीही वाटत नाही. दोन्हीही बातम्या आपल्या मीडियातून दाखवल्या जातात . परंतु ,कोणत्या बातमीला किती महत्त्व द्यायचं? हे आपली मीडिया ठरवते. राष्ट्रहितापेक्षा व्यक्ति हित जास्त महत्त्वाचे वाटू लागले आहे. मान्य आहे प्रखर राष्ट्रवाद असू नये कारण त्यामुळे साम्राज्यवाद वाढ वाढतो . यातून सत्ता संघर्ष विकोपाला जातो हा सत्ता संघर्ष देशाच्या सीमा व इतर जागतिक मुद्द्यांशी संबंधित असतात. हाच सत्ता संघर्ष केंद्र आणि राज्य यांच्यात सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असते. 

भारतामध्ये बहुपक्ष पद्धती असल्यामुळे ,राष्ट्रीय राजकारणापासून प्रादेशिक राजकारणापर्यंत आपणाला अनेक प्रकारची राष्ट्रीय पक्ष ते प्रादेशिक पक्ष पहावयास मिळतात . त्यामुळे राष्ट्रीय पक्ष हा प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा किंबहुना कोठे कोठे निर्माण करण्याचा प्रयत्न परिस्थितीनुरूप केला जातो. असं म्हटलं जातं, केंद्राचे सरकार आहे ते राज्यात असलं म्हणजे, त्या त्या राज्याचा विकास होतो. या उलट जर विचार केला . केंद्रातील एक सरकारने राज्यातील विरोधी गटातील सरकार असल्यास त्या राज्याला मात्र त्रास होताना दिसतो आहे.

गत दोन वर्षाचा लेखाजोखा जर घेतला तर , सर्व न्यूज चॅनल वाल्यांनी महाराष्ट्रातील भूकंपाचा मोठा कांगावा केला होता. त्यानुसार सत्ता परिवर्तन ही झाले . राजकारणामध्ये डावपेच, कूटनीती आणि रस्सीखेच ही रणनीती जरी असली तरी , त्यानुरूप कार्य करणे मर्यादा ओलांडून नसावे . अशी ही धारणा असावी . याउलट राज्यातील वातावरण अस्थिर करून लोकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करणे आणि आमच्या शिवाय कोणत्याही राज्याला पर्याय नाही अशी सबब पुढे करणे . त्यानुसार जर परिवर्तन होत नसेल तर मात्र केंद्राच्या यंत्रणेतील असणारे एजन्सी याचा गैरवापर किंबहुना चांगला वापर कसा करायचा हे जो तो राजकीय पक्ष ठरवतो. कोणत्याही एका पक्षावर बोलायचं नाही. परंतु सरकार कोणाचेही असो त्यातील कमतरता शोधून जनतेसमोर मांडणे हा गुन्हा असू शकतो काय ? समाज हिताचे आणि राष्ट्रहिताची निर्णय सत्ताधारी पक्षांनी घ्यावे व त्यानुसार कृतीयुक्त कार्य पार पाडावे. ही त्या पक्षाची नैतिकता आहे. भारताच्या अखंडतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि त्यानुरूप पावले उचलणे ही भारतातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. निव्वळ टीका करायची म्हणून टीका करू नये. विरोधी आहात म्हणून विरोध करू नये. हा साधा सरळ नियम सर्वांनी पाळला तर , भारत विकसित झाल्याशिवाय राहणार नाही . 'विकसनशील ' शब्दातून आपण बाहेर पडू आणि हीच आपली खरी श्रद्धा आणि राष्ट्रवाद होय.

महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आणि सत्ता समीकरणांमध्ये जे काही बदल होत आहेत, हे अनपेक्षित जरी असले तरीही त्या त्या पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत. असं मतदान करणारी जनता चर्चा करत आहे . निवडणुका  होतात तेव्हा सर्वच पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतात , वचननामा प्रसिद्ध होतो . त्यानुसार जनता त्यांना निवडून देते. हेच लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा मात्र जनतेच्या मताला कसलीही किंमत राहत नाही . त्यांना हवे तसे ते वागतात कटपुतलीच्या खेळाप्रमाणे ते खेळ करून दाखवतात. त्यांना खेळवणारा दुसराच कोणीतरी असतो. अशा पद्धतीची ही लोकप्रतिनिधी काम करतात. कधी कधी पहाटच्या प्रहरीच शपथविधी होतो... आठ दिवसाच्या आत पुन्हा सरकार पडते . नंतर काही दिवसांमध्ये नवीन सरकार तयार होते. दोन अडीच वर्षानंतर पुन्हा तोच खेळ खेळला जातो . ज्या खेळामध्ये केंद्र सरकारच्या बाजूने पारडे  झुकलेले असते. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रादेशिक पक्षांना फोडले जाते, हे कामही प्रादेशिक पक्षातील इतर नेतेच करत असतात. त्यानुसार ते सत्ता हस्तगत करतात आणि राज्यकारभार सांभाळतात. भारतीय न्यायपालिका स्वतंत्र जरी असली, निर्णयाला मात्र वेळ लागतो. ही वस्तुस्थिती ! कारण, प्रत्येक पक्षाला  आपले हक्क आणि कर्तव्याची जबाबदारी पार पाडत असताना , न्याय मागण्याचा अधिकार हा आहेच . म्हणून दोन्हीही पक्ष न्यायालयात धाव घेतात आणि प्रकरण न्याय प्रविष्ट बनते. पक्षांतर बंदी कायदा हा सुद्धा न्यायप्रविष्ट बनतो. निर्माण झालेल्या संवेदनशील मुद्द्यांवरती, प्रविष्ट प्रकरणावरती निर्णयास विलंब लागतो . त्यामुळे राजकीय पक्षांची बाजू तात्पुरती का होईना पुढे जाण्यास अनुकूल बनते.

न्यायप्रविष्ट प्रकरण जेव्हा बॉर्डरवर येते तेव्हा, मात्र दुसरा पर्याय  शोधण्यास प्रारंभ होतो. इतर पक्षांची बहुमताचा आकडा काढण्यासाठी मदत घेण्यासाठी नेत्यांमध्ये  चढाओढ लागली असते. त्यामुळे नको त्या गोष्टींचा अवलंब राजकीय नेते करत असताना आपण महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. हा भूकंप मात्र रिश्टर स्केलवर मोजता येत नाही , या भूकंपाची दाहकता सहजासहजी लक्षातही येत नाही . पण ..त्याचे दूर गंभीर परिणाम येणाऱ्या काळावर पडणार असतात. याची गंभीर  दखल कोणीही घेत नाही. नंतर निवडणुका लागतील. पुन्हा तोच वचननामा जाहीरनामा यांची आश्वासने नवीन पद्धतीने मांडण्यात येतील. निसर्गाने सर्व मानवांना दिलेली 'विसरण्याची देणगी'  ही राजकीय लोकांच्या कामाला येईल.  पुन्हा नवीन राजकीय भूकंपाचे धक्के बसतील आणि पुढे कसे धक्के द्यायचे याचा विचार ही राजकीय लोक करून ठेवतात. नीती मूल्यांचा ऱ्हास होणारी राजकीय भूकंप आपल्याला नको आहेत.   "व्यक्ती पेक्षा देश श्रेष्ठ! " ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजल पाहिजे. प्रथम 'राष्ट्र' आणि नंतर  'आपण' अशी सकस विचाराची भावना प्रत्येकाच्या मनात असल्यास, राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय प्रत्येक जण घेतील. मतदानाचा अधिकार हा 'दान' म्हणूनच केला जावा. योग्य उमेदवारास योग्य मतदान दिल्यास देशाचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.



चला संकल्प करूया , 

विकसनशील या शब्दातून बाहेर पडूया ,

विकसित भारत घडवूया !!! 

जय हिंद!!जय भारत!!! 

Writer :- 🖊🖊🖊Rahul Dongardive 




Bhangar

Bhangar



वास्तविक पाहता शब्दरचना जरी अनोखी किंवा अज्ञात असली तरी जीवनाचे वास्तविक दाहकता खालील काव्यपंक्ती मधून होते.



वरवर बघता वाटत असेल,

याचा धंदा केवळ भंगार!

उपेक्षेच्या जगण्यालाही,

याने केला आहे शृंगार!


वजन कमी करण्यासाठी,

पाणी ओततो मुळावर!

आतमधे सजली माणसं,

अतृप्तीच्या सुळावर!


भंगारवाला नसेल तर,

बकाल होईल सगळं जग!

ए.सी.ची तर वृत्ती अशीच,

आत गारवा,बाहेर धग!


ओझं कमी करण्यासाठी,

ओतलं नाही वाटेल तिथं!

त्याचा सद् भाव ओतत गेला,

तहानलेली झाडं जिथं!


सावलीवरती हक्क सांगत,

झाडाजवळ थांबत नाही!

माझ्यामुळेच जगलंय असं,

स्वतःलाही सांगत नाही!


"निष्काम कर्म!"गीतेमधलं,

कळलेला हा पार्थ आहे!

"जीवन"देऊन,भंगार घ्यायचं,

केवढा उंच स्वार्थ आहे!


पाणी विकत घ्यायचं आणि,

अर्ध पिऊन फेकून द्यायचं!

कृतज्ञता/कृतघ्नता,

याचं भान केव्हा कसं यायचं?


डिग्री पेक्षा नेहमीच तर,

दृष्टी हवी अशी साक्षर!

भंगारवाला अंतर्धान नि,

अवतीर्ण होतो ईश्वर!


🙏🏻🙏🏻

Writer : unknown

सोमवार, १ मे, २०२३

विकृती - Distortion

 


माणसं माणसासाठी जगतात , माणसं माणसासाठी मरतात आणि तीच माणसं एकमेकांच्या सहवासातून निर्माण होणाऱ्या कृती आणि प्रतिकृती यावर आधारित असणारी मानसिकता कशी निर्माण होते , त्यानुसार वर्तन करतात. माणसाला माणूसपण शिकवणारी ही माणसंच आणि त्याच माणसाला माणसातून उठवणारी ही माणसाच ! समाजातील सजग आणि सृजनशील कृतीयुक्त कार्यातून सुदृढ समाज निर्माण होणे, ही झाली सद्बुद्धी. परंतु ,याच सुदृढ समाजाला एक अमान्य गोष्टी किंवा विरोधी असणारी वाईट करणारी कृती म्हणजे, विकृती होय ! सर्वांनाच असे वाटते की आपण एका चांगल्या प्रतिष्ठित पदावर विराजमान व्हावं. मग ते राजकारण, समाजकारण  , नोकरी , उद्योग असो. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आणि प्रतिस्पर्धा ही असतेच. स्व विकास करत असताना, माणूस कोणत्याच थराला जाईल हे सांगता येत नाही. प्रत्येक ठिकाणी तो नको त्या गोष्टीची स्पर्धा करत असताना कळत नकळतपणे तो इतरांची ईर्षा करतो . इतरांवर जळतो आणि स्व प्रगतीच्या नावाखाली संपूर्णपणे विरोधाला विरोध करत राहतो. त्यामध्ये सत्य काय असत ? याची त्याला काही घेणे देणे असते ? तो फक्त स्पर्धा आणि स्पर्धाच करत राहतो त्या स्पर्धेमध्ये तो नीती मूल्य याचा कसलाही विचार करत नाही. फोडा आणि राज्य करा, या प्रवृत्ती प्रमाणे तो स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी नको त्या थराला जातो.. 

समाजातील कोण्यातरी एका व्यक्तीची समाजाप्रती असणारी  घृणा  त्या समाजालाच विनाकारण त्रास देत असते. हा झाला एक भाग आणि दुसरा भाग असा बहुसंख्य समाज अल्पसंख्याक समाजावर वैयक्तिक मतभेद पोटी एकंदरीत समाजाला दोष देतो ( आंतरजातीय). प्रतिष्ठित समाजाची प्रतिष्ठा लाभलेल्या समाजातील कोणत्याही एका व्यक्तीने केलेले वाईट कृत्य ही त्याची गलती असते, शेकडो वर अनेक चांगली काम किंवा वर्तन करून सुद्धा एखाद्याच्या चुकीवर बोट ठेवून समाजा च्या पारंपरिक पद्धतीने त्याला दोषी ठरवणे किंवा पारंपारिक दूषण लावणे , अशा प्रकारची मानसिकता सहजासहजी बदलणे शक्य तर नाहीच . ही मानसिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज पसरते. हिला ही रोखणे वाटते तितके सोपे नाही . कारण ,एका विशिष्ट वर्गाने एका विशिष्ट वर्गाला कमी लेखणे ही त्या पाठीमागची मानसिकता अत्यंत गंभीर आहे. तीच मानसिकता विकृती म्हणून उदयास येत आहे . तिला रोखणे कोठेतरी आवश्यक आहे . पण पुढाकार कोण घेणार ? आधुनिक भारतामध्ये आपण राहत असलो तरीही उचनीचितीची मानसिकता सहजासहजी नष्ट होत नाही , ही शोकांतिकाच म्हणावी लागेल . यालाही कारण तसेच आहे जे की , विकसनशील देशाच्या दिशेने प्रगती करत असणारा आपला देश राजकीय अस्थिरतेमुळे उदासीनतेमुळे आणि राजकीय जिवंतपणा ठेवण्यासाठी राजकीय पक्ष नको त्या थराला जाताना आपण पाहत आहोत . सत्तेच्या हव्यासापोटी ही विकृत मानसिकता नवीन पिढी घडवू पहाते आहे. पुरोगामी भारताचे अथवा महाराष्ट्राची संकल्पना ही व्यासपीठापूर्तीच मर्यादित झाली आहे. बोलणारा वक्ता बोलून जातो नको ती स्वप्ने दाखवून जातो राज्य किंवा देश यापैकी कोणतीही सत्ता मिळवल्यानंतर व्यासपीठावरील नेता कार्यकर्ता नंतर मात्र जातीय समीकरणांमध्ये अडकून बसतो. समाजातील घडत असणाऱ्या निंदनीय गोष्टींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खत पाणी घालतो ही सत्यता नाकारता येणे एवढे सोपे नाही. 

इज्जती वर बोलू काही. . . . 

बहुतेक ठिकाणी आपण असे पाहतो. गावपातळीपासून ते देशपातळीपर्यंत ज्याच्या हातात सत्तेच्या चाव्या असतात, त्याच चाव्या आपल्या संबंधित लोकांच्या बाजूनेच असतात. एवढेच नाही तर तशा त्या फिरवल्याही जातात . साहजिकच आहे बहुसंख्याकांच्या हातातच सत्तेच्या चाव्या असतात मग अल्पसंख्यांकाच्या बाजूने कधी न्याय मिळेल काय ? हा मोठा एक प्रश्न आहे .आज कालच्या परिस्थितीचा आढावा जर घेतला तर प्रत्येक गाव पातळीवरील चा निर्णय हा ज्या पक्षाची अथवा पार्टीची सत्ता असते . त्याच बाजूने सर्व निर्णय घेतले जातात . प्रश्न विकासात्मक असेल किंवा एखाद्याच्या चारित्र्याविषयी असेल, गंभीर आणि महत्त्वाची बाब म्हणजे अल्पसंख्यांक समाजातील लोकांवर आरोप करणे तेवढेच सोपे आहे जेवढे एखाद्या रस्त्यावरील जनावरांना दगड मारणे . पण एखादा बहुसंख्यांक समाजातील व्यक्ती कितीही वाईट अथवा चरित्रहीन असेल त्यावर आरोप करणे तर सोडाच पण एक ब्र काढणे सुद्धा  शक्यच नाही. बहुसंख्याकातील एकमेकावर आरोप करतील , शांत बसतील आणि समझोता सुद्धा होतो. त्यावर कोणीही काही बोलणार नाही.  अल्पसंख्यांकातील एखाद्या काल्पनिक गोष्टीवर सुद्धा  एवढे मोठे अग्नि तांडव केले जाते. त्याची कल्पना करणे तर शक्यच नाही. पण त्यांना सहजासहजी इज्जतीतून उठवणे अगदी सहज सोपे आहे. कोणतीही गोष्ट झाली बस त्याचा अल्पसंख्यांक दर्जा किंबहुना जातीय दर्जा काढून अवमान करणे ही सुशिक्षित लोकांमध्ये नवीन रीत पुढे येऊ पाहते आहे. सुशिक्षित समाजातून लोकांमधून नाविन्य निर्माण होण्याची आशा वाटते , तेथेच अशी जर खिळ बसत असेल, आपण नवनिर्माण काय करणार .हा झाला गाव पातळी ते देशपातळीवरचा विषय .


सुशिक्षित लोकांमधील आपण द्वेष कसे असतात याविषयी  सांगायचे झाल्यास , सुशिक्षित लोकांमध्ये जास्त जातीय समीकरणे दिसून येतात . सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा ही मानसिकता विकोपाला गेली आहे. कारण नोकरी क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना कार्यालयामध्ये जातीय समीकरणे दिसतात ठीक आहे. नातेसंबंध असतील, सामाजिक जबाबदारी असतील किंवा रक्त संबंध असतील यावर आपल्याला काहीही भाष्य करायचं नाही. परंतु ,या सर्वांनी मिळून इतर वर्गवारी मधून आलेल्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा वेगळा आहे. नोकरी क्षेत्रांमध्ये सामान्यतः सर्वसाधारण मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय अशी वर्गवारी आहे. त्यानुसार त्यांची निवड होते. सर्वसाधारण मधून येणारे उमेदवार नोकरीच्या अगोदर वेगळेच असतात. एवढेच काय सगळ्याच  कार्यालयांमध्ये हे वेगळे असतात.  जेव्हा नोकरी म्हणून एकत्र येतात , तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये काम करत असताना एकमेकाकडे बघण्याची भावना ही उदारमतवादी नसून संकुचित प्रवृत्तीची होते. याला कोणीही अपवाद असू शकत नाही. सर्व सारखेच सर्वसाधारण गटातील लोकांना असे वाटते की, मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय गटातील लोक हे त्यांच्या पारंपरिक प्रथा व आचरण यानुसार ते तसेच आहेत. जे की सर्वसाधारण लोकांची मानसिकता ही त्यांच्याविषयी अकारण नको ते गैरसमज करून त्या गैरसमजांना बळी पडतात आणि त्यानुसारच त्यांच्याशी ते वर्तन करतात. वास्तविक परिस्थितीची जाण काय असते किंवा भूतकाळ आणि वर्तमान काळ यातील फरक जाणून घ्यायला ते तयारच नाही. मग प्रश्न येतो , ही माणसं म्हणजे कधीही न सुधारणारी आणि त्यातूनही जर कामांमध्ये एखादी कमतरता असेल किंवा चूक घडली  असेल तर बस त्याच्या जातीच्या माथी मारायची आणि जर का तीच चूक सर्वसाधारण गटाकडून झाली तर चुका होत असतात. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. अशी सबक पुढे देऊन मार्ग काढायचा हा कोणता नियम आहे? का रीत आहे ? ही झाली एक बाजू आता दुसऱ्या बाजूचा विचार करू एखादा इतर मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय कर्मचारी अत्यंत हुशार असेल किंवा तो त्या क्षेत्रासाठी योग्य काम करत असेल , तेही जमत नाही. प्रत्येक वेळेला त्याच्या चांगुलपणाचा विचार तर करत नाहीत. परंतु एका थोर महापुरुषाच्या नावानं त्याला हिनवणे किंवा त्याच्या पाठी नको त्या थराच्या टीका करणे, उपहासाने बोलणे , त्याचे मनोबल खच्ची करण्यासाठी नको नको त्या ट्रिक्स वापरणे, यावरही न थांबता तोंडावर गोड बोलून त्याच्या पाठी नवनवीन प्रकारचे षडयंत्र रचने, त्यानुसार कृती करणे, तरी त्यांना यश आले नाही. त्यांनी षडयंत्र करायचे , डावपेच खेळायचे मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय आणि मात्र चुपचाप ते सहन करायचे. तर तो चांगला आणि त्या विरोधात आवाज उठवला किंवा साधं बोललं तरीही त्याच्या जातीच्या नावावर त्याची अवकात काढणे, ही मानसिकता कोठे बंद पडणार आहे. ही मानसिकता कधी सुधारणार आहे . मग या मानसिकतेला विकृत का म्हणू नये ? शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करत राहण्यापेक्षा या विकृत मानसिकतेने विद्यार्थ्यांचाच नाही तर वैयक्तिक त्या लोकांचा सुद्धा तोटा आहे. ज्यामध्ये विकृत मानसिकता असणारे लोक अहोरात्र झटत असतात हे बोटावर मोजणे इतकेच असतात परंतु हजारोंना वेठीस धरतात . हे दुर्दैव...! शैक्षणिक पवित्र क्षेत्रात अशा प्रकारच्या विकृत मानसिकता असतील आणि अशाच प्रकारची विकृत मानसिकता जर अधिकारी पदाच्या मनात असेल, तर त्या कार्यालयाचा किंवा त्या विभागाचा इतर लोकांशी व्यवहार कसा असेल याची कल्पना करणे अशक्य आहे. म्हणूनच शेक्सपियरने म्हटले असावे, " गोड बोलणारी माणसं धोकादायक असतात. "

गैरसमज कसा निर्माण केला जातो ? 


एखादा विचार किंवा सदगृहस्थ किती चांगला आहे किंवा किती वाईट आहे. प्रथमतः याचा कोणीही विचार करत नाही. चांगला असेल त्याला चांगलं म्हणावं, वाईट असेल त्याला वाईट म्हणावं. अशी शिकवण प्रत्यक्ष अचरणात असते . मग मोठा विचार असेल तर, मोठ्या विचारानुसार आपण आहोत. त्यानुसार त्याचे अनुकरण करतो आहोत, त्याचे आपण अनुयायी बनतो . पण ..तो व्यक्ती किंवा तो विचार जेव्हा इतरांकडून किंवा इतर मार्गाने त्या विचाराची जात कळते. तेव्हा मात्र तो विचार ती व्यक्ती तुच्छ वाटू लागते.  तोच विचार एखाद्या सदगृहस्थणे( बहुसंख्यांक)  मांडला तर,  मात्र त्याला डोक्यावर घेऊन त्याची वाह वाह केली जाते . चांगल्या विचाराची वाह वाह झालीच पाहिजे . तो  सदगृहस्थ कोणीही असो . त्याच्या चरणावरती नतमस्तक होण्याची प्रत्येकाचीच तयारी असावी. जेव्हा तो विचार विज्ञानवादी दृष्टिकोनातून सत्य असेल. 

विचार श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे यापेक्षा, तो मांडणारा किंवा व्यक्त करणारा त्याचा दर्जा अर्थात सामाजिक दर्जा कसा आहे ? याच्यावर अवलंबून आहे. मग सामाजिक श्रेणीनुसार तो कोणत्या श्रेणीतून येतो. यावरती अवलंबून असते. आजच्या आधुनिक श्रेणीनुसार अ , ब , क, ड ,असा असेल . जर  तो 'ड 'या श्रेणी मधील असला तर, त्याच्या विचारांना आजही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पाहिजे तेवढे महत्त्व आहे ? विचारवंत त्यांना मानतात पण त्या विचारवंतांचे विचार कोणीही सामान्य स्थळापर्यंत मानत नाही. कारण , सामाजिक विचारसरणीनुसार 'अ'  श्रेणीतील लोकांनाच आजही महत्त्व . हे महत्त्व प्राचीन काळापासून आहे. शेवटच्या श्रेणीतील एखाद्या सदगृहस्थाने चांगली कृती, चांगला विचार, चांगले संस्करण,  उत्कृष्ट चारित्र्य किंवा कर्तव्य पार पाडत आचरण करीत असेल तर त्याला कोणत्या मार्गाने बदनाम करण्यात येईल. अशा प्रकारचा विकृत विचार मनात घेऊन वरील श्रेणीतील लोक सारखेच चिंतेत असतात.  त्यातूनच ते अनेक प्रकारच्या युक्ती आणि प्रत्युत्त्या करत असतात. यामध्ये त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ खर्च करतात . त्यानुसार त्यांना कधीही यश येतही नाही.  जर  का आलेच ,तर ते चिरकाल नसते . त्यांची अघोरी मानसिकता त्यांना अशी दुष्कृत्य करायला भाग पाडतात. त्यानुसार ते वर्तन करत असतात.  चांगला विचार कधीही मरत नसतो किंवा तो संपुष्टात येत नसतो. तो चिरकालपणे तेवत राहतो . हे या विकृत मानसिकता पाळणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. जित्याची खोड मेल्याने जात नसेल तर शेवटी मात्र हाती धुपाटणे. याचा विसर पडू नये. धर्माच्या गोष्टी सांगायला असू नयेत त्या आचरणात असाव्यात. 

थोर महापुरुषांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. प्रत्येकांना आपल्या सोबत घेऊन चांगली कामे केली सर्व समाजाचा तळागाळातील लोकांचा विचार करूनच मोठमोठ्या क्रांती या भूमीवर झाल्या. बदलाची क्रांती घडल्या, घडतील ,परंतु ,बदल झालेला कायमस्वरूपी टिकतो किंवा नाही का इतिहास जमा होतो यासाठी प्रतिक्रांती सुरू आहे. या प्रतिक्रांती रोखायच्या असतील शिक्षित लोकांनी सुशिक्षित होणे गरजेचे आहे. सामाजिक व्यासपीठावरून फक्त बोल घेवडा करण्यापेक्षा कृतीयुक्त कार्यामध्ये सहभागी व्हावे. जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणावे, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणावे. न्यायव्यवस्थेचा विचार करत असताना सत्तेच्या बाजूने सामाजिक न्याय असावा. या ठिकाणी पुराव्याची गरज असू नये. पुराव्याचा विचार जर केला गेलाच, पुरावा हा सुद्धा  सत्याचा असावा. पुरावा जर खोटा निघाला किंवा बनाव निघाला. तर मात्र सत्याला कधीही न्याय मिळणार नाही . समाजातील सुप्त विकृती वाढायला वेळ येईल आणि अन्याय अत्याचार झालेल्या व्यक्तीला न्याय मिळेल ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण , समाजातील हजारो अनेक प्रकरण आहेत, जी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचतील याची शाश्वती देता येत नाही. म्हणून समाजातील न्यायदेवता जिवंत राहिली पाहिजे. एवढी अपेक्षा करूयात.

घातक प्रवृत्ती विकृत कृती... 



जगातील सगळेच लोक चांगले आहेत शहाणे आहेत हे निर्विवाद सत्य, आपण जाणतो आहोत.  त्यांची प्रवृत्ती जर चांगली असेल तर ते कधीही वाईट गोष्टीचा विचार करणार नाही. जर का त्यांची प्रवृत्ती विघातक असेल तर ते कधीही आयुष्यामध्ये चांगला विचार किंवा चांगली कृती करू शकत नाहीत . त्यांनाही रोखता येऊ शकते . पण...पुढाकार कोणी घ्यावा? यावर अवलंबून आहे. प्रवृत्ती कोणतीही असो चांगली असो अथवा वाईट असो. परंतु पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो ती व्यक्ती कोणत्या श्रेणीतील आहे? त्याची श्रेणी जर 'अ' श्रेणीतील असेल तर मात्र त्याला कोणीही बोलू शकत नाही. ना विरोध करू शकत नाही. पण 'ड' श्रेणीतल्या व्यक्तीला  कृती चांगली असो अथवा वाईट कोणीही बोलू शकते. कोणीही आरोप करू शकते. चांगल्या कृतीला तर कोणी शाब्बासकी किंवा प्रोत्साहन देणार नाही. पण का जर कृती वाईट असेल ना, तर मात्र त्या व्यक्तीची गय होत नाही. घातक प्रवृत्ती अ, ब ,क ,ड या श्रेणीतील कोणाचीही असेल त्याला सजा मिळालीच पाहिजे. ही बाब कौतुकास्पद आहे . तीच नंदनीय घटना कृती अ  श्रेणीतील लोकांनी केली आणि त्याच्या विरोधात कोणतीही कार्यवाही होत नाही. त्याला क्षमा केली जाते ही बाब मात्र गंभीर असून अशा प्रकारची मानसिकता ही सुद्धा विकृती आहे. 


लेखक: 📝🖋डोंगरदिवे राहुल