रविवार, १६ जानेवारी, २०२२

आबाजी - संत भगवानबाबा

            आबाजी - संत भगवानबाबा

'मन' एक अशी  वास्तविक संकल्पना की, तिच्या अनंत पैलूंचा अभ्यास करणारी अनेक विद्वान मंडळी होऊन गेली. जीवनाचा अंतिम सार देखील मानवी मनाचा समाधानरुपी 'वर्म' होय. मन खूपच चंचल आहे. अनेक दुःखांचे कारण देखील मनच. या मानवी मनाला नियंत्रित करून, पंच इंद्रियावर  ताबा मिळवतो,तो साधू! योगी सतपुरुष म्हणून ओळखला जातो. मानवी मनाच्या उत्तुंग शिखराला गवसणी घालण्या करिता निघालेलं मन, स्थिर - अस्थिर  तर आकाशामध्ये स्वच्छंद विहार करतं तेही मनच! 

 "नाही निर्मळ जीवन | काय करील साबण ||"

 "मन चंगा तो कठौती में गंगा |"

संत तुकाराम महाराज व संत रोहिदास महाराज,' मना'चे मोठ्या मनाने वर्णन करतात. जिवनाला अंतरंग द्यायचे असतील तर, मन शुद्ध असायला हवे. मन अशुद्ध आहे तर वरवरच्या काय ला कितीही साबण लावून उपयोग काय? कारण त्वचा साफ होईल पण अशुद्ध मन शुद्ध कधी होणार? मन गंगेच्या पाण्यासारखंं स्वच्छ असेल, निर्मळ असेल, कटोती मध्ये गंगा आपल्याला विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे मन कुठे स्थिरावेल की, मग कशामध्ये मग्न होईल? सहज संता शिवाय कोणीही सांगू शकत नाही . 


एक संत-महात्मे या भूमीत जन्माला आले. पावन भूमी होती सावरगाव. सावरगाव तसं माळरानावरती वसलेलं. सर्व बाजूंनी डोंगर दरा. सर्व शेती निसर्गावर आधारित. निराजी पाटील यांचे चिरंजीव भगुआबा. भगुआबांना दोन पुत्रं होते, रामजी व तूबाजी. तुबाजीचा विवाह कौतिकाबाईशी झाला. माता कौतिकाबाई सात्विक व गुणसंपन्न होत्या. त्यांच्या सद्गुणांची चर्चा गावभर होत असायची. पाटलाच्या घराण्या बरोबर आई-वडिलांच्या घराण्याचा ही उद्धार केला  होता.  तुबाजी पाटील व कौतिकाबाईना चार अपत्ये होती  - ग्यानबा, ज्ञानबा ,बाबू व शंकर. घर गोकुळासारखं भरलं होतं. तेव्हा मात्र कौतिका बाईंना पाचव्या अपत्याचे डोहाळे लागले. डोहाळे लागले घोडेस्वारीचे,पंढरपूरच्या वारीचे, भजनाचे, कीर्तनाचे. असे आगळेवेगळे डोहाळे लागणारी माता ही अगदी वेगळीच ना!  दिवसामागून दिवस जात होते. नऊ महिन्याचा कालावधी कधी सरला ते कळलेच नाही. माता कौतिकाबाई प्रसूत झाल्या. सूर्याने प्रकाशित असणाऱ्या तेजाला त्यांनी जन्म दिला होता. आखीवरेखीव सुंदर रूप, चंद्रप्रकाशा परी शितल काया, साक्षात कोण्या एका तेजस्वी दैवी शक्तीने जन्म घेतला की काय? असा प्रश्न  कौतिका मातेला पडायचा. एवढेच काय परिसरातही चर्चा होत असायची. हे  बालक विलक्षणच आहे. कारण ,'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ' या उक्तीप्रमाणे बारशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी हा तेजस्वी बालक जास्तच रडू लागला. म्हणून आजीची धांदल उडालेली .भगुजी नाव कानात म्हटले ,आणि बाळ शांत झाले. आजोबा पोटाला आला . अशी वल्गना करण्यात आली. तूबाजी पाटलांना प्रश्न पडला, वडिलांच्या नावाने आपल्या पोराला कसं बोलावं. म्हणून आई म्हणाली तुझ्या बाबांना तू आबा म्हणायचास ना मग बाळाचे नाव 'आबाजी', असे नामकरण करण्यात आले. 

आबाजी चा सांभाळ तळहाताच्या फोडाप्रमाणे माता कौतिका बाईने केला. आबाजीला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. सावरगावला शिक्षणाची सुविधा नव्हती. म्हणून ,शिक्षणासाठी मामाचे गाव लोणी ला पाठवण्यात आले. लोणी मध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. तेथेही पुढील शिक्षण नव्हते. परिसरामध्ये निजाम- इंग्रजांमध्ये धुमश्चक्री चालायची, त्यात भारतीय स्वातंत्र्याची वारेही मोठ्या जोमाने घुमत होती. त्याचाही परिणाम आबाजीवर होत होता. प्राथमिक शिक्षण आटोपल्यानंतर परत सावरगावला आले. परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचे प्रवाह जोमात चाललेले होते. त्यांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आबाजीवर परिणाम होत होता. एव्हाना त्यांची त्यांना आवड होती. कारण, लहानपणापासूनच आईने पोथी, पुराण, राम ,कृष्ण यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे अध्यात्म हे त्यांचे अविभाज्य अंग बनले होते. 

नारायण गड म्हणजे, तुबाजी पाटलांचे कुलदैवत . एकदा वारीसाठी ते नारायणगडावर आले, सोबत आपली मुले, आबाजीला  पण घेऊन आले. नगद नारायणा चे दर्शन घेतले, माणिक बाबांचे दर्शन घेतले, परत निघाल्यावर आबाजी गाडीतून उतरून माणिक बाबांच्या जवळ जाऊन बसला. अनेक  युक्त्या केल्या. परंतु,आबाजी गड सोडायला तयार नाही. हे पाहून माणिक बाबांनाही आश्चर्य वाटले. माणिक बाबांच्या आज्ञेवरून आबाजीला नारायणगडावर ठेवण्यात आले. आबाजीची निस्सीम भक्ती पाहून माणिक बाबा प्रभावित झाले होते. भविष्यातील नारायण गडाचा उत्तराधिकारी म्हणून  आबाजी कडं पाहत होते. गुरूदिक्षा साठी माणिक बाबा आवाक् झाले होते .परंतु त्या बालकाची जिद्द चिकाटी परमेश्वरावरील भक्ती व मंदिरावर जाऊन उडी खाली घेणे, हे अचंबित करणारे होते. शेवटी माणिकबाबांनी आबाजीला पारखले व गुरुदिक्षा दिली. एवढंच नाही तर "भगवान" असे नामकरण केले. आबाजी चे भगवान बाबा झाले. पुढील योगसाधनेच्या अभ्यासासाठी भगवान बाबा अर्थात माणिक बाबांचे पट्टशिष्य मुकुंद राजांच्या गुहेमध्ये तपश्चर्येसाठी गेले. दोन - तीन वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर भगवानबाबांना आत्मज्ञान मिळाले. नारायणगडावर परत आल्यानंतर , हभप श्री बंकट स्वामी महाराज यांचे घडाला पाय लागले . भगवान मध्ये एक दिव्य शक्ती आहे. या शक्तीला ज्ञानाची आणखीन गरज आहे. हे त्यांनी ओळखले ,म्हणून स्वामींनी माणिक बाबांना 'भगवान' मागितला. माणिकबाबांनी मोठ्या जड अंतकरणाने , 'हा देवाचा प्रसाद आपण वाटून खाऊया' असं म्हणून मोठ्या जड अंतःकरणाने भगवान बंकट स्वामींच्या स्वाधीन केला. तिथून पुढे भगवान बाबांचे शिक्षण हे आळंदीला झाले. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन शिक्षण संपन्न होऊन भगवान बाबा पुन्हा नारायणगडावर आले. 

प्रथमत: गुरु माणिक बाबांचे आशीर्वाद घेऊन नारायण गडावरती दर एकादशीला कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. बाबा आपल्या रसाळ वाणीतून भक्तगणांना ज्ञानेश्वरीच्या अमृत ज्ञानातून देत असत. गडावर भक्तगणांची वर्दळ वाढत चालली होती. बंकट स्वामींचा आशीर्वाद पाठीशी होता. वारकरी संप्रदायाची पताका, मानाच्या शिरपेचात रोवण्यासाठी नारायण गडावरून पहिली दिंडी पंढरपूरला निघाली. पहिल्या दिंडीमध्ये एकूण फक्त 13 वारकरी होते.  दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानेश्वरांना अपेक्षित असणारी सर्व समभाव अशी होती. सर्व जातींची माणसं होती, पुढे या दिंडीचे रूपांतर खूप मोठ्या जनसागरात झाले. नगद नारायण आणि माणिक बाबा यांच्या आशीर्वादाने भगवान बाबांना ऐश्वर्यसंपन्नता लाभली होती. हा देह फक्त नारायण गडाच्या सेवेसाठी आणि माणिक बाबांची आज्ञा साठी आहे.  भगवान बाबांनी अनेक सत्कार्य केले. गडावरील नारळी सप्ताह प्रारंभ सुद्धा बाबांनीच केला होता. पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे साळसिद बाबा यांच्या नावावर पशुहत्या मोठ्या प्रमाणात होत होती. बाबांनी ती अघोरी प्रथा बंद करून त्या ठिकाणी सिद्धनाथाचे मंदिर उभा केले.पशुहत्या बंद झाली. त्याचबरोबर माजलगाव तालुक्यातील चिंचाळा येथे अवघडबाबा याच्या नावाखाली गोहत्या केली जायची. हे बाबांना चांगलेच जिव्हारी लागले होते. भगवान बाबांनी त्या काळामध्ये त्या विरोधात बंड पुकारून अध्यात्माच्या मार्गाने अवघडबाबा हा अवघडबाबा नसून नाथ संप्रदायातील 'अडभंगनाथ' आहेत हे सिद्ध केले. "तेथील गोहत्या करण्याऐवजी माझी हत्या करा ,नंतर गोहत्या करा "असा नारा दिला . शेवटी कल्लू रोहिल्यांनी मध्यस्थी करत तेथील गोहत्येला बंदी घातली. पुढे तो रोहिला बाबांचा परम भक्त बनला. 


 हे ऐश्वर्य सांभाळण्यासाठी मल्ल तयार करण्यात आले. गोरगरीब वरील अन्याय दूर करण्यात येत होते. पुढे या मल्लांचा गडावरील या भरलेल्या धनाकडे लोभाने पाहू लागले किंबहुना ते धन आपल्या घरी असावे अशी लालसा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. भगवान बाबा ना हे  मान्य नव्हते. भगवान बाबा विरोधात अनेक प्रकारच्या चांडाळ चौकटी सुरू झाल्य. 

 बाबा कोणालाही भीक घालत नसत . सर्व मल्ल आखाड्याचे नियोजित असणारा उस्ताद गवळी. कुस्ती मध्ये भगवान बाबांकडून पराभूत झाला. पन्नास खेड्यामध्ये नावलौकिक असणारा गवळी उस्ताद पराभूत झाला, ही बाब गवळीच्या जिव्हारी लागली,आणि तेथून पुढे नारायण गडावर ती कटकारस्थान रचले जाऊ लागले. पुढे उस्ताद भगवानबाबांना त्रास देणारा ठरला . नको त्या गोष्टींना सामोरे जावे लागले .शेवटी सत्वाची परीक्षा म्हणून बाबांनी स्वतः लिंग छेद केला. एवढे मोठे अग्निदिव्य पार करून सुद्धा खळांचा त्रास मात्र थांबला नव्हता. शेवटी माणिक बाबांच्या निधनानंतर नारायण गडावरती जातीय तेढ निर्माण झाला. उत्तराधिकारी, 'महादेव बाबा 'याचे भांडण कोर्टात गेले. कोर्टातून सुप्रीम कोर्टात अर्थात् निजाम दरबारी. दरबारातून निकाल आला. महादेव बाबा उत्तराधिकारी बनले भगवानबाबांनी नारायण गड सोडल. 



महंत माणिक बाबांच्या जाण्याने भगवान बाबांच्या उर्वरित योगसाधनेत खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यात खेळांच्या त्रास हा असह्य होता. शेवटी निर्णय घेतला हिमालयात निघून जावे. हिमालयाचा मार्ग पकडला खरा .परंतु, खरवंडी च्या मातेच्या भक्तीपोटी बाबा परत खरवंडी ला आले. धौम्य गडावर राहण्याचे ठरवले. विजयादशमीच्या मुहूर्तावर भगवान बाबांनी सीमोल्लंघन केले. धौम्य गडाची स्थापना केली. धौम्य गडावर  बाबा रामतांना परिसर पाहत होता. परिसरातील दुःखी ,शोषितांना आनंद होत होता. भगवान बाबा च्या मनातील हिमालय आता दूर जात आहे. त्यांच्या प्रेमाचे वलय आपल्याला मिळणार आहे. ही आत्मिक समाधानाची हाक सर्व भक्तगणांना सुखावून टाकत होती. पुढे चालून सर्व भक्तगण, 'गड बांधा रे '...ही मोहीम हाती घेतात. सात वर्षाच्या अथक परिश्रमानंतर भगवान बाबांच्या नियोजनानुसार आणि मनातील कृती आराखड्यानुसार एक मोठा गड बांधून तयार झाला होता. बाबांच्या चेहऱ्यावर ही नवचैतन्य दिसत होते. एक नवीन वस्तू उभा राहिली होती. याची ख्याती  महाराष्ट्रभर पसरली. 

तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते विजय  विठ्ठल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यशवंतराव चव्हाण भारावून गेले . भगवान बाबांच्या कार्याची तत्परता आणि सिद्धता स्वतः पाहिली होती. महाराष्ट्राच्या मराठी माणसांचे वर्णन करत असताना महाराष्ट्राची सत्ता कोणा संकुचित व्यक्तीच्या हातात जाणार नाही, त्याची जबाबदारी स्वीकारली. संत सांप्रदायाचे आभार मानून त्यासमोर लीन होऊन भगवान बाबांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी,धौम्य गडाचे नामकरण ,"भगवान गड" जाहीर केले . शासकीय दरबारी 'भगवानगड' अशीच नोंद राहील, अशी घोषणा सुद्धा केली. भगवानगड निर्मितीमध्ये पंचक्रोशीतील अबाल वृद्धांचा सिंहाचा वाटा आहे याची जाणीव आशीर्वादपर भाषणामध्ये भगवानबाबांनी करून दिली. 

बाबांचे वय वाढत होते. शरीरही आता पहिल्यासारखे साथ देत नव्हते.यातच बाबांना हृदयविकाराचा पहिला झटका आला होता. डॉक्टर काळजी घ्यायला सांगत होते. बाबा विश्रांती घेतील? हा यक्षप्रश्न सर्वांनाच भेडसावत होता. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा किर्तन रुपी समाजप्रबोधन मात्र अखंड सुरू होते. हृदयविकाराच्या आजाराने बाबा चांगलेच ग्रासले होते. भविष्यातील गडाचा वारसदार हा  प्रख्यात पंडित असावा. समाजाची जाण असावी, भगवान गडावरचा प्रपंच यापुढे प्रज्वलित ठेवण्यासाठी एक निष्णात वक्ता असावा, त्याच बरोबर अध्यात्मातील शिरोमणी असावा .अशा अनेक शंका-कुशंका बाबांच्या मनात येत होत्या . त्यासाठी योग्य ' योगी' म्हणून भीमसिंह महाराज समोर दिसत असत . वारसदाराची संकल्पना भीमसिंह महाराज यांच्या कानावर घातली तेव्हा मामासाहेबांचा वारस म्हणून मला नेमायचा, असे म्हणतात. तेव्हा बाबा थोडे निराश झाले. भीमसिंह महाराजांना बाबा म्हणत, 'तुम्ही गडावर या ,कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हालाच बघावी लागणार' त्यानुसार भीमसिंह महाराज भगवान गडावर येत असत. 


14 जानेवारी 1965 हा दिवस, मकर संक्रांतीनिमित्त बाबा दर्शनासाठी गादीवर बसले होते. परिसरातील माता  माऊली दर्शन घेऊन परत जात होत्या. पुण्यकाळ दिवसभर असल्यामुळे सुवासिनी येत होत्या. खरवंडी च्या बाजीराव पाटलांची सुवासिनी त्यात होत. बाबांचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या पायाला हात लावला . पायांना ताप चढलेला होता. त्यांनी आलेल्या सुवासिनी बरोबर त्याची चर्चा केली. घरी गेल्याबरोबर सासूबाईंच्या कानावर घातले. सासूबाईंनी बाजीराव पाटील यांच्या कानावर घातले. बाजीराव समजायचे ते समजून गेले. डॉ घेऊन  टांग्यात बसून गडावर गेले. बाबांची तब्येत बिघडली होती. बाबांना घेऊन ते नगरला गेले. नगर ला गेल्यानंतर बाबांना हृदयविकाराचा दुसरा झटका येऊन गेला आहे. असे सांगण्यात आले. पुढील उपचारासाठी रूबी हॉल पुणे येथील परदेशातील डॉ ग्रॅट कडे घेऊन जावे ,असे सांगण्यात आले. 

पुणे येथील रुबी रुग्णालयात भगवान बाबा वरती उपचार सुरू झाले .परंतु काळ बराच पुढे गेलेला होता. बाबांनाही त्यांची जाणीव होती. शेवटच्या समयी ज्ञानेश्वरी चे निरूपण करावे. रुग्णालयांमध्ये ज्ञानेश्वरी वाचन सुरू झाले. सर्व भक्तांना वाटले आता बाबा सुखरूप बाहेर पडतील परंतु 18 जानेवारी 1965 चा दिवस उजाडला बाबांना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानेश्वरी जवळ हवी होती. अंतिम समय छातीवर ज्ञानेश्वरी घेऊन, 

        ज्ञानोबा!

            ज्ञानोबा!!

                ज्ञानोबा!!!

       म्हणत बाबांची प्राणज्योत मालवली. 


📝लेखक :- डोंगरदिवे राहुल रामकिसन

Enemy

                 ENEMY




Without problems we can't face the struggles and without struggles we can't become a unique personality  in the world. If you think it's very hardest task, at the time you must think against, that's your golden opportunity to chase it. 

Problems may be created in our life, created problem is not lifetime, there must be a solution. Just  find out the way, where we want to satisfaction with full solution. That solution depend on your  thinking power and state of mind. Actually the position of mind is fully converted and stuck in dilemma, that's why no one can't make a decision. Can we find out the deficiency? Actually we want to do something but could not do anything and the reason is scare. Why someone scare about the unknown conditions? And we know all are fictions, but the thinking track is real platform. This is one of the most powerful track to forward as well as backward. When we stuck in that , we could not come out from that position. You have confused, which is same thing

So friends it is very easy to fight against enemy, but some Enemies are not seen easily.  They are hidden with us. So it's very hard to identify the reality and the reality is not simple thing to trust on it. Sometimes we wander  hither and thither to find out the deficiency ,enemy and any other tricks to solve the problem.  Many more Times we can't reach the bottom . Because we believe on those people who are fully betrayed ? In history also there are a lot example,  a vast empire and kings kingdom demolished because of their kith and kins. Nowadays the ruling method is changed. Everyone tried to capture the ownership of in every field, sometimes it's totally depend on power. Who wants monarchy, those people are used their power against weaker. Here l want to know about weak means not power but they worried about future and the bad signs of future.so they take back from critical situation. But the  thinks all are beaten by me. 

Friends I would like to say, " Good deeds are best work. " If we honestly doing our work, there is no any difficulty. But remind it  huge obstacles are front of you. The other thing is you will be won. Don't care about who's ur enemy? Enemy doesn't have any relationship. The just took the benefits of an opportunity. So don't give them that an opportunity. Be alert from those people who most trusted  by you. On time try to identify the existence and modify your relationship and be practical. 

One more thing is here, if you always think about your blood relationship and confused. It's so hard to come out. So think deeply if you forgive them and they could not change their temper, then what's the value of your sacrifice? That's why be alert. And be practical. 

📝📝Rahul R. Dongardive





गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

Holy Thought


                 HOLY THOUGHT"



"Every human being has a Desire.

Desire has many ways , whoever knows the feelings of subconscious mind. 

He become genuine lover                                            of life. "

                                         

                 # Rahul R. Dongardive

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

तुम्ही संत मायबाप !!!

                                    तुम्ही संत मायबाप

     

   " यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान |

           शिष दियो जो गुरु मिले, तो भी सस्ता जान |"

भारतीय संस्कृती वारसा आणि गुरु-शिष्य परंपरा  लक्षणीय आहे. जागतिक स्तरावरील अध्यात्मिक ठसा हा जगा वेगळा. एखाद्या शिष्याला अस्सल ज्ञान मिळवायचे असेल , तर त्यासाठी त्याला एका उत्तम गुरुची आवश्यकता आहे. गुरू-शिष्य संबंध संबंधी अनेक व्यथा आपण ऐकलेल्या आहेत, आणि वाचलेल्या सुद्धा आहेत. योग्य गुरु मिळाला नाही तर त्या शिष्याचे जीवन शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण होणार नाही. ज्ञानाची भूक त्याची कधी पूर्ण होऊ शकत नाही. कारण, पंचेंद्रिया वर काबू मिळवण्यासाठी एक सच्चा गुरु असावा लागतो. विषाने भरलेले हे पूर्ण शरीर शुद्ध करायचे झाल्यास त्यासाठी अमृतासमान गुरु असायला हवा आणि असा चांगला जर गुरू मिळत असेल तर त्यासाठी आपले सर कलम करावे लागले तरीही चालेल. अशी उपासना करणारा शिष्य ही असावा लागतो.  गुरू-शिष्याची पवित्र संवेदना आणि अवलंबिता सच्चा गुरू शिष्या संबंधी प्रेरित करत असते. असाच अमृताचा कलश ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराजांच्या स्वरूपामध्ये मच्छिंद्रनाथ गडावर अवतरले आणि परिसरातील अज्ञानाला दूर करण्यासाठी साक्षी ठरले. 

ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराज यांनी परिसरांमध्ये ही शिष्यपरंपरा हयात असतांना आयुष्यभर राबवली न्याय हा न्याय असला पाहिजे, कोणावरही अन्याय नाही झाला पाहिजे, त्याचबरोबर सर्वांचा उद्धार कसा करता येईल? साक्षात प्रयत्न  संवादातून त्यांनी सिद्धही केले. "संघर्षाशिवाय जीवन नाही, जीवनात हा संघर्ष असलाच पाहिजे, तरच आपण जिवंत आहोत हे त्याचे लक्षण" ही त्यांची वाणी सर्वांना प्रेरित करत असते. समाज प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करायचे असल्यास, मग ते आध्यात्मिक असो किंबहुना समाज उद्धाराचे असो हे कठीणच -

            " असाध्य ते साध्य करि सायास, 

               कारण अभ्यास, तुका म्हणे |"

ही तुकाराम महाराजांची शिकवण बाबांनी स्वतःमध्ये अंगीकारली होती. म्हणूनच त्यांनी समाज उद्धाराचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले. आज त्यांच्या पश्चात हजारो भक्तगण त्यांच्या वाणीतून निघालेल्या शब्दांना प्रमाण मानत आहेत. शब्दरत्न प्रमाणे माणसातील रत्न आणि त्याची जाण बाबांनी करून घेतली. त्याचे बीजारोपण आशी केले की, त्यातून निघणारा अर्थ हा समाजाचे भान ठेवणारा निघावा व तो या समाजाचा सुधारक ठरावा.  बाबांची दूरदृष्टीता आपणास आज पाहावयास मिळत आहे. त्यांच्या जाण्याने परिसरावर शोककळा पसरली होती, तरी तो परिसर आज अजरामर झालेल्या त्यांच्या वाणीतून ओथंबून वाहतांना दिसत आहे. निगमानंद बाबाची आपल्यात आज नसले तरी त्यांच्या  कीर्तीरूपाने प्रत्येकाच्या हृदयात वसलेली आहेत परंतु बाबांची मूर्ती गावोगावी बसविण्याचे काम सुद्धा सुरू आहे प्रथम मूर्ती प्राणप्रतिष्ठा गावकऱ्यांच्या वतीने बसविण्याचे काम नांदेवाली या गावापासून सुरू होते.

शिरूर तालुक्यातील नांदेवाली येथे बाबांचा जन्म झाला. नांदेवाली च्या भूमीत अध्यात्मातील रत्न  जन्मावा आणि त्या भूमीचा त्याचबरोबर परिसराचा नगर जिल्ह्याचा अध्यात्मातील मानबिंदू ठरावा ही नांदेवाली करांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणून त्यांच्या कार्याची उत्तरदायित्व सिद्ध करण्यासाठी मनातील उत्कंठा आणि भाविक भक्ती यांचा संयोग म्हणून बाबा हयात असताना जन्मभूमीत अगोदर मंदिर उभारून आज दिनांक 27 ऑक्टोबर 20 21 रोजी बाबांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे बाबांवर असणारे भक्तीचे स्वरूप व अस्मिता गावकऱ्यांच्या हृदयामध्ये स्पंदना प्रमाणे धडपडते आहे. 

     "ऐसी वाणी बोलिये मन का आप  खोये |

      औरन को शीतल करे,आपहुं शीतल होए |"

बाबांच्या जीवनातील सगळ्यात मोठी उपलब्धी कोणती असेल ? असा जर प्रश्न पडला तर, त्याचे उत्तर सहाजिकच आहे.बाबांचे बोल, बाबांची संवाद क्षमता एवढी जबरदस्त होती की, ऐकणार्‍यांना ते  सारखे ऐकावे वाटत असे. कोणाचा द्वेष नाही, ना मत्सर ! सर्वांप्रती असणारी आदरयुक्त भावना आणि प्रेम ही बाबांची विशेषता. गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांची विचारपूस करणे, त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधणे व त्यांच्या समस्या जाणून घेणे. त्या ऊपर मार्गदर्शन करणे. ही बाबांची खासियत , "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले" हे बाबांच्या नसानसात सारखे खेळायचे. बाबांचे ते शब्द प्रत्येक भक्तगणांना आपलेसे वाटायचे. त्यातून त्यांच्या समस्या तर कुठे दूर व्हायच्या आणि भक्तिमार्ग मध्ये ते नाहुन निघायचे. कळत सुद्धा नव्हते. प्रत्येक भक्ताला बाबा म्हणजे संत मायबाप वाटायचे. कारण, आईप्रमाणे दया आणि बाबांनी प्रमाणे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी बाबा स्वतः कधी घेत असत हे समोरच्याला कळत पण नव्हते. त्यांची वाणी एवढी मधुर होती की, ती प्रत्येकाला आपल्या दुःखातून मुक्त झाल्यासारखे वाटायचे. सन्मार्गाने जीवन जगण्यासाठीचा मार्ग लोकांना आवडू लागायचा. भक्तांच्या बाबतीत हे जरी खरे असलेही. परंतु ,माझा भक्त अडचणींवर मात करतोय त्याच्या समस्यांची उकल होते, भक्ताचे समाधान जेव्हा भक्तांच्या चेहऱ्यावर दिसायचे , तेव्हा बाबा मात्र सद्गदित होत असायचे. ती शीतलता व प्रसन्नता प्रत्येकाच्या आठवणीत आजही आहे. 

निस्सीम भक्ती आणि अर्थपूर्ण श्रद्धा असल्यावर परमेश्वराचे साक्षात रूप या नयनी उतरल्याशिवाय राहत नाही, ही परम श्रद्धा होय. निगमानंद महाराजांनी आपल्या हयातीमध्ये दीनदुबळ्यांची सेवा, अध्यात्म त्याचबरोबर शैक्षणिक गरज लक्षात घेता, या तीनही क्षेत्रावर काम केले. एवढेच नाही तर त्यासाठी पावले देखील उचलली. याचे प्रत्यक्ष उदाहरण अथवा अनुभव घ्यायचा असेल, मच्छिंद्र गड निमगाव आपले स्वागत करत आहे. प्रत्येक भक्तांना या गडाला भेट द्यावी असे नंदनवन बाबांनी साक्षात उभे केले आहे. बाबा आपल्यात आज नाहीयेत परंतु, त्यांचे कार्य, विचार, श्रद्धा आजही लोकांच्या ओठावरती आणि हृदय यावरती कोरली गेली आहे. नांदेवाली या त्यांच्या जन्मभूमी मध्ये बाबांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आआहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार अगदी अंतर्मनातून बाबांनी केला. अशा महान विभूतींच्या चरणी नतमस्तक व्हावे, यापेक्षा दुसरे परमभाग्य कोणते असु शकत नाही. 

      " बुरा जो देखन मै चला बुरा न मिलिया कोय |

        जो मन देखा अपना, मुझसे बुरा न कोय |"


📝📝

WRITER : RAHUL R DONGARDIVE



रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

अध्यात्मातील शिरोमणी निगमानंद

 अध्यात्मातील शिरोमणी निगमानंद!!! 

 

Nigmanand Maharaj

प्राचीन काळापासून मनाची स्थिरता, अस्थिर होते . अस्थिर झालेल्या मनाला किंबहुना बेलगाम मनाला संतुलित करण्यासाठी औषधांची गरज न

लागता त्या मनाला शांत, संयमी, मजबूत निर्णय क्षमता, कार्यक्षम करण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म होय. मानवी देहाला कोणतीच  वनौषधी किंवा आता चे विज्ञान दुरुस्त करू शकत नाही, तेव्हा मात्र अध्यात्म आणि त्या आध्यात्माची अचूक हातोटी वापरून बाधित झालेल्या मनाला योग्य मार्गाने ज्ञान देण्याचे कार्य वैकुंठवासी ह भ प निगमानंद महाराज यांनी केले होते. अध्यात्मिक अभ्यासातून भविष्याचा वेध घेत. वेद, उपनिषदे, शास्त्र, त्याहून पुढे जाऊन योगसाधने द्वारे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे काम, समाजातील रूढ, प्रथा योग्य की अयोग्य याची कारणमीमांसा करून योग्य पथ् दाखवण्याचे कार्य महाराजांनी केले. 

तिथीप्रमाणे आज वैकुंठवासी स्वामी निगमानंद महाराज  यांचे द्वितीय पुण्यस्मरण आहे. 4 ऑक्टोबर 2019 रोजी अध्यात्मातील शिरोमणी आपल्यातून निखळला. शिरूर तालुक्यातील नव्हे, महाराष्ट्र या थोर महात्म्याला पोरका झाला.  बाबांचे कार्य हीच त्यांची आगळीवेगळी ओळख आहे. मायंबाचे मच्छिंद्रनाथ वास्तव स्वीकारून प्रत्यक्षात अवलंब करणे हे अग्निदिव्य होते. या अग्निदिव्यातून बाबांनी सरळ मार्ग काढत समाज उद्धाराचा व त्या भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचा मार्ग स्वीकारला. मार्ग स्वीकारणे सोपे होते. परंतु, त्या मार्गावर अगणित असणारे काटे व त्याचे चावे फक्त बाबांनी जाणले. त्यांच्या मनाला व त्यांच्या देहाला समाजातील क्रूर वृत्तीचा खूप मोठा आघात होत होता. बाबांच्या आठवणी सांगत असतांना, बाबा स्वतःहून सांगायचे, "या समाजाला सुधारणे पाहिजे तेवढे सोपे नाही. अध्यात्माची गोडी लावणेही तेवढे सोपे नव्हते." परंतु बाबाची अध्यात्मातील गोडी, वारकरी संप्रदाय, संतांचे आशीर्वाद आणि बाबांची प्रबळ इच्छाशक्ती पुढे त्या क्रूर प्रथा टिकल्या नाहीत. बाबांनी  शेवटी त्या क्रूर प्रथा मोडून काढल्या. कबीरांच्या एकतारी भजन यापासून ते आजच्या टाळ-मृदंगाच्या घोषाने परिसर दुमदुमून जात आहे. ही दाहक वास्तवता पाहिजे तेवढी सोपी नव्हती. बाबांनी त्यासाठी जिवाचे रान केले. मन परिवर्तनासाठी समाजाला अध्यात्म पटवून दिले. तुमचा उद्धार करत आहे,ते अध्यात्मच आहे. शुद्ध अंतकरणाने श्रद्धा ठेवली तर, आपली स्वप्ने साकार करता येतात, त्याची परिस्थिती सर्व परिसराला आहे. 

बाबांनी अध्यात्मा बरोबर सामाजिक प्रश्नांना सुद्धा वाचा फोडली. अध्यात्माची गोडी ही संसारीक जीवन सुखरूप व जगण्यासाठी योग्य आहे. परंतु ती गोडी अविरतपणे टिकवून ठेवायची असेल तर, त्यासाठी संसाराचे अर्थ बळकट करावे लागेल, ते अर्थ बळकट करण्यासाठी शेती व्यवसाय टिकवावा लागेल. सिंदफणा खळखळून वाहते, ते पाणी बाबांना खुणावत होते. म्हणून परिसरातील सर्व लोकांना विहीर खोदण्याचे आव्हान केले. परिसरातील लोकांना ते पटले. प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये विहिरी खोदल्या. काळानुरूप बदल करत बोर घेतले. निसर्गावर आधारित वाचणारी शेती कृत्रिम पाण्याच्या स्रोतावर उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांसाठी फलदायी आहे. शेतकऱ्यांनीसुद्धा ओळखले आणि बाबांचे स्वप्न साक्षात उतरु लागले. यातून बाबांचा भविष्यातील द्रष्टेपणा व समाजाची आर्थिक परिस्थिती कशी भक्कम करावी, हे त्यांचे उदारमतवादी विचार मनाला हेलावून सोडतात. सिंचन क्षेत्रासाठी बाबांनी दिलेला नारळ कधीही फेल गेले नाही. अंधश्रद्धेचा भाग नाही, पूर्णपणे श्रद्धा असल्यावर हवी कार्य फळास येतात याची अनुभूती सर्व भक्त गणाला आहे. परिस्थितीनुरूप बदल करणे, हे प्रत्येक माणसाचे निसर्गतः बदलणारे चक्र आहे.  परिस्थितीनुरूप बदल करून स्वतः  अंगीकार करणे आणि समाजामध्ये तो रुजवणे हे सामान्य माणसाचे काम नाही त्यासाठी एका युगंधराचा जन्म होणे अपेक्षित होते आणि तेही संताच्या स्वरूपात ! स्वामी निगमानंद जन्मास आले!!!. समाजात परिवर्तन केले. सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी अहोरात्र झटले, नको त्या वाईट प्रसंगाला तोंड दिले. परंतू, जिद्द सोडली नाही. वारकरी संप्रदायाची पताका अविरतपणे फडकवण्यासाठी सदोदित झटत राहिले. 

एका ओसाड माळरानावर  नंदनवन फुलवणारे महामेरू आपल्यातून आज निघून गेले आहेत. आज त्यांचे द्वितीय पुण्यस्मरण सोहळा श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड निमगाव मायंबा येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोविड नाईन्टीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमांचे पालन केले जात आहे. वैकुंठवासी निगमानंद महाराजांची वारकरी संप्रदायाची पताका अविरतपणे तेवत ठेवण्यासाठी गडाचे मठाधिपती श्री ह भ प स्वामी जनार्दन महाराज गुरु निगमानंद महाराज हे बाबांनी दिलेल्या अध्यात्माचा वसा पुढे घेऊन जात आहेत. अध्यात्मातून केलेले परिसरातील परिवर्तन हे कायमस्वरूपी असते.  वै. ह भ प स्वामी निगमानंद महाराज यांनी सिद्ध केले होते. तोच वारसा आज पुढे कायम ठेवत आहे. अशा असणार्‍या आधुनिक युगातील थोर महात्मे यास द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन! 

Writer : 

डोंगरदिवे राहुल रामकिसन 

श्री निगमानंद विद्यालय  निमगाव (मा)

तालुका शिरूर जिल्हा बीड, 

महाराष्ट्र


सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

Heavy rain slashes in Maharashtra

 वरूनराजा..थांबरे आता!!!



आम्ही माणसं  तू कसाही आलास काय अन..गेलास काय ?

आला तरी आम्ही शिव्याच घालतो

आणि

नाही आलास तरी शिव्याच देतो.

पण तू आमचा पोशिंदा ना, 

तुलाच आमची काळजी.

आम्ही लेकरे री तुझी

आम्ही चूक केली काय? अन नाही काय? 

पण...तू आम्हाला माफ करत आलास. 

इथून पुढेही माफ करणारच ना तू !!

कारण तू आमचा दातायस .

असो, लेकरे गाऱ्हाण तिथेच करतात, जिथे हट्ट पुरवला जातो. 

रागही तिथंच व्यक्त केला जातो. जिथे अतूट नात्याचं प्रेम असतं.

हे ही तूच शिकवलंस अम्हास..खरंय ना हे ?

बघना, आमची तू तहान भागवलीस ,

गुरांना चारा दिलास , पशूपक्षांना अन्न पाणी सुद्धा दिलंस. 

आता आम्हा पांढरपेशा लोकांना झाडाला पाण्याच्या बाटल्या लटकावायची गरज नाही ठेवलीस. 


आम्ही तुझचं घेतो , जमलंच तर तेच दिन-दुबळ्यांना देतो. दीनदुबळ्यांच्या केलेल्या मदतीचा फायदा उठवण्यासाठी माध्यमातून दिंडोरा पिटायला कधी मागेपुढे पाहत नाही ?

पण ...आमच्या या स्वार्थाला तू हे माफ करत आलास.

किती रे तुझी करूणा ही... 

हे करुणाकरा .....

आमच्यावर करुणा करशील का ??..

तुझा अंमच्यवरचा राग मान्ययरे. 

आम्ही माणस स्वार्थापोटी गटात, जातीत ,धर्मामध्ये विखुरलो

अन एकमेकांच्या जीवावर उठलो, नव्हे कित्येक निरपराध लोकांचा यात बळी गेलाही.

 दोन दिवसापूर्वीचच बघना 20 भरतिय जवान मारले , त्या निर्दयी पशूंनी.


काय म्हणत असतील त्या शहिदांच्या माता ?

आई रडून सांगेल ,पण त्या पित्याने आपला टाहो कोठे फोडावा सांगना ?

आज कोणताही बातम्यांचा चॅनल लाव,कोठेतरी एक निर्भया घडलेली असते.

असं ऐकल्यावर नखशिखांत अग्नीचा डोंब उसळतो.

 काय करणार ? करता तर काहीच येत नाही.


शेवटी तुलाही हे सहन होत नसावं म्हणून तर तू असा कोपत नाहीस ना ?

असा प्रश्न मनाला स्पर्शून जातो.

पाठीमागं वळून पाहिल्यावर तू केदारनाथ , बिहार , मुबई(2005), यापैकी कोणालाच सोडलं नाहीस.

आम्ही आमच्यातील माणुसकी हरवत चाललोय मान्य आहे.

जग खंडाबरोबर धर्मात विखुरलं. 

एका खंडातून अनेक देशात, 

एका देशातून अनेक पंथ , धर्म , आणि धर्मातील जाती.

कधी कधी घडणारया घटना पाहून एक प्रश्न पुन्हा पडतो-

"मांणसासाठी धर्म असतो कि ,

धर्मासाठी माणूस ?"

या व्यर्थ वल्गना करत बसण्यापेक्षा माझी एक विनंती ऐकशील वरूनराजा...


आज आम्ही मानव न्यायय् हक्कासाठी मोर्चे आंदोलन अन प्रति आंदोलन/ मोर्चे यात अडकून पडलोय .

पण माणूस म्हणून जर जगलो ना , तर अशा किळसवाण्या घटना घडणारच नाहीत.

पण उद्या आम्ही या देशासाठी, याच बांधवांसाठी जीव देणारी आमची मनुसकीरे.

आज सोन्यासारखी पीक आलित, सर्वजण खुश आहेत तुझं येन सर्वानाच सुखद धक्का आहे .  

हाच धक्का उद्याचा बुक्का होऊ देऊ नकोस.आज अख्खा महाराष्ट्र न्हाहून निघालाय. 

तुझीच कृपा आहे ! 

शेतकऱ्यांच्या पिकात माती, तर आमच्या मुखात माती गेल्यासारखं होईल.

शेतकार्याच्या याच पिकावर खूप अपेक्षा आहेत. उद्या याच गोष्टीवर त्याला मुलीचं लग्न करायचय, पोरांची शिक्षणं पुर्ण करायचित,

 एवढच काय वरूनराजा सावकराकडची गहान जमीन सोडवून घ्यायची, जमलंच सारं तर मनातला एखादा नवस फ़ेडायचाय .

एकमात्र खरं , हे पिकांचं जर का नाही जमलं, तर 'मात्र' झाल्याशिवाय राहरणार नाही.

हे वरूनराजा 

माझ्या या शेतकऱ्याला नको त्या गोष्टीकडे, 

आणि....

जीवनाच्या दोरखंडाकडे जाण्यापासून वाचवरे..

करुणाकरा!

वरूनराजा .....थांब रे आता!!!

     Writer :- डोंगरदिवे राहुल 

सोमवार, २१ जून, २०२१

Orphans of Covid

           कोरोनाचे अनाथ



लाखो जीव मृत्यूच्या भीतीपोटी मृत्यू पूर्वीच मृत्यू पावली. लाखो कुटुंबे आपल्या माणसांना पोरकी झाली. एव्हाना कौटुंबिक जीवनाचा आनंद गमावून बसली. कोणाचे वडील गेले, कोणाची आई! कोणाचा भाऊ गेला,कोणाचा मुलगा गेला,  शेकडो मुलांचे आई-बाबा गेले. त्या निरपराध निष्पाप बालकांना मुलांना जीवन कसे जगावे? आणि का जगावे? असे कुट पडलेले प्रश्न. त्यांच्या डोळ्यातील संवेदनांची, चेह-यावरची उदासीनता मनाला सुन्न करून टाकते. एवढे मोठे घात या माणसावर होत असताना नाइलाजास्तव माणुसकी मात्र निपचित पडली आहे. कोणालाही कोणाच्या संवेदना, वेदना कळत नाही. सर्व काही कळुन सुद्धा अदृश्य असणारा मृत्यू हे करू देत नाही. असं म्हटलं जायचं ,"मरणादारी का तोरणा दारी." अर्थात दुश्मनाच्याही अंतिम विधीला जावं, आणि लग्नालाही जावं. कितीही मोठी दुश्मनी असली तरी, या दोन विधीला लोक जात असायची. पण..जेव्हापासून कोरोना आला, तेव्हापासून त्याची भीती व संसर्ग होण्याची संभाव्यता लक्षात घेता पूर्ण चित्रच पालटलं. 'कोणी नाही रे कोणाचे..' याची अनुभूती जगाने वैयक्तिक घेतली. ज्यांच्या शिवाय एक क्षणही जगणं कठीण होतं, त्यांच्या शिवाय त्यांना अंतिम विधी देण्यात येत होता. भीतीच्या आकांताने लोक स्वतःला बंदिस्त करून घेत होती. शासनाच्या नियमांचे पालन करत होती. शासन ही जनतेच्या रक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. अर्थव्यवस्थेपेक्षा माणसं जगली पाहिजेत, ही शासनाची भूमिका होती. नव्हे माणुसकीची परिसीमा होती. प्रगती करता येईल जग पुढेही जाईल नवनवीन शोध घेतले जातील. परंतु, ज्यांच्यासाठी हे करायचे आहे ती माणसं जिवंत राहिली पाहिजेत. एवढीच भावना समोर ठेवून जगातील प्रत्येक राष्ट्र मानवी अस्तित्वासाठी झगडत असताना दिसत आहेत. माणूस जगला पाहिजे तो जोपासला पाहिजे निसर्गाच्या संवर्धनासाठी ज्याप्रमाणे माणूस प्रयत्न करत होता त्याच प्रमाणे मानवाच्या अस्तित्वासाठी मानव अहोरात्र शोध आणि संशोधन करत असताना आज आपण पाहत आहोत. 

Covid-19 च्या पहिल्या लाटेने  जगातील शहरावर घाला घातला होता. ती लाट मात्र शहरा पुरतीच मर्यादित राहिली. जेव्हा दुसरी लाट आली,  तेव्हा मात्र जगातील खेड्यापाड्यांमध्ये घराघरात घुसली. पहिल्या लाटेने जेवढा मृत्यू तांडव केला नसेल, त्यापेक्षा भयंकर  'मृत्यू तांडव' खेड्यापाड्यात पोहोचले. जगातील  प्रत्येक खेड्यामध्ये कोरोना पोहोचला. सर्वांनीच या कोरोना ची दाहकता आणि भयंकर स्थिती अनुभवली. घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला त्या व्यक्तीला लोक हॉस्पिटल ला घेऊन जात ऍडमिट होण्याच्या अगोदरच लाखो रुपयांचे डिपॉझिट भरावे लागत  असे. सुरूवातीला रुग्णाची कंडीशन स्थिर असायची. एक दोन दिवस रुग्ण उपचाराला साथ देत. अचानक तब्येत बिघडली.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एचआरटीसी रिपोर्ट काढला जायचे, त्यानंतर त्यामध्ये निमोनिया चे प्रमाण दाखवले जाई, त्यानुसार त्याला ऑक्सिजनची गरज भासत असायची. परिस्थिती हाताबाहेर जात असताना डॉक्टर मात्र रुग्णावर होणारा एका दिवसाचा खर्च रुग्णांच्या नातेवाईकांना सांगत. दररोज सात हजार ते पंधरा हजार पर्यंत एवढा खर्च त्या रुग्णावर केला. दहा ते पंधरा दिवस त्याला सुट्टी मिळत नसायची. पंधरा दिवसानंतर सुट्टी मिळण्याची वेळ झाल्यावर रुग्ण बरा असताना अचानक हृदयविकाराचा झटका येत असे. आलेल्या हृदयविकाराचा झटका रुग्णाचा शेवटचा श्वास होता. होत्याचं नव्हतं होत असे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णाच्या उपचारावर लाखो रुपयांमध्ये खर्च करून रुग्ण दगावत होते. ही कोरोनाची निर्दयता जगावर खूपच हृदयद्रावक होती. लाखो निरपराध लोकांचे कोरोना संसर्गाने संसार उध्वस्त केले. जगामध्ये हजारो लोक अनाथ झाली. विशेष करून ज्या मुलांचे आई-वडील दोघेही कोरोना महामारी मुळे मृत पावली. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर निराधार अनाथ मुलांचा प्रश्न जगाला खुणावत आहे. अनेक सेवाभावी संस्था, निराधार आश्रम, अनाथ आश्रम या अनाथांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारत आहेत. 


जगामधील सर्वात विलक्षण अपवाद म्हणून कर्नाटकातील लावण्या कडे पाहता येईल. कारण, ही अनाथ एक आगळी वेगळीच. मंड्या जिल्ह्यातील सिविल हॉस्पिटल मध्ये घडलेला प्रकार. अवघ्या दहा दिवसांमध्ये अनाथ झालेली मुलगी. बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये लावण्याची आई ॲडमिट झाली. लावण्यांच्या आईने लावण्याला जन्म दिला. लावण्या चा जन्म झाला अवघ्या पाच दिवसांमध्ये वडील कोरोना ने वारले. स्वतःच्या मुलीला पाहता नाही आले. एवढा दुर्दैवी क्षण , त्या पित्याच्या मरणापूर्वी होता. थोडाही आनंद व्यक्त न करता,स्वतःच्या राजकन्येला न पाहता, कोरोनाच्या काळाने त्यांच्यावर घाला घातला. पतीच्या निधनाची वार्ता पत्नीच्या कानावर पडल्यानंतर तेथून पुढे पाच दिवसानंतर पतीच्या निधनाच्या धक्क्याने आणि  कोरोनाने जन्मदात्री सुद्धा मृत पावली. जन्म घेतल्यापासून पुढे अवघ्या दहा दिवसांमध्ये लावण्या अनाथ झाली. आईचे 'ममत्व' आणि पित्याचे 'पितृछत्र' जन्म  घेतल्यानंतर काही दिवसातच संपुष्टात आले. आई  आणि बाबा कोणाला म्हणायचं ? ही करुण कहाणी आयुष्यभर रहस्यच राहणार. शेवटी मामा मामी पुढे आले, त्यांनी तिला दत्तक घेण्याचे जाहीर केले. मामाच्या मुलींनी त्या बालिकेचे  नाव 'लावण्या' ठेवले. लावण्या मात्र आपल्या आई-बाबांना दहा दिवसात मुकली.

उत्तर प्रदेश मधील गोंडा जिल्ह्यातील घटना covid-19 दुसरे लाटेचा परिणाम येथे दिसून आला नियतीने आदिती आणि अमन यांच्याशी क्रूर चेष्टा केली. कोरोनाने ना पाहिला श्रीमंत, ना गरिब! त्याने पाहिला तो फक्‍त 'माणूस'. होत्याचे नव्हते आणि नव्हत्या ची कृती करण्याची क्षमता निसर्गामध्ये आहे.तिच क्षमता मानवनिर्मित आपत्ती मध्ये भयंकर आहे. याची जाण जगाला करून दिली. मी आणि माझं..माझं...करत माणूस स्वतःसाठी जीवन जगण्यास विसरून गेला. मोह, लोभ, माया, मत्सर आणि स्वार्थापोटी मृगजळांमध्‍ये स्वतःलाच हरवून बसला. असाच कोरोनाचा घाला आदित्य आणि आमन यांच्या कुटुंबाविषयी झाला. एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती मृत पावली covid-19 संबंधित सर्व लक्षणे त्या बाधित व्यक्तींना दिसून आली. परंतु, सुरुवातीला  RT-PCR चाचणी अभाव असल्यामुळे, योग्य वेळी निदान न झाल्यामुळे, ऑक्सीजन पुरवठ्या अभावी या भावंडांना स्वतःचे आप्तेष्ट गमवावे लागले. जिथे खेळण्या-बागडणे, त्याचबरोबर शिक्षणाचे वय आहे. तेथे मात्र गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. कौटुंबिक प्रपंचाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व काही असताना, हतबल होताना दिसत आहेत. ग्रामीण भागात हा प्रकार अनुभवयास आला. 


पुणे येथील गायकवाड यांच्या घरामध्ये कोरोनाचे चार बळी गेले. अहमदाबादमधील मेघा मेहरा अनाथ झाली.  दिल्लीच्या आमीत  प्रसादने आई  गमावली. छत्तीसगड मधील एका मुलाचे वडील वारले. उत्तर प्रदेश मधील शामली या गावातील आई वडील वारले. वर्धा मध्ये सुद्धा दोन भावंडाचे आई वडील मृत्यू पावले.बरेली येथील एका सहा वर्ष आणि आठ वर्ष असणाऱ्या दोन मुलींचे आई बाबा वारले. या बातम्या पाहून आणि ऐकून काळजाचे ठोके चुकवावे आणि मन् सुन्ना व्हावे, अशा हृदयद्रावक घटना भारतामध्ये घडल्या. जगामध्ये अशा कित्येक घटना असतील ,ज्यांचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही किंबहुना तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये covid-19 चे अनाथ बालके, वृद्ध, व तरुण आज हतबल होताना दिसताहेत. जगातील सर्व देशाच्या सरकारांना ही नवीन समस्या भेडसावत आहे. सामाजिक दृष्टिकोनाचे भान ठेवून जगातील अनेक संघटना, सेवाभावी संस्था आणि अनाथ आश्रम या मुलांना दत्तक घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ही मोठी जमेची बाजू .आशा मुलांना आधार बनत आहे. शासनानेही त्या अनाथांचे पालकत्व स्वीकारले आहे. 

मानवी मनाच्या उत्तुंग शिखराला गवसणी घालत असताना, किंतु- परंतु, जर -तर, जसे-तसे त्या गोष्टींचा विचार करत माणूस देहभान विसरून भौतिक सुखाच्या पाठीमागे लागला. भौतिक सुविधेसाठी नको त्या गोष्टी तो करु लागला. नैसर्गिक साधन संपत्ती वर आक्रमण ही त्याची सवय बनू लागली. वर्चस्वासाठी नको त्या साधनसामुग्रीचा शोध घेऊ लागला, एव्हाना स्वतः स्वतःच्या विनाशाचे कारण बनू लागला. वास्तव परिस्थितीची जाण मात्र तो विसरून गेला.सार्वभौमत्वाच्या नावाखाली स्वतःचा प्रदेश सावरून इतर देशावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करू लागला. जागतिक स्तरावर आगळे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी मानवत हित सोडून दुराचार, दुराग्रही बनू पाहत आहे. त्याची प्रचिती आज पावलोपावली येताना जग पाहत आहे. त्याचाच एक दूर गंभीर परिणाम आजचा कोरोना! संशोधक शास्त्रज्ञ अभ्यासकांच्या मते जगभर तिसऱ्या लाटेचे सावट सुरू आहे. हीच तिसरी लाट अवघ्या दहा ते पंधरा दिवसात भारतातही सुरू होणार आहे. असा संशोधक दावा करतात. लाट येईल किंवा नाही हा जरी  यक्ष प्रश्न असला तरी शासनाच्या घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे एक भारतीय म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे. जबाबदारी आणि कर्तव्य यांचे आत्मभान आपणा सर्वांना असायला हवे. सुदृढ भारत बनवण्यासाठी सतर्कता आणि नियमांचे अनुपालन करणे काळाची गरज आहे. या गोष्टींची जबाबदारी जर आपण घेतली, तर भविष्यातील होणारा एखादा अनाथ आपण वाचवू शकतो. हीसुद्धा एक देश सेवा ठरू शकते. "मास्कअप इंडीया" या काळामध्ये चळवळ बनली पाहिजे. तरच आपण एकमेकांना सहकार्य करू शकतो. तेच सर्वात मोठे कोरोना लढ्यातील मोठे शस्त्र आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्या मुलांचे आई वडील किंवा दोघांपैकी एक गमवला असेल, अशा बालकांना वय वर्ष अठरा पर्यंत आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा, अठराव्या वर्षी मासिक सहायता निधी, आणि  23 व्या वर्षी पी एम केअर फंडातून दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. या आर्टिकल द्वारे सर्व वाचकांना आव्हान करण्यात येते की असा एखादा गरजवंत अनाथ आपल्या जवळ कोणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास संपर्क करून त्याची माहिती देऊन सहकार्य करावे. 
                                                               - राहुल डोंगरदिवे
                                                              मो. नं : ९१३०७२९९७७

सोमवार, २४ मे, २०२१

शेतकऱ्यांची दशा आणि दिशा

शेतकऱ्यांची दशा आणि दिशा



कृषीप्रधान भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. शेतीचे संगोपन अर्थात काळया मातीतून सोनं  पिकवण्याची धमक भारतीय शेतकऱ्यांमध्ये आहे. अर्थव्यवस्थेचा कणा शेती जरी असली, तरी तिला भक्कम आणि सक्षम ठेवण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्याला आपण कणा म्हटलं, तर काही वावगे ठरणार नाही. शेती, शेतकरी आणि देश म्हणजे भारताच्या आर्थिक, भौतिक आणि सामाजिक ऐक्याचा त्रिवेणी संगम. शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी या व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरा उत्पादन निर्माता स्वतः निर्माण केलेल्या उत्पादनास योग्य मोबदला प्राप्त करू शकत नाही. मोबदला अर्थात नफ्याचा धनी हा दुय्यम स्थान असलेल्या व्यापाऱ्यास मिळत आहे. प्रमुख असणारा व्यवसाय हा आज कनिष्ठ मानला आहे. जिरायती शेतकऱ्यांच्या यामध्ये प्रकर्षाने उल्लेख करावासा वाटतो. वास्तविक पाहता बागायतदार आणि जिरायती शेती करणारा शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिक आपत्ती आपण समजू शकतो, परंतु मानव निर्मित मागणीचा तुटवडा करून अमाप पैसा कमवणे, हे व्यापाराचे प्रमुख वैशिष्ट्य. याच व्यापाराला शासनाचा अप्रत्यक्ष पाठिंबा, हे दुर्दैव. 1965च्या  भारत-पाक युद्धानंतर जी परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीवर आधारित तत्कालीन भारताचे पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांनी, "जय जवान, जय किसान" हा नारा दिला होता. शास्त्रीजींनी त्यावेळी या नाऱ्या द्वारे भारतीय लष्कर आणि शेतकरी यांचा गौरव केला होता. स्वातंत्र्याच्या केवळ अठरा वर्षानंतर अशी घोषणा केली, तेव्हा शेती व्यवसायाला चांगले दिवस येणार असे शेतकऱ्यांना वाटले होते. कालांतराने सरकार व सरकारमधील सत्ताधारी लोक बदलली. शेती व्यवसाय सरकारी योजनांपासून वंचित, नव्हे फक्त कागदोपत्री राहीला. भारत देशामध्ये एक ऑगस्ट क्रांती नंतर क्रांतिपर्व सुरू झाले होते. औद्योगिक क्रांति  निर्णायक ठरते. हरितक्रांती, श्वेतक्रांती होत गेल्या. भारतीय शेतीला योग्य असे महत्व प्राप्त झाले. 1965 शास्त्रींच्या गौरव उदगारानंतर भारतीय शेतकरी वंचितच राहिला तो आजपर्यंत. प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळेला शेतकऱ्यांना आश्वासित केले जाते. त्यांच्या पिकांना हमीभाव, योग्य मोबदला मिळवून द्यायचे, अनेक पर्याय खुले करून ठेवले जातात. बिचारा शेतकरी या सर्वावर विश्वास ठेवून आपले अमूल्य मतदान दान करतो. निवडणुका होतात. बहुमतात असणारा पक्ष, सरकार स्थापन करतो. वास्तविक पाहता दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा माणस सत्ताधारी पक्षात असला पाहिजे. पण..पुढची पाच वर्ष आश्वासने हवेतच विरली जातात. प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी आणि त्यांचे प्रयत्न कुठेच दिसत नाहीत. शेवटी पाच वर्ष संपण्या ची वेळ येते, तेेंव्हा मात्र आश्‍वासनांची खैरात पुन्हा केली जाते. दिलेले आश्वासनं कितपत मार्गी लागली याचा कोणीही विचार करत नाही. 

कोरोना महामारी काळामध्ये सरकारने कृषी विषयक कायदा 2020 अमलात आणला. देशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. खास करून पंजाब आणि हरियाणा या शेतकऱ्यांनी तर या कृषिविषयक कायद्याच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. आजही ते आंदोलन सुरूच आहे. सरकार तर सांगते, कायदा शेतकरी उद्धारासाठी आहे. दिल्लीमध्ये चाललेले आंदोलन हे जगाचे लक्ष वेधून घेते. मग या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध का? 


कृषी विषयक कायदा 2020 च्या कायद्याकडे दृष्टिक्षेप टाकूया , 2020 च्या कायद्यामध्ये तीन विधेयके पास करण्यात आली. तीन विधेयकाचे स्पष्टीकरण सरकार देत असताना सांगते हा कायदा कृषी उद्धारासाठी आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिले आहे. असाही उल्लेख केला जातो. केंद्र सरकारने पुढील विधेयके पारित केली १) शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020. २) शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार 2020. ३) अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती ) विधेयक 2020

विधेयक एक, संवर्धन आणि सबलीकरण विधेयक 2020 नुसार कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात राहील,परंतु बाजार समिती शिवाय शेतकरी आपला उत्पादित माल   इतर राज्यांमध्ये किंवा बाहेर देशांमध्ये डायरेक्ट विकू शकतो. एवढेच नाही तर शेतकरी स्वतःचा मालमाल ई- ट्रेडींग द्वारे ज्या ठिकाणी जास्त भाव असेल त्या ठिकाणी माल विकू शकेल. 

विधेयक क्रमांक 2,शेतकरी सशक्तीकरण व संरक्षण यानुसार शेतकरी स्वतः व्यापारी, कंपन्या आणि शेतीमालावर प्रक्रिया करून उत्पादन करणाऱ्या उद्योजकांशी जोडला जाईल. त्याद्वारे तो योग्य मोबदला मिळवु शकेल.शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करण्यापूर्वी किंवा एखाद्या पिकाच्या हंगामापूर्वी त्या पिकाची किंमत कंपनी व शेतकरी यांच्या संमतीने ठरवली जाईल. त्यामुळे पेरणी च्या अगोदर मालाची किंमतीबाबत शेतकरी  आश्वासित केला जाईल. यापुढे हा कायदा असं सांगतो ठरल्यानुसार शेतकरी आणि कंपनी यांच्यामध्ये वाद उद्भवल्यास, भावाची हमी आणि बाजार भाव यांच्यामध्ये प्रत्यक्ष भाव न मिळाल्यास निर्माण झालेला तंटा प्रांत अधिकार्‍याकडे सोडवला जाईल. प्रांत अधिकाऱ्याला त्यावर निर्णय देण्यासाठी तीस दिवस असतील. 30 दिवसाच्या आत यावर निर्णय देणे बंधनकारक असेल. प्रांत अधिकार्‍याच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा अधिकार शेतकऱ्याला असेल. त्यानुसार तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकतो. जिल्हाधिकारी सुद्धा 30 दिवसांच्या आतच निर्णय देईल. कंपनीला मात्र उच्च न्यायालयात दाद मागता येणार नाही.शेतकरी मात्र उच्च न्यायालयात दाद मागू शकतो. 

विधेयक क्रमांक तीन नुसार तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कांदा,बटाटा यांना आवश्यक वस्तू कायद्यातून वगळण्यात आले आहे. केंद्र सरकारने एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड याद्वारे एक लाख कोटी साठवणुकीचे गोदाम, कोल्ड स्टोरेज यासाठी प्रयत्न केले आहे. 

वरील तीनही विधेयकांचे अवलोकन केले असता, शेतकरी आंदोलन का पेटले? आणि त्यांच्या समस्या कोणत्या? शेतकऱ्या समोर उपस्थित झालेले प्रश्न असे आहेत. १)कृषी उत्पन्न बाजार समिती संपुष्टात येणार का? सरकारच्या मतानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती संपुष्टात येणार नाही. परंतु तिची एकाधिकारशाही संपुष्टात येईल. समितीला व्यापारया बरोबर स्पर्धा करावी लागेल. तर शेतकऱ्यांना असे वाटते,  कृषी उत्पन्न बाजार समिती संपुष्टात आली, तर त्यांचा माल कंपनी  कवडीमोल भावाने खरेदी करतील,शेतकऱ्यांची पिळवणूक करतील,अशी शंका शेतकऱ्याचे मनात निर्माण होत आहे.हमी भावानुसार सर्व व्यापारी कंपनी माल विकत घेईल. हे कशावरून? तशाप्रकारची लेखी हमी सरकार देत नाही किंबहुना विधेयकामध्ये तशी तरतूद करत नाही. २) शेतकऱ्याची कंपनी आणि व्यापारामधून फसवणूक  होईल का? विधेयका नुसार शेतकऱ्याने विकलेल्या मालाचे पैसे तीन दिवसाच्या आत देणे बंधनकारक राहील, असे जरी असले तरी शेतकऱ्याच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते. तीन दिवसाच्या आत जर पैसे नाही आले किंवा करारानुसार पैसे नाही दिले तर प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या मध्ये वाद सोडवण्यासाठी कित्येक दिवस लागू शकतात तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचे. वाद निर्माण झाला तर प्रांताधिकारी कडे 30 आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे 30 असे एकूण आठ दिवस लागतात.त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यावर भयावह संकट ओढवू शकते. आशी शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होते. ३) शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची मालकी नष्ट होईल का? विधेयकानुसार शेतकऱ्याच्या शेतीतील  उत्पादनावर  कंपनी करार करेल अर्थात कंपनी शेतकर्‍यांच्या शेतीवर हक्क घेऊ शकत नाही.परंतु शेतातील उत्पादनावर तिचा हक्क असेल. शेतकऱ्याच्या मनामध्ये येथे शंका निर्माण होते- करारानुसार उत्पादन पिकले नाही तर त्यात निर्माण होणारी तूट भरून काढायची कशी? 


कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू राहील तिला कंपनीबरोबर स्पर्धा करावी लागेल आणि जर स्पर्धा करता नाही आली तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व राहील काय? अस्तित्वात राहून शेतकऱ्याकडून ठरलेल्या हमी भावानुसार खरेदी करण्याचे धोरण सुरू ठेवेल? अशी कोठेही विधेयकात तरतूद नाही. हमी किंमतीला शेतीमाल विकत घेण्याचे स्पष्ट आश्वासन,  विधेयकात नसेल तर हमीभाव निरर्थक ठरतात. शेतकऱ्यांना आपला माल विकण्याच्या स्वातंत्र्यापेक्षा तो माल सरकारने खरेदी करण्याची हमी जास्त महत्वाची वाटते. कारण किमान आधारभूत किंमत (एम. एस. पी. ) ठरवण्याचा पूर्ण अधिकार हा कृषीमंत्रालय, भारत सरकार ला आहे. कृषी मंत्रालय ज्या पद्धतीने एम .एस .पी.(MSP) ठरवते त्यानुसार त्या मालाची आधारभूत किंमत ठरत असते त्यालाच आपण हमीभाव असे म्हणतो. सरकारने पारित केलेले सर्वच कायदे, शेतकऱ्यांना समजतात असे नाही शेतकऱ्याला एवढंच माहित असतं की, शेतात खूप राबल्यावर पीक जोमात येतं,परंतु त्या पिकलेल्या उत्पादनावर भाव ठरवण्याचा अधिकार नसतो. उत्पादनाचे भाव कायद्यानुसार ठरतात. हे त्याला शेवटी माहीत होते. म्हणूनच शेतकऱ्याची दयनीय अवस्था, कृषिप्रधान देशामध्ये पहायला भेटते.


जगाचा पोशिंदा म्हणून त्याचा मान सन्मान केला जातो. वास्तविक पाहता त्याचे अर्थकारण मात्र हतबल झालेले असते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी परिस्थितीपुढे आणि कर्जापोटी हतबल होऊन, नको असलेले कार्य करतो. ते म्हणजे आत्महत्या. आत्महत्या रोखण्यासाठी सरकार विशेष करून काही कायदे अमलात आणेल असे काही दिसत नाही. शेतकरी आत्महत्या करणारच नाही अशी उपाययोजना सरकारने करावी असे मनोमन वाटते. शेतकरी आत्महत्या होऊ नये असे वाटत असेल तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तंतोतंत लागू केल्या पाहिजेत. 


शेती केवळ उपजीविकेचे साधन नसून राष्ट्रीय उत्पन्नाचा स्रोत आहे. ही बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. देशातील सर्व कृषी विद्यापीठांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी योग्य असे उत्पादनाचे स्रोत निर्माण करायला हवे. ज्याद्वारे शेतकरी निसर्गावर आधारित शेती करू शकेल. कारण, बहुतेक ठिकाणी सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत. सरकारने सिंचनावरती लक्ष देऊन खास करून दुष्काळी भागात सिंचन वाढवावे. शासनाने आयोजित केलेल्या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात की नाही याची शहानिशा करणे सुद्धा आवश्यक आहे. योजनांमध्ये दलाली कमी करून थेट बांधावर योजना राबविल्यास शेतकरी मेटाकुटीला येणार नाही. शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. हा उद्योग जर संकटात सापडला तर भविष्यातील येणाऱ्या अडचणी खूप  मोठ्या असतील. 

हरित क्रांतीचे जनक म्हणून प्रोफेसर स्वामीनाथन यांनी मोलाचे कार्य पार पाडले. पंजाबी गहू आणि मेक्सिको येथील गहू त्यांच्यावर प्रक्रिया करून भरपूर उत्पन्न देणारा गहू निर्माण केला, तांदूळ निर्माण केला. 1965 नंतर झालेली हरितक्रांती जगाला अचंबित करते आहे. त्या धर्तीवर आधारित कृषी विद्यापीठातील प्रोफेसर यांनी काम  करून शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली तर शेतकरी स्वाभिमानाने जीवन जगेल  आणि आत्मनिर्भर बनेल. सरकारने सुद्धा स्वामिनाथन यांनी केलेल्या शिफारशींवर जर विचार केला तर कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही. वर उल्लेख केलेल्या सिंचनावर भर द्या सांगतात. स्वामीनाथन यांनी सांगितलेली वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम जशी योग्य प्रकारे राबवली जाते. त्याच पद्धतीने इतर शिफारशी लागू केल्यास देशातील शेतकरी हा सक्षम बनेल. 

शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज ,जर शेतीवर अनावधानाने नैसर्गिक आपत्ती आल्यास बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये. विनाअडथळा त्यांना पिक विमा कवच द्यावे. शेतकरी आत्महत्या नंतर दिली जाणारी आर्थिक मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. शासनाची मदत अधिकची करून त्या कुटुंबाला दुःखातून सावरण्या बरोबर त्यांना सबलीकरणासाठी मदत करावी. ग्रामपातळीवर जलसिंचन, नैसर्गिक स्त्रोत संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार देऊन गुणगौरव केल्यास ग्रामपंचायती या क्षेत्राकड वळतील. 14 व्या वित्त आयोगमध्ये स्वतंत्र तरतूद करावी. वेगवेगळ्या भूभागानुसार पीक उत्पादनास प्रोत्साहन द्यावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून, शेतकऱ्याकडून अचूक माहिती घेऊन झालेल्या नुकसानीस योग्य तो मोबदला देण्यात यावा. त्यामुळे शेतकरी हताश व जीवन संपवण्याच्या मार्गाकडे जाणार नाहीत. शेती शेतकरी व शासन यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी असणार तलाठी हा सुद्धां हितचिंतक असणे महत्वाचे आहे. कारण हा महत्त्वपूर्ण दुवा आहे. शासनाच्या योजना योग्य लाभार्थ्यास पोचण्याचे काम शेती व शासन यांच्यामध्ये दुवा ठरणारे अधिकारी सक्षम पणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास, शेतकऱ्यावर निराश होण्याची वेळ येणार नाही. 

जय जवान! जय किसान !!जय विज्ञान!!!    ||जय 🇮🇳भारत||

                     -राहुल डोंगरदिवे

                       

सोमवार, १० मे, २०२१

Break the chain



Due to the covid-19 virus, everyone tried to keep away from this pandemic. The world's major countries are also worried about this pandemic and its panic. Researchers and scientists find out the remedy, but the final solution is not finished. This process is going on a vast. The major problem is, how to break the chain? Which is the weapon to stop this pandemic disease? And the answer is a lockdown. It is the major weapon to stop the chain and the best remedy for covid. The second wave of the covid-19 virus is powerful and destroyed a lot of people. From the last year, the first wave and the symptoms of the covid are different from today. The spreading ratio is so high. The world is aware of it and its side effects. 1st, 2nd, 3rd and fourth waves will come, but we are not fit for that. We have a lot of deficiencies and we are struggling with a lack of strategy. One of the most important deficiency is politics. The politician has played a different kind of politics. High Court said to the central government, 'We are doomed '. The Supreme Court is aware of the central Government takes action against citizens who criticize the situation. This is the condition of the current ambience.


If the central government played a role just like partiality that's not fair.  It's inhuman. Politician plays politics always but it's not time to play cunning tricks. It's the moment to come together and fight against the covid -19 pandemic. We should forget all past event and tie up a new bond for a healthy India. If there is only a scare in front of the people at that time don't forget what's the next ambience? Everyone tries to save themselves and they can do everything for their life. Sometimes the situation will be converted into wrath.  So we must compromise with them and try to solve the problem honestly. If we ignore them then see one day will come, on that day only chaos and arbitrariness will be sustained. It's totally in our hand, how to handle the current situation, and provide all things related to human beings. At first, we should help the people and make them positive look at this pandemic. Support them and provide medical facilities without discrimination.

People must follow the instructions given by the government. If the people's do not follow such type of instructions then the covid-19 is not controlled. If the disease is spreading all over as fast as wind speed,  we can't imagine, what's next? According to the expertise, 3rd phase will be uncontrolled and we have no chance to control it. The central task force committee says, if you want to prevent the third phase, there is no way without 'strictly lockdown'. The central government could not seriously think about that. Stay home, stay safe, stay alert the formula of long life. 

Don't afraid when similar symptoms are seen related to covid. Go to the doctor and consult and take medicine.  A viral doctor's prescription is not suitable for everyone. So keep you a secure distance from that viral video and message. Always use the weapon ( mask, hand gloves, sanitiser and regular rules.) battel against covid- 19. If we have all things then we beat the pandemic disease. We have experienced, a lot of people, who are not going to the hospital? and tells us the problem ( survey representative). Few persons had prejudiced information about the civil hospital,  because of their misunderstanding about the civil hospital. They think all are not going to good. So they afraid and worried about the future. 

The scare of covid, many people without consultation taking medicine and another hard dose. Doctors also suggested the HRTC because of the exact diagnosis and treatment. Dr Guleria said, in critical cases HRTC essential but in a mild symptom, there is no need for an HRTC report. In such type of critical cases, take the consult of a specialist. Follow the instructions and does and don't. Don't go forward with overconfidence. Nowadays if a man infected to covid, and then whole family members pass away(it's happened in Nanded, Maharashtra). No coherence between the family and society. So we must find out the symptom and contact doctors. Don't live in an imaginary world. Accept the truth about this pandemic, take proper treatment, and support your family. It's also a national service.

According to the High court and the Supreme Court, we must take care of all.  To handle this critical position, Supreme Court established a task force for transparent oxygen allocation. What does Central Government for covid prevention? It's a huge question. Now, the condition is so poor and we are going to the third position of the corona. All we are alerted and make a unique strategy for preventing the third phase. 

We should not trust baseless news viral on social sites. Just like it's a huge conspiracy or other. We the People of the world must ignore dirty politics, bad things, understanding - misunderstanding. We must forward positive news, support each other and a little contribution against covid. It's the necessity of the present era. If we just find out only difficulties and deficiency, the situation will be converted into a big disaster. So do something to prevent covid. From today, start the battle against spreading the hidden virus. Follow the local government & Unicef instructions -

#  when you are around other people wear a  mask that covers your nose, mouth, and chin.

# Keep a safe distance from others.

# If you must gather other people, meet outdoor or choose species with good airflow.

With full of confidence be ready to fight for lives. 

# Be alert, stay home, stay safe.




सोमवार, ३ मे, २०२१

COVID-19 : भय इथले संपत नाही

 COVID-19 : भय इथले संपत नाही




भारतामध्ये प्रथम मार्चमध्ये एक दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रधानमंत्र्यांच्या सूचनेवर सर्व भारतवासीयांना त्याचे पालन आणि अनुकरण केले. नंतर लॉकडाऊन मे-जून पर्यंत वाढत गेला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक होते. कोरोनाच्या साखळीने माणसांची साखळी मात्र तुटत होती. मिडीया मधून प्रसारित होणाऱ्या बातम्या व संसर्ग पसरण्याची तीव्रता पाहता स्वकीयांच्या भेटीसाठी किंवा जीव वाचवण्यासाठी लोक आपापल्या गावी, शहराकडे परतू लागले. अनेक मजुरांचा नाहक बळी गेला. त्या रेल्वेखाली चिरडल्या गेलेल्या किंचाळ्या, उपासमारी याने आजही काळजाचे ठोके स्तब्ध होतात. हृदयद्रावक घटना आजही मन सुन्न करतात. आज तब्बल चौदा महिन्यानंतरही तीच परिस्थिती पुन्हा अवतरते काय? अशी शंका मनात निर्माण होत आहे. आज दोन मे 2021 रोजी कोरणा संसर्ग चा विक्रमी आकडा, तीन लाख 92 हजार 488 अशी नोंद झाली. कोरोना प्रमाण कदाचित वाढलेलं असेल किंवा कमी झालेलं असेल. भारतीय राजकारणाचा विचार करत असताना स्वार्थापुढे देश मोठा नाही असेच सिद्ध होताना दिसते आहे. आज झालेल्या निवडणुक निकालानंतर राष्ट्रीय स्तरावर कोरोना नियंत्रण च्या बैठका आपले पंतप्रधान घेताना दिसतात. पाच राज्यांच्या निवडणुकांमधे मात्र प्रचार रणधुमाळी मध्ये याचा विसर पडलेला आपण सर्वांनीच पाहिला. अलोट गर्दी मध्ये स्वतः खुद्द पंतप्रधानांनी प्रचंड मोठ्या सभा घेतल्या. त्यातून कोरोनाचा प्रसार झाला याचे आकडे आता बाहेर येऊ लागलेले आहेत. स्वतःचा पक्ष आणि सत्ता समीकरणे यापेक्षा देश मोठा नाही, हे स्पष्ट होते. 

सत्ता मोहापायी दस्तुरखुद्द पंतप्रधान आपल्या मंत्रीमंडळात सहकारी असणारे दिग्गज केंद्रीय मंत्री प्रचारात उतरले तेव्हा मात्र कोरोना चा विसर पडला होता. या धामधुमीत मध्ये भारतामध्ये अनेक भयावह घटना घडल्या. मुंबईतील विरार येथे वल्लभ हॉस्पिटल ला लागलेल्या आगीमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला. कोरोना ऋग्न पॉझिटिव्ह असणाऱ्या हॉस्पिटलची अशी अवस्था होती, अनेक निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्ली येथील पलंगाच्या शोधा करिता भटकणाऱ्या एका रुग्णाचा कारमध्येच मृत्यू झाला टाइम्स ऑफ इंडिया न ही बाजू लावून धरली होती. नागपूर येथील रुग्णालयांमध्ये सुद्धा चार जणांचा मृत्यू झाला. गुजरात मधील भरूच येथे हॉस्पिटलला लागलेल्या आगीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत देशांमध्ये 215 542 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही हे मृत्यूचे तांडव सुरूच आहे. सर्व जगच हतबल झाले आहे.भारताची स्थिती ही आवाक्याबाहेरची झाली आहे. भारतासारख्या विशाल देशामध्ये ऑक्सिजन अभावी आणि औषधोपचार अभवी लोक तडफडून मारताना दिसतात. एवढी भयंकर स्थिती असताना सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार संबंध ताणलेले दिसतात. राज्य सरकार केंद्रावर आरोप करते, तर केंद्र सरकार राज्य व लोक  यांच्यावर आरोप करताना आपण पाहत आहोत. आरोपाच्या फैरी झडत असताना, स्वतंत्र असणारी न्यायव्यवस्थेला दखल घ्यावी लागते. नाईलाजाने न्यायव्यवस्था हळहळते आणि केंद्र व राज्य सरकार यांचे कान टोचण्याचे काम सुद्धा करते.या  वस्तुस्थितीची आपणास मीडियातून चर्चा होताना दिसते. ऑक्सिजन, ऑक्सीजन प्लांट साठी अनेक देशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे, ही झाली मानवता. पण विश्वगुरू बनू इच्छिणार्‍या भारताकडे मात्र याचा अभाव आहे,असेच दिसते. कारण, राजकारणापलीकडे त्यांना अंदाधुंद करून सोडणारा सत्ता मोह सुधरू देत नाही. कोरोना संसर्गाच्या लढ्यात अनेक लोकांचा बळी तर गेलाच,  परंतु या लढ्यामध्ये जनजागृती करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे पत्रकारिता. पत्रकारिता करत असणारे 165 पत्रकारांना प्राणांची आहुती द्यावी लागली, हे शाश्वत सत्य दडवून ठेवता येणार नाही. न दिसणाऱ्या शत्रूच्या लढ्या पेक्षा राजकारणातील संसर्ग हा खूप मोठा दिसतो. संकट समयी सर्व राजकारण्यांनी एकत्र येऊन या लढ्याला साथ दिल्यास कोरोना संसर्गाची साखळी आपण पटकन तोडून टाकू. विविधतेतील एकता, संकट पूर्वी दाखवली तर तिचा योग्य उपयोग भारतमातेसाठी होईल. अंतिम संकटापर्यंत आपण असं शांत राहायचं का? जेव्हा पर्यायच उरत नाही तेव्हा मात्र एकत्र पाहिजे. अगोदर शत्रूला पोसायचे, त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा आणि नंतर त्याला हाकलून देण्यासाठी भारतीय ऐक्य दाखवायचे. ती स्वातंत्र्य पूर्वीची परंपरा पुन्हा वेगळ्या पद्धतीने अवतरण्याची भीती मनामध्ये  कासावीस करते. 

जागतिक आपत्तीमध्ये भारताची सध्याची अवस्था खूपच गंभीर आणि चिंताजनक आहे. भारतातील सर्व हॉस्पिटल कोरोना रुग्णाने हाउसफुल झालेले आहेत. राजधानी दिल्लीची तर अवस्था खूपच बिकट आहे लोक स्वतःच्या कार मध्ये औषध उपचार घेताना, ऑक्सीजन सिलेंडर गाडीच्या बाहेर असताना रस्त्यावर दिसत आहे. देशातील एका आमदाराला उपचाराअभावी मृत्यू येत असेल तर,  सामान्य माणसांचे हाल कसे असतील? याची कल्पनाच करणे व्यर्थ ठरेल. प्रत्येक जिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आणि औषधोपचाराचा तुटवडा या समस्येने ग्रासलेले आहे. खूप आरडाओरड केल्यानंतर केंद्राकडून राज्याला ऑक्सिजन पुरवला जातो. सर्वांसाठी देश मोठा की देशासाठी राजकारण मोठे, अशा शंका निर्माण होणे ही खूप मोठी निंदनीय बाब आहे. शासकीय रुग्णालयाची अशी अवस्था असताना खाजगी रुग्णालयात औषध उपचार करणे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे आहे काय? खाजगी रुग्णालयांमध्ये ऍडमिट होतानाच हजारो लाखो रुपयांचे डिपॉझिट भरा, त्याशिवाय ऍडमिट करूनही घेतले जात नाही. त्याचबरोबर शासकीय रुग्णालय विषयी असणारे ग्रामीण भागातील गैरसमज ही एक मोठी चिंतेची बाब बनली. त्या अकारण भीतीपोटी लोक आपले आजार लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हाच आजार बळावला तर मृत्यू निश्चित आहे. हे या लोकांना कोण समजावून सांगणार. समजावण्याचा प्रयत्न केलाच तर लोकांचे उद्धटपणाची वर्तनं, त्यांच्याच जीवाशी खेळ खेळत आहे. गंभीर परिस्थितीमधून सुखरूपपणे बाहेर पडायचे ठरवले, सर्वच राजकीय पक्षांनी ,घटक पक्षांनी , स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन लोकांच्या मनातील भिती काढण्याचा प्रयत्न करून सदृढ मनाने, निस्वार्थपणे देश हित लक्षात ठेवून निकराचा लढा दिला पाहिजे. 

लोक प्राणाशी झुंज देत असताना, कोरोना नंतर निमोनिया सारख्या गंभीर आजारावर रामबाण उपाय म्हणून रेमडिसीवर या औषधाचा वापर केला जातो. या औषधाचा गैरवापर व साठेबाजी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. औरंगाबाद सारख्या ठिकाणी तर वापरलेल्या बाटल्यांमध्ये सलाईन चे पाणी भरून हजारो रुपयांना विकले जात आहे. रेमडीसिवीर या औषधाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. आहे ते औषध, योग्य त्या किमतीला मिळत नाही. मूळ किमतीच्या दहापट पैसा वसूली दलालांमार्फत केली जाते. सामान्य माणसाला तर तो मिळतच नाही,आणि जर मिळालाच तर वरदहस्त लागतो. एक वेळच्या औषधाची किंमत जर तीस ते चाळीस हजार असेल तर, सात ते आठ दिवसानंतर येणारे बिल किती असेल? यामुळे लोकांना औषध मिळत नाही. अनेक संसार उद्ध्वस्त होताना दिसतात. रुग्णालयांमध्ये एवढा मोठा न परवडणारा उपचार करूनही रुग्ण दगावत असेल, यापेक्षा भयंकर शोकांतिका कोणती होता आसु शकते? 

हॉस्पिटलच्या खर्चापोटी अनेक कुटुंबे उध्वस्त होताना पहायला मिळतात. कृत्रिम औषध तुटवडा गंभीर झालेल्या रुग्णासाठी मृत्यू ठरत आहे. चांगल्या गोष्टींचे श्रेष्ठत्व स्वतःच्या नावे घेण्यासाठी राजकीय मंडळी अग्रेसर असतात. अपयश मात्र कोणी माथी मारून घेत नाही. आज प्रत्येक पक्षाचे उत्कृष्ट हॉस्पिटल असायला हवे होते.श्रद्धे साठी मंदिर जशी हवी असतात, त्याचप्रमाणे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अस्तित्वात असणे आवश्यक आहे. वास्तवातील ज्यावेळेला संसर्गजन्य किंवा इतर साथीचे रोग येतात तेव्हा, मात्र या रुग्णालयाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. भयंकर असणाऱ्या जागतिक साथीच्या रोगांमध्ये राज्यकर्ते, राजकारणी मंडळींनी रुग्णांसाठी अभय शिबिरे, त्याचबरोबर जनजागृती करणे आवश्यक ठरते. राजकारण करण्यासाठी आपल्याला आयुष्य पडलेल आहे. परंतु, ज्यांच्या जीवावर आपण राजकारण करतो, ती जनताच नसेल तर, राजकारण कोणासाठी करणारा? आणि कशासाठी?  कोरोना सारख्या भयंकर संसर्गजन्य आजारात औषधोपचारा बरोबर मानसिक आधाराची सुद्धा गरज आहे. मानसिक आधार राजकारणी उत्कृष्टपणे देऊ शकतात. हे ज्याने त्याने ओळखले पाहिजे. सृजनशील समाजनिर्मितीसाठी आरोग्यसंपन्न, सुदृढ व्यक्ती टिकणे आणि निर्माण होणे आवश्यक आहे. समाजातील समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने संयमाची भूमिका घेऊन उपाययोजना व नियोजन केले तर या संकटातून सर्वजण सुखरूप बाहेर पडू. रुग्णालयातील आगीचा प्रश्न  असो अथवा कृत्रिम औषध तुटवडा या सर्व आरोपींवर  योग्य ती कारवाई झाली तर भविष्यात अश्या गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही.  परंतु हे प्रश्न जर असेच डोळ्याआड केले जातील , तर समाज आणि सरकार त्याबरोबर इतर राजकीय  पक्ष यांच्यात समन्वय साधला जाणार नाही. परिणामतः भय इथले संपत नाही.!

Writer:-

#RAHUL R. DONGARDIVE


शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

शिक्षकी पेशा की आधुनिक गावकी?

 


शिक्षण चिरंतन चालणारी प्रक्रिया. शिक्षणामध्ये दोन घटकांचा महत्त्वाचे स्थान असते,एक शिकवणारा व दुसरा शिकणारा. आजच्या शिक्षण तज्ञांनी मान्य केलेली द्विमार्गी  शिक्षण पद्धती पूर्वीपासून चालत आलेली आहे. शिक्षण प्रक्रियेतील दोन्ही घटकांना विशिष्ट काळामध्ये शब्दप्रयोगांचा वापर केला गेला. प्राचीन काळी शिक्षकांना गुरु सर्व विद्यार्थ्यांना शिष्य असे संबोधन वापरले गेले. एक मोठं स्थान असायचं. गुरु म्हणजे एक देवता, तिच्या विरोधातच काय परंतु अपशब्द बोलणार्‍यांना वेळीच चोप दिला जायचा. गुरुचे स्थान हे श्रेष्ठ व निर्विवाद होते. प्राचीन काळची 'गुरु' व 'शिष्य' हे अंतर्मनातून बोलायचे झाल्यास आदर्श, वंदनीय आणि आदरणीय होते. 

 आजचा शिक्षक व गुरु यांची तुलना होणे शक्य जरी नसले, तरी त्यांचा दर्जा हा गुरुचा आहे. आई नंतरचे मोठे दैवत मानलं जातं, ते म्हणजे गुरु. शिक्षक हा त्या मुलांचा मार्गदर्शक असतो. गुरु व शिक्षक यांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर पूर्वीची शिक्षण प्रक्रिया ही समाजापासून दूर राहून आश्रम व्यवस्थेतून पार पडायची. आजची शिक्षण प्रक्रिया ही समाजात राहून पूर्ण केली जाते. पूर्वी समाजापासून दूर राहून त्या शिष्याला समाजाचे परिपूर्ण शंज्ञान असायचे. आजच्या विद्यार्थ्याला समाजामध्ये राहून, शिक्षण पूर्ण करून, त्याला समाज ज्ञान असेलच याची खात्री देता येत नाही. शिस्त, गुणवत्ता, सदाचार आणि शील यांच्या आचार आचारसंहितेची अपेक्षा करणे व्यर्थ ठरेल. विद्यार्थी ज्ञानासाठी शिक्षण घेत नसून तो परीक्षार्थी बनला. शिक्षण हे साध्य न राहता साधन बनले. म्हणूनच त्याचा वापर एक व्यवसाय म्हणुन होऊ लागला. 


शिक्षक शीलवान, क्षमाशील आणि कर्तव्यदक्ष या मर्यादांमध्ये बांधला गेला. परंतु या सीमा विद्यार्थी- पालक यांनाही लागू होतात. या बाबींचा कोणीही विचार करत नाही. सामाजिक दृष्टिकोनातून आणि राजकीय वर्तुळातून शिक्षकाला नोकर समजतात. कारण, शिकविण्याच्या मोबदल्यात त्याला पगार दिला जातो. प्राचीन काळी देखील गुरूला  शिष्याकडुन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा द्यावी लागत असे. त्यांची अशी मर्यादित सीमांमध्ये बांधिलकी नव्हती किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक ही दिली जात नव्हती. त्यांचं स्थान हे निर्विवाद,मग आजच्या शिक्षकांचे स्थान हे वादाचे का? 

शिक्षक शासन आणि आजचे शैक्षणिक धोरण यांचा विचार केला तर खूप तफावत आपणास दिसून येईल. शाळेवर नियंत्रण व शाळेचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून ग्राम शिक्षण समितीची स्थापना, ही शासनाची भूमिका कौतुकास्पद असली, तरी तिची हुकूमशाही प्रवृत्ती आपणास प्रत्येक गावांमध्ये पहावयास मिळते. ग्रामशिक्षण समिती ही स्वतःचे वास्तव स्वरूप सोडून ती फक्त अधिकारांना महत्त्व देते. स्वतःचे कर्तव्य मात्र विसरते. ग्रामशिक्षण समिती म्हणजे केवळ शाळेच्या कार्यालयातील एक शोभनीय फलकच म्हणावा लागेल. ग्राम शिक्षण समिती चा आणि शाळेचा संबंध किंवा त्यांच्या सभांचा संबंध क्वचितप्रसंगी येताना दिसतो. विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यातील दुवा साधतांना कुठेच दिसत नाही. ग्रामशिक्षण समिती म्हणजे कागदोपत्री, सही  शिक्केनिशी चालणारी देखावाच झाली. 

ग्रामशिक्षण समिती एक दुवा म्हणून चांगले काम करू शकत नसली, तरी ती अधिकाराची जाणीव असलेली एक जिवंत समिती आहे. जेव्हा-केव्हा शाळेला बांधकाम निधी आणि इतर निधी येतो, तेव्हा अध्यक्षांच्या सही शिवाय चेक मोडत नाही. अशा वेळेस अध्यक्षांची भूमिका ही खरोखरच पाहण्यासारखी असते.आलेल्या निधीचा कशाप्रकारे वापर होतो, हे पाहून निर्णय घेण्यापेक्षा त्यामधून चिरीमिरीची अपेक्षा करताना दिसतो. सलोखा झाला तर ठीक नसता गावकऱ्यांचा दबाव आणून मानसिक त्रास देऊन त्या शिक्षकाने एक प्रकारचा गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जातो. निधीचा खर्च ग्रामशिक्षण समिती ने करायचा आणि निर्माण झालेल्या व्यत्ययास शिक्षकास शासनाने जबाबदार. मग याला ग्राम शिक्षण  समितीस जबाबदार का धरू नये ?शिक्षक सर्व योजना हाताळतो का? अध्यक्ष व शिक्षक यांना शासनाने सारखेच जबाबदार धरल्यास दोघेही जिम्मेदारीने आपले काम पार पडतील. सतत वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या भांडणाचा मुद्दा घेतला, तर तो शालेय पोषण आहार, स्थलांतरित विद्यार्थ्यांची वसतीगृह या योजना. योजना राबवताना शिक्षकास, एका सत्वपरीक्षा तून जावे लागते. योजना कोणाच्या मार्फत चालवावी. गावातील गट-तट व राजकारणी शिक्षकास वेठीस धरताना दिसतात. स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी तर गावचा शिक्षण समितीने अक्षरशः शिक्षकाबरोबर भांडणे झालेली सर्वांनी ऐकली आणि पाहिली सुद्धा. शालेय पोषण आहार तयार करणारी स्वयंपाकी महिला नेमणूक ग्राम शिक्षण समिती करते. निवड करून वर्षाच्या आत फेर निवड ठराव मार्फत झालेल्या दिसतात. एवढे करूनही कोणाच्या ना कोणाच्या अहंकाराचा बळी शिक्षकाला स्वतःलाच व्हावे लागते. नोकरी ही त्याच गावात करायची असते. चांगल्यानाही तोंड द्यावे लागते आणि वाईटालाही. हितचिंतक भेटला तर दोन घोट चहाचे पाणी किंवा कर्णसुख आणि विरोधक भेटला तर घृणाच....घृणा.


असं म्हटलं जातं, 'राबणारे हात सुंदर असतात' शासनाचे शैक्षणिक धोरण चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. शासनाची कोणतीही भूमिका ही समाजाच्या  हिताचीच असते. परंतु तिला राबवणारी धूर्त असतात. शैक्षणिक धोरण राबवताना सुविधांचा अभाव व अपेक्षा मात्र उच्चकोटीच्या करणं, ही शासनाची भूमिका पूर्णपणे योग्य आहे असे म्हणता येणार नाही. गुणवत्ता वाढली पाहिजे, मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे,या गोष्टीवर भर दिला जातो. शाळेची जेव्हा तपासणी होते, तेव्हा तपासणी अधिकारी यांच्याकडून लेखी स्वरूपातील गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. वर्गातील वास्तव  गुणवत्तेस अधांतरीच लटकवतात. लेखी स्वरूपातील गुणवत्ता ही शिक्षकांचा आरसा समजला जातो. गुणवत्ता तपासणी विद्यार्थ्यांची असते की शिक्षकांची एक वादग्रस्त ठरू शकते. त्याचबरोबर अनावश्यक शैक्षणिक कामे सांगितली जातात. गावाचे सर्वेक्षण, जनगणना अनावश्यकता टपालामध्ये प्रामुख्याने एस एल एफ नेहमीच असते. अनेक प्रकारची जात निहाय गुणवत्ता विभागणी केली जाते. त्याचबरोबर अनावश्यक 74 रेकॉर्ड रजिस्टर तयार करावे लागतात. एवढं करूनही  एखाद्या शिक्षकाचा कुकर्म सर्व शिक्षकी पेशाच्या माथी मारून समाज मोकळा होतो. त्यात बळी जातो तो सर्व शिक्षकी पेशाचा. हाती येते ती बदनामी. 

समाजातील बदलत चाललेली मानसिकता ही वेळीच सुधारायला हवी. नाण्याच्या दोन बाजूंच्या विचार करायचे सोडून तिसरी बाजू असते याचा विचार करायला समाजाने शिकले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या उत्तम गुणवत्तेसाठी शिक्षकाला शिकविण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही.वेळ खूप महत्त्वाचा आहे. समाजात दुसरा तिसरा कोणी नसून, त्या समाजाची सुरुवात, समाजघटक आपणच असतो. शिक्षक पूर्वीचा नसून तो आधुनिक भारताचा आधारस्तंभ घडवणारा शिल्पकार आहे. माता-पिता,  गुरु- शिष्य,बहिण- भाऊ आणि अतिथी यांचा आदर करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. 'उपदेश करणं सोपं असतं, ते अंगीकार करणं खूप अवघड असतं.' अर्थात "बाप बननं सोप असतं, पालक बनन कठीण " नाण्याची तिसरी बाजू न समजल्यास समाजाचे विध्वंसक  स्वरूप निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

                WRITER#RAHUL DONGARDIVE

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

एक महानायक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर

एक महानायक :डॉ.बाबासाहेब आंबेडकर


जाती-पाती, उच-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, गरीब-श्रीमंत, वर्णभेद अशा भयंकर प्रतिकूल परिस्थितीमध्ये असामान्य व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला. प्राचीन कालखंडापासून आज पर्यंत चालू असलेल्या  कूप्रथांचा ज्यांनी बिमोड केला, ते म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर होय. भारतीय समाजव्यवस्था चार वर्णांमध्ये विभागली गेली होती. ब्राह्मण क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्र वर्णांमध्ये जन्मलेल्या प्रत्येक जातीला नीच जाति म्हणून अस्पृश्य समजले जाई. अस्पृश्य वर्गामध्ये असणाऱ्या सर्व जातींचा स्पर्श सुद्धा पाप समजले जाई. एखाद्या अस्पृश्य समाजातील व्यक्तीचा, स्पृश्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तीला चुकूनही स्पर्श झाला, तर विटाळ समजला जाई. स्पर्श झालेल्या व्यक्तीचे शुद्धीकरण केले जाई. सर्व सामाजिक अधिकारांपासून वंचित असलेला समाज म्हणजे शुद्र वर्ण होय. एवढेच नाही तर या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश सुद्धा नव्हता. शूद्र वर्णातील व्यक्तीने देवाचे दर्शन घेतल्यास, देव सुद्धा अपवित्र होत असे,देवाचेही शुद्धीकरण केले जायचे ! सार्वजनिक पाणवठे त्यांच्यासाठी खुली नव्हती. सर्व खालच्या दर्जाची कामे करावी लागत होती. जमिनीवर थुंकण्याचा अधिकार नव्हता.  मानवतेला काळिमा फासणारे अशा या दयनीय परिस्थितीमध्ये दलित- पददलित, मागास, वर्णव्यवस्थेने अत्यंत गंभीर हाल करून सोडलेल्या समाजाचा मार्गदाता, उद्धारकर्ता, युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेश मधील महू येथे 14 एप्रिल 1891 ला झाला. सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे इंग्रज सरकारच्या महू येथील छावणी मध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते. त्यांना एकूण 14 अपत्य झाली. त्यापैकी आठ जणांचे लहानपणीच निधन झाले. बाळाराम, आनंद,  तुळसा, मंजुळा, गंगा आणि चौदावे अपत्य भीमराव. भीमरावांचा जन्म ज्या जातीत झाला, ती जात " महार". महार या जातीला अस्पृश्य समजले जाई. बालपणा मध्ये खेळण्या-बागडण्याचे दिवस होते. त्याच वेळी ब्रिटिश सरकारने एक निर्णय घेतला.अस्पृश्य वर्गातील सर्व जातीच्या लोकांना ब्रिटिश सेवेतून वगळण्यात आले. स्पृश्यांच्या बाजुने घेतलेला हा  ब्रिटिश कंपनीचा निर्णय होता. नाईलाजाने रामजी सपकाळ यांना महू सोडून सातारा येथे यावे लागले. बालपणातच जातीयतेचे चटके व त्याची गंभीरता भिमराव नी अनुभवली होती. वडिलांवर कबीरपंथाचा प्रभाव होता. रामजी सकपाळ कबीर पंथी भजनामध्ये मग्न होत असत. सहाजिकच सर्व कुटुंब सात्विक होते. अन्याय, अत्याचार, तत्कालीन जातीव्यवस्था या विरोधात सकपाळ उठत असे. भीमराव जसजसे मोठे होऊ लागले, तशी त्यांच्या बुद्धीची प्रगल्भता, तर्क-वितर्क करण्याची पद्धत, न्यायप्रियता, हिंसेला हिंसेने तोंड न देता शांती व संयमाने सोडवणे, हे गुण त्यांच्या बालपणातच प्रकर्षाने जाणवत होते. युक्तिवादामध्ये तर त्यांचा आगळा-वेगळा हातखंडा होता. वयाच्या पाचव्या वर्षी ज्या ठिकाणी आईच्या कुशीत वामकुक्षी काढायची,आईशी लाडाने भांडायचं, बाल हट्ट धरायचा, भावंडांशी मौजमस्ती करायची, वडील आल्यानंतर वडिलांशी तक्रार करायची, पुन्हा आईला घट्ट मिठी मारून सर्व विसरून जायचं,आईच्या मायेने पुन्हा नाहून जायचं. ते छत्र हरवलंं. भिमाबाईचा डोकेदुखीच्या आजारांने 20नोव्हेंबर, 1896 ला घात केला. भीमाबाईच्या निधनानंतर भिमराव एकटे पडले. मातृछत्र हरवले हवालदिल झालेले भीमराव आईच्या आठवणींनं कासावीस होत असत. भीमाबाईच्या निधनानंतर सर्व कुटुंबाची जबाबदारी आत्या मिराबाईवर आली. अत्यंत बिकट परिस्थितीमध्येही मीराबाईने भीमरावांचा लाडाने सांभाळ केला. भीमाबाईच्या निधनानंतर रामजी सकपाळने नातेवाईकांच्या आग्रहाखातर दुसरा विवाह जिजाबाईंशी केला. जिजाबाई च्या आगमनानंतर कुटुंबात थोडासा कलह निर्माण झाला. भीमराव मात्र आपल्या ध्येयापासून कधीही डगमगले नाही. 
भीमराव लहानपणा पासूनच आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी सर्व परिचित होते. 7 नोव्हेंबर 1900 मध्ये, साताऱ्याच्या ,'गव्हर्नमेंट वरनऻक्युलर हायस्कूल' मध्ये प्रवेश घेण्यात आला. अस्पृश्यांसाठी शिक्षण ही त्या काळामध्ये एक अनोखी कल्पना होती. वर्णव्यवस्थेने अस्पृश्यांना शिक्षणाची दारे बंद केली होती. परंतु, ब्रिटीश कंपनीच्या शाळेत त्यांना प्रवेश मिळाला होता. प्रत्येक वर्षी सर्वप्रथम येण्याचा मान भीमरावचा असे. शिक्षण घेत असताना त्यांना जातिव्यवस्थेचे भयानक चटके बसत होते. पावलोपावली त्यांना वर्णव्यवस्थेने बरबटलेली लोक त्रास देत होती. भीमराव कधीही आपल्या ध्येया पासून आणि अभ्यासाच्या व्यासंगा पासुन हटले नाहीत. 1907 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. सकपाळ परिवारामध्ये आनंदाला पारावार उरला नाही. रामजींचा आनंद द्विगुणित झाला होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये बाबासाहेब वर्ण व्यवस्थेतील शूद्र समाजातील मॅट्रिक उत्तीर्ण झालेले पहिले विद्यार्थी ठरले. कुशाग्र बुद्धिमत्तेला प्रेरित होऊन बाबासाहेबांचे शिक्षक असणारे आंबेडकर गुरुजी यांनी त्यांचे उपनाम बाबासाहेबांना दिले. तेव्हापासून भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या सतराव्या वर्षी 1908 मध्ये भीमरावांचा विवाह रमाबाईंशी झाला. विवाहानंतरही त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पदवी शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती. भीमराव  चांगल्या गुणांनी पास झाले. 12 डिसेंबर 1912 मध्ये भीमरावांना पहिले अपत्यप्राप्ती झाली, त्याचे नाव 'यशवंत' असे ठेवण्यात आले. 
यशवंतच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत 2 फेब्रुवारी 1913 ला  वडील रामजी सपकाळ यांचे निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली. वडिलांच्या निधनानंतर भीमरावांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची कृपा झाली. उच्च शिक्षणासाठी भीमराव जहाजाने न्यूयॉर्कला 23 जुलै 1913 ला पोहोचले. कोलंबिया विश्वविद्यालयामधून 1915 मध्ये एम.ए. डिग्री प्राप्त केल्यानंतर 10 जून 1916 मध्ये पीएचडी पूर्ण केली. पीएचडी पदवी त्यांना आठ वर्षानंतर प्राप्त झाली. प्रबंध प्रकाशित करण्यासाठी इतका वेळ लागला, कारण पैशाअभावी प्रबंध प्रकाशित करू शकले नाहीत. प्रबंध प्रकाशित झाल्यानंतर , 1924 ला पीएचडी  पदवी  प्रदान करण्यात आली. एवढ्या शिक्षणावर त्यांचा उदरनिर्वाह खूप चांगला झाला असता. ज्ञानाची भूक असणारा सामान्य माणूस ज्ञानासाठी काय करू शकतो, याची कल्पना करणे न करणे बरे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढील शिक्षणाची आस त्यांना सतावत होती. 1916ला  पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. लंडनमध्ये, 'लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक अंड पोलीटिकल सायन्स' या नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवला भीमराव लंडनला गेले होते. शिष्यवृत्ती अचानक बंद झाल्यामुळे त्यांना मायदेशी परत यावे लागले. हा त्यांच्या जीवनातील अत्यंत दुःखद प्रसंग होता. संकटांनी त्यांना घेरले. अर्धवट शिक्षण सोडून विदेशातून परत यावे लागणे, त्यासारखे दुसरे दुःख नाही. ती सल मात्र त्यांना सारखीच निराश करत होती. लंडनहून परत आल्यानंतर झालेल्या करारानुसार भीमरावांना सैन्य सचिव या पदावर बडोदा संस्थान मध्ये काम करावे लागणार होते. एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना सुद्धा एक विद्याविभूषित व्यक्तीला जातीवादाने सोडले नाही. माठातील पाणी सुद्धा पिऊ दिले नाही. कार्यालयातील फाईल दुरून अंगावर फेकल्या जात असत. भीमरावांच्या मनाची अवस्था अत्यंत दयनीय होत असे. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. तेथील सेवक त्यांना पाणी देत नाही, तेव्हा मात्र ते स्वतः उठून पाणी घेत. जातीच्या चांडाळ चौकटी मध्ये असलेले सहकारी विरोध करत. बडोदा संस्थानातील सहकाऱ्यांच्या चेहर्‍यावरील भाव मुद्रा पाहून, भीमराव शुद्धीकरणाचा संस्कृत मंत्र अस्खलितपणे म्हणत. तेव्हा मात्र सहकारी आश्चर्यचकित होत. सर्व कूटनीतीला कंटाळून बाबासाहेबांनी बडोदा संस्थानचे सैन्य सचिव पद सोडून दिले. सैन्या सचिवपद भीमरावांनी सोडल्यानंतर बडोदा संस्थान चे महाराज सयाजीराव गायकवाड यांना खूप दुःख झाले. 

कौटुंबिक प्रपंच चालवण्यासाठी 1918 मध्ये त्यांनी मुंबई येथील, 'सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स इकॉनॉमिक्स ,' येथे प्रोफेसर म्हणून नोकरी केली. सर्व काही व्यवस्थित असताना भीमराव यांची अर्धवट शिक्षणाची वार्ता कोल्हापूरच्या शाहूमहाराजांच्या कानी पडली. 1920 मध्ये पुढील उच्च शिक्षणासाठी भीमरावांना कोल्हापूर संस्थांद्वारे शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती मंजूर केली. लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक अंड पोलीतिकल सायन्स, या ठिकाणी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी भीमराव लंडनला गेले. त्यावेळची मनाची तळमळ त्यांच्या मनात तीच होती, जेव्हा ते लंडन सोडून भारतात परत आले होते.  जानेवारी 1923 मध्ये डी. एस. सी. ही पदवी प्राप्त केली. 'गेज इन' मधून बॅरिस्टर परीक्षा उत्तीर्ण झाले. आठ वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. अल्पावधीत अनेक विक्रम करणारा जगातील एकमेव व्यक्ती भीमराव ठरले. 3 एप्रिल, 1923 मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स, पिएचडी आणि बॅरिस्टर अशा अनेक पदव्या मिळवून ते भारतात परत आले. ज्ञानसूर्याची हीच विशेषता होती. अल्पावधीतच एवढ्या डिग्री मिळवणारे जगातील एकमेव आणि अद्वितीय भीमराव होते. 
भारतात परत आल्यानंतर विद्वान व्यक्तीला सुद्धा जातीयतेचे  चटके बसतात. मग ज्यांना या ज्ञानाची कसलीच जाण नाही, त्यांच्या अंधश्रद्धेला तर पर्यायच राहिला नव्हता. भीमरावांनी या प्रथेवर आघात करण्याचे ठरवले. त्याकाळामध्ये बोले समितीच्या ठरावाला महाड येथील स्थानिक संस्था व लोक, मान्यता देत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भीमरावांनी त्या विरोधात दंड थोपटून काम केले. 1927 ला दहा हजार अनुयायां सोबत चवदार तळ्या साठी आंदोलन केले. ज्या तळ्यामध्ये पशुपक्ष्यांना संचार करण्यास आणि पाणी पिण्यास मज्जाव नाही तेथे मात्र मानवास प्रखर विरोध, हे भीमरावांना मान्य नव्हते. हजारोंच्या संख्येने काढलेल्या मोर्चाला यशही आले. भीमरावांनी प्रथमतः चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले. गावामध्ये विरोधी लाट पसरली, अस्पृश्यांनी पाणी बाटवले. प्रस्थापित उच्चवर्णीयांनी या मोर्चा वरती लाठ्याकाठ्या ने दगड गोट्यांनी हल्ला चढवला. अनेक लोक जखमी झाले. भीमरावांनी मात्र खूप शांततेने आणि संयमाने प्रत्युत्तर दिले. प्रत्येकाला कोर्टात खेचले, त्यांना न्यायालयामार्फत सजाही दिली. भीमराव जेव्हा कोर्टात एखादा खटला लढवत असत, त्यावेळी परिसरातील नामांकित वकील त्यांचा  युक्तिवाद ऐकण्यासाठी येत असत. वकिली व्यवसाय मध्ये सुरुवातीला ज्यांनी नाकं मुरडली, तीच विरोधी गटाची वकील भीमरावांचा कोर्टातील संवाद ऐकण्यासाठी येत. पुढे ते त्यांचे स्तुतिपाठकही झाले. भीमरावांनी क्रांतीला सुरुवात केली. त्याची सुरुवात चवदार तळ्याच्या आंदोलनाने झाली. 

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळी आणि बाबासाहेबांची आपल्या समाजाला वर्ण व्यवस्थेतून बाहेर काढून समान हक्क देण्यासाठीची तळमळ, त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ब्रिटिश सरकारने गोलमेज परिषदेसाठी भारतीय नेत्यांना बोलावण्यात आले. पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी अनुपस्थित राहिले. परंतु बाबासाहेबांना संधीचे सोने करायचे होते. त्यामुळे त्यांनी गोलमेज परिषदेला महात्मा गांधींचा विरोध असताना हजेरी लावली. महात्मा गांधीजींना ते अजिबात आवडले नव्हते. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आपल्या बांधवांसाठी हक्क आणि स्वतंत्र मतदारसंघ यासाठी खिंड लढवली. गोलमेज परिषद मधील बाबासाहेबांचे भाषण सर्वांसाठी कुतुहलाचे ठरले. इंग्रजांना भारतीय वर्ण व्यवस्थेतील शूद्रांची जाणीव झाली. बाबासाहेबांच्या मागणीला त्यांनी होकार दिला. महात्मा गांधीजीच्या पोटात मात्र पोटशूळ उठला. बाबासाहेबांच्या या मागणीला गांधीजींनी विरोध दर्शवला. एकवीस दिवस फक्त पाण्यावर काढले. गांधीजींची परिस्थिती अत्यंत खालावली, कस्तुरबा गांधीच्या विनंतीला मान देउन बाबासाहेबांनी गांधीजींचे प्राण वाचवले, यालाच आपण 'पुणे करार ' असे म्हणतो. 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जवळील येवला येथील परिषदेमध्ये धर्मांतराची घोषणा करण्यात आली. बाबासाहेब कडाडले-

"मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही ते मात्र माझ्या हातात आहे" 

धर्मांतर करायचे, पण कोणता धर्म स्वीकारायचा, हे स्पष्ट करण्यात आले नव्हते. धर्मांतर हे मात्र अपरिहार्य होते. 

 1942 च्या चले जाव लढ्यानंतर स्वातंत्र्य चळवळीचे वारे जोरात वाहू लागले. स्वातंत्र्य चळवळीने वेग पकडला होता. स्वातंत्र्य मिळणार अशा सर्व अशा, सर्वांच्या मनात पल्लवित झाल्या होत्या. आंदोलनाची धार सरकारने लक्षात घेतली होती. 1939 ला दुसरे महायुद्ध सुरू झाले. या युद्धामध्ये भारतीय सैन्याने ब्रिटीशांच्या बाजूने लढा द्यावा असे ठरले किंबहुना भारतीय सैन्य ब्रिटीशांच्या बाजूने दुसऱ्या महायुध्दात उतरले. आशा होती आपल्याला स्वातंत्र्य मिळणार. दुसरे महायुद्ध 1945 ला संपल्यानंतर भारतातील आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली ज्या स्वातंत्र्याची वाट भारत पाहत होता, तो दिवस उजाडला. भारतीय आंदोलनापुढे ब्रिटिश कंपनी नतमस्तक झाली. 15 ऑगस्ट 1947 ला 'भारत स्वतंत्र' झाला अशी घोषणा ब्रिटिश सरकार कडून करण्यात आली. 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री अर्थात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस चा प्रारंभ, पंडित जवारलाल नेहरू यांचे भाषण लाल किल्ल्यावर झाले. नियतीशी करार हे त्यांचे भाषणाचे सार होते. स्वातंत्र्य मिळाले पण, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या देशाला घटना असावी,असे ब्रिटिश सरकारने सुचवले. घटना निर्मिती साठी विद्वान् माणसाची आवश्यकता भासू लागली, शेवटी ब्रिटिश सरकारला  सुचवावे लागले, एक कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला मसुदा समिती अध्यक्ष व इतर सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. सरदार वल्लभाई पटेल यांना मात्र त्यांच्यावर खूप विश्वास होता. सरदार वल्लभाई पटेल, महात्मा गांधीजींनी बाबासाहेबांना विनंती केली. घटनेचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. घटना निर्मिती प्रक्रिया 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालली. या काळामध्ये एकूण 7353 तक्रारी आल्या त्यापैकी 2473 तक्रारीवर विचार करण्यात आला. जगातील जवळपास पन्नास ते साठ राज्यघटनांचा अभ्यास करून एक परिपूर्ण राज्यघटना निर्माण झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व,आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य  यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले. राज्यघटनेमध्ये मूळ प्रस्ताविक 22 भाग 395 कलमे व आठ अनुसूची असा समावेश होता. संविधान सभा अध्यक्ष यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक परिपूर्ण राज्यघटना सुपूर्द केली, तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. राज्यघटना घटना समितीकडे सुपूर्द केल्यानंतर राज्यघटनेविषयी

डाॅ. बाबासाहेब म्हणतात -

     " मै महसूस करता हूँ कि संविधान ,साध्य है, यह लचीला है, पर साथ इतना मजबूत भी है कि देश को शांति और युद्ध दोनो के समय जोडकर रख सके. वास्तव में, मै कह सकता हूँ कि अगर कभी कुछ गलत हुआ तो इसका कारण यह नही होगा कि हमारा संविधान खराब था, बल्कि इसका उपयोग करने वाला अधम था"

26 नोव्हेंबर 2015 पासून  हा दिवस  संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कालानुरूप आजची घटना 452 कलम, 26 भाग , आणि 12 परिशिष्टे अशी आहे. राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. कारण , 26 जानेवारी 1930 ला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारत स्वतंत्र करण्यात आला होता. ध्वजारोहन करण्यात आले होते. 26 जानेवारी1950 पासून भारतामध्ये संसदीय शासन पद्धति चा अंमल सुरू झाला. 

भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. महिलांच्या अधिकाराबाबत त्यांच्या मनात सारखी चिंता होती. भारतीय महिला सुरक्षित आणि अधिकार संपन्न असावी, म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलाची ची निर्मिती केली. नेहरूंच्या मंत्रिमंडळात मात्र त्या 'हिंदू कोड' बिलला प्रखरतेने विरोध केला. बाबासाहेबाना त्या वेदना असह्य झाल्या. जगाच्या पाठीवर असा एकमेव कायदेमंत्री असेल ज्यांनी स्त्रियांच्या बाबतीतील अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला म्हणून, कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतर झालेल्या निवडणुकीत मात्र बाबासाहेबांचा पराभव झाला.त्यानंतरही ते राज्यसभेचे सदस्य होते.

येवला येथील धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांना खुणावत होती. अनेक धर्मांचा अभ्यास केला.त्याच बरोबर सर्व धर्मप्रमुख बाबासाहेबांना प्रलोभने आणि मन वळवण्याचा प्रयत्न करू लागले. बाबासाहेबांनी सर्व धर्माचा त्याग केला. गाडगे महाराजांनी सांगितलेल्या भारतीय धर्माचा स्वीकार करा,याकडे त्यांचे लक्ष होते. बौद्ध धर्माचा त्यांनी खूप अभ्यास केला. श्रीलंकेला गेल्यानंतर ते आणखीन प्रभावित होते. शेवटी बौद्ध धर्म स्वीकारायचा त्यांनी ठरवले. बौद्ध धर्मामध्ये कोणतीही विषमता नाही, भेद नाही, सर्वांना समान संधी आणि समानता आहे. हे त्यांनी शोधले होते. येवला घोषणेच्या तब्बल वीस वर्षानंतर, सर्वांगाने विचार करुन  बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारायचे ठरवले. 14 ऑक्टोबर, 1956 रोजी नागपूर येथे 5 लाख अनुयाया सोबत 'बौद्ध धर्म' स्वीकारला. घटना निर्मिती प्रक्रिया पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तब्येत सारखी खालावत जात होती. धर्मांतरानंतरही बाबासाहेबांची  तब्येत बिघडत चालली. सवितामाई आंबेडकर  यांनी बाबासाहेबांची खूप काळजी घेतली. सेवक रत्तू बाबासाहेबांच्या सेवेत असायचा बाबासाहेब आता बौद्ध झाले होते रेडिओवरील पंचशील त्रिशरण ऐकून प्रसन्न झाले. मी भारत बौद्धमय करीन हा विचार बाबासाहेबांना पुढे घेऊन जात होता. परंतु, काळाला वेगळेच काही मान्य होतं. इतिहासातील ती काळरात्र डिसेंबर महिन्यात उजाडली.तो दिवस होता 6 डिसेंबर 1956  कोटी कुळांचा उद्धार करता, पालन हार  काळाच्या पडद्याआड गेला. पूर्ण भारतावर शोककळा पसरली. दीनदलितांच्या  दुःखाला सीमा राहिली नाही. बाबासाहेबांचा देह अंतिम दर्शनासाठी दिल्ली येथील निवासस्थानी ठेवण्यात आला, नंतर तो विमानाने मुंबईला आणण्यात आला. मुंबई येथील राजगृह येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला. अंत्यविधीसाठी लाखोंचा जनसमुदाय  मुंबई येथे पोहोचला. राजगृह ते दादर चैत्यभूमी पर्यंत सर्व रस्ते  माणसांनी फुलून निघाले होते. आसवांचे महापूर येत होते. कंठ दाटून येत होता. एक क्रांती रुपी वादळ शमले होते  ज्ञानवंत, प्रज्ञावंत, विश्वरत्न, भारतरत्न चिरनिद्रा घेत शांत झाला होता. कोटि जनांना  हक्कासहित  समाज उद्धाराची नवक्रांती मशाल तेवत ठेवण्यासाठी अनुयायांच्या हाती सोपवली. अन स्वतः ज्ञानाचा अथांग सागर चैत्यभूमीवर विसावला! 
 डॉ. बाबासाहेबांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम  ! ! ! 

              WRITER :
#RAHUL R. DONGARDIVE