गुरुवार, ११ मार्च, २०२१

निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी ( भाग - 6)

 भाग : ०६

अलौकिक शक्ती : विज्ञानाला                 आव्हान! 

प्रत्येक निर्माण होणाऱ्या मार्गदर्शक संताला, महंताला,युगपुरुषाला, कोणत्या ना कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते. सामान्य


माणसाला असामान्य प्रसंगांना भिडताना परिणामांची चिंता मुळात नसतेच. अशा काही घटना असतात की, प्रत्येक विचारवंताला तार्किक सिद्धांतांना, सिद्धांताच्या बाहेर जाऊन विचार करायला लावतात. आपण या गोष्टींना स्पर्शुन जाण्याचा प्रयत्न  करूयात. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांची 'व्यथा' आणि 'गाथा' हे जीवनाचे दोन्ही अंग विचार करायला लावतात. 


संपूर्ण महाराष्ट्रातील कीर्तनकार हे , तुकाराम महाराजांच्या अभंगावर विश्वाचे ज्ञान सांगतात. संत तुकाराम महाराजांना, मंबाजी कडून असाह्य वेदना झाल्या. आवलीला एवढा राग येऊनही, त्या रागावर   सौहर्दतापूर्ण  शांती मिळवून, तिची समज काढणे आणि मंबाजी यांना प्रेमपूर्वक समज, ही अनन्यसाधारण गोष्ट आहे का ? संत तुकाराम कधीही डगमगले नाहीत. त्यांना हवा तो सद्विचार व समाजातील अज्ञान यावर प्रहार करणे सोडले नाही. संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत निवृत्ती या सर्व त्यागी व्यक्ती, नव्हे देवरूपी अंशच! या संत महात्म्यांनी किती त्रास सहन केला, हे सर्व जग जाणते आहे. पण ,त्यांनी त्यांचा मार्ग कधीही बदलला नाही, ना विचार बदलले. 'खरं ते माझं', परंतु 'माझंच खरं ' हा युक्तिवाद कधी त्यांनी केला नाही. हीच संत परंपरा मच्छिंद्रनाथ गड निवासी निगमानंद माऊली आपल्या खांद्यावर घेऊन साकारताहेत. 


सकारात्मक दृष्टिकोन आणि बहुजन सुखासाठीचा कठीण जीवन प्रवास. अंगावर शहारा आणतो. बहुदा माणसास असे आजार होतात की, पूर्वीच्या काळी जडि-बुटी वर बरे होत असायचे. एकदा का असा गंभीर आजार,एखाद्या व्यक्तीला झाला, तर , ती व्यक्ती बरी होत नसे,आणि बरी झाली तर तो आजार पुन्हा होत नसे. दुर्धर आजाराने ग्रासलेल्या व्यक्ती  तर, पुन्हा कधीच दुरुस्त होत नसत. विशेषतः सर्पदंश किंवा जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या आजारावर त्या काळात औषधोपचाराचा शोध बोध नव्हता. यातूनच संक्रमित आजार, माणसांना होत असत. अशा आजाराला बळी पडलेल्या व्यक्ती कोणत्याच औषधानं दुरुस्त होत नसे. एखाद्याला जर का पिसाळलेला कुत्रा किंवा कोल्हा चावला, तर भारत स्वातंत्र्याच्या  अगोदर प्रभावी औषधोपचार नव्हता पिसाळलेल्या प्राण्यांपासून हा आजार (आजचा रेबीज) माणसाला होई . तो माणूस शेवटचा प्रवास करायचा ,हे निश्चित. कल्पनेच्या बाहेरील हा प्रसंग बाबांवर  आला होता. 


बालपणी निगमानंद माऊली एकदा आपल्या मातोश्री बरोबर शेतात जात होते. गावातून आई शेताकडे निघाल्या होत्या. बाळ सीताराम आईच्या पाठोपाठ आनंदाने बागडत, बंधू नरहरी यांच्यासोबत पाऊलवाटेने चालले. दोघांमध्ये एक  स्पर्धाच होती. शिवनापाणीचा जनु आईबरोबर खेळ खेळत होते. आईला थोडं दूर जाऊ द्यायचं, पुन्हा दोन्ही बंधूंनी आईला पकडण्यासाठी धावायचं,आईचं काळीज मोठ व्हायचं! आईच्या पाठी मागून ही भावंडं शेताकडे पोहोचता होती. तोच नियतीने त्या माते बरोबर क्रूर चेष्टा केली. 

 पाठशिवणीच्या या खेळाला रंग आला होता. आनंदाने हास्याच्या ललकारी निघत होत्या.प्रत्यक्षात आनंदाला एक सीमा असते, ती सीमा या बालकांनी ओलांडली की काय ?कारण, नियतीला हा खेळ येथे संपवायचा होता. बंधू नरहरी सोबत बाबा निघाले होते. तेवढ्यात शेतातून एका पिसाळलेल्या कोल्ह्याने बालसीताराम वरती झडप घातली. आनंदाच्या हास्य ललकारींची जागा, क्षणात मरणोपरांत किंचाळ्या मध्ये रुपांतरीत झाली.आईचे तर काळीज फाटले, काय करावे? ते सुचत नव्हत .फक्त मोठमोठ्यानं रडण्याचा त्यांचा असफल प्रयत्न होता. बंधूंनी किंचाळत आई कडे धाव घेतली. दोघेही एका भयंकर क्षणाला सामोरे जात होते. आईच्या हृदयाची ठोके वाढली होती. बंधू नरहरी हतबल होते. आजूबाजूला कोणी दिसत नव्हते. आता काय होईल ? एवढाच त्या भेदरलेल्या जीवांना प्रश्न सतावत होता.अशी दयनीय अवस्था माता शेवंता व बंधू नरहरींची होती. 


मग त्या बालसीतारामांची अवस्था कशी असेल? याचा विचार करणे, वाटते तेवढे सोपे नाही. बंधू आईबरोबर  पाठशिवणीच्या खेळ, एका पिसाळलेल्या कोल्ह्याने बाल सीतारामाना,   पाठी ऐवजी गालावर आक्रमण केले. पिसाळलेल्या कोल्ह्याने बाबां वरती हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये बाल सितारामांच्या गालाला कोल्ह्याने,आपल्या जबड्यात पकडले. बऱ्याच  अंतरावरती फरफटत ओढत नेहले. काय अवस्था झाली असेल ? काय वाटलं असेल ?माता व बंधू यांची मनाची अवस्था कशी झाली असेल? हा भयावह भयंकर प्रसंग, कसा गेला असेल? 

कोल्हा  बालसीतारामाना पुढे ओढत होता. आई व बंधू ओरडत होते, रडत होते, कोल्हा मात्र त्यांना सोडायला तयार नव्हता. क्षणक्षण मृत्यू समान वाटत होता. पण.. बाल सितारामानी त्या कोल्ह्याचा  सामना असा केला की, त्या पिसाळलेल्या कोल्ह्याचा नाईलाज झाला. मेंदू वरती नियंत्रण नसलेल्या कोल्ह्याच्या, अनियंत्रित बुद्धीवर बाल सितारामांनी विजय मिळवला होता. कोल्ह्याने हार मानली होती. शेवटी, गालाला घट्ट पकडलेल्या जबड्याने आपली सैल सोडली व तेथून पळ काढला. गालातून रक्त बाहेर येत होते. आई - बंधू व स्वतःच्या डोळ्यातून आसवं येत होती. आईने बाल सतारामास   कडाडून मिठी मारली, उचलून घेतल. 

शेतात निघालेली आई  कोल्ह्याने घायाळ केलेल्या बालसीतारामास कडेवरती घेऊन गावात आल्या. सर्व गावभर चर्चा सुरू झाली. मायंबाच्या प्रसादवर  कोल्ह्यनं  हल्ला केला. सिताराम आता वाचणार नाहीत. कोल्हा आणि तोही पिसाळलेला! आता कसं होणार ? गालाला बांधलेला कपडा पूर्ण रक्ताने माखला होता. जो तो अनेक प्रश्न निर्माण करत होता. शंका उपस्थित करत होता. परंतु त्या प्रश्नाचे, शंकाचे निरसन करण्याचा कोणी प्रयत्न करत नव्हते. फक्त शंका हाच मूळ विषय बाल सिताराम यांच्याबाबतीत राहिला होता. 

गावातील असं एक कुटुंब नव्हतं ,की त्याने संतोबा च्या घरी भेट दिली नसेल . त्या काळात  प्रगतशील औषधोपचारही नव्हता. जो येई तो कुठला ना कुठला पर्याय किंवा मार्ग दाखवीत. संतोबा सर्वांचे ऐकून घेत. झाडपाल्याचे, आजचे आयुर्वेद. औषध उपचार सुरू झाला.गालावर सूज आली होती.एक डोळा उघडा होता. एक डोळा  सुज आल्यामुळे, जवळपास दिसेनासा झाला. संतोबा व शेवंता आपल्या बाळाच्या जखमेवरती सांगेल तो उपचार करत होते. हळूहळू बाल सीताराम यांना औषधोपचाराने बरे वाटू लागले. सुज पूर्ण कमी झाली. जखमांच्या खुणा राहिल्या. पण ..जखमा भरून निघाल्या. सर्वजण स्वतःच्या मनाला समज देत होते. आई वडिलांच्या मनातील शंकेने काहूर माजवलं होतं. जखमा बऱ्या झाल्या, पण ? ..पिसाळलेल्या कोल्ह्याने बाल  सतारामांना चावा घेतला. आपल्या मुलाला सुद्धा  कोल्ह्याचा आजार होणार. आता या बाळाचं कसं होईल? आपला बाळ व्यवस्थित आयुष्य जगू शकेल का ?आणि दोघांच्या मनात थरररर.. व्हायचं. ते अनपेक्षित सत्य डोळ्यासमोर उभं राहायचं दोघेही अंतर्मुख होत असत. 


आजच्या विज्ञान युगातील आधुनिक डॉक्टर्सना असा चावा घेतलेला व्यक्ती बिना औषधोपचाराने जगू शकेल काय ? या प्रश्नाचे त्यांच्याकडे उत्तर 'नाही' असेच असेल. पण..या आजच्या थोर संताकडे अंगुलीनिर्देश - महंत स्वामी निगमानंद महाराज यांच्याकडे जातो. होय,पिसाळलेल्या कोल्ह्याने जबरदस्त चावा घेऊन सुद्धा, बाबांना काहीच झाले नाही. आज समाजसेवा, समाज कल्याणाच्या ध्यासापोटी, अहोरात्र कार्य करणाऱ्या बाबांच्या शरीरात दैवी अंश! असल्याचा दावा वावगा ठरणार नाही .म्हणजे, विज्ञानवादी दावे खोटे, अस नाही. परंतु , विज्ञानालाही हा विलक्षण अपवाद विचार करायला लावणारा आहे. असे आहेत, तुमचे आमचे श्रद्धास्थान श्री ह भ प स्वामी गुरुवर्य निगमानंद महाराज ! आपणास आजही बाबांच्या चेहऱ्यावरती कोल्ह्याने चावा घेतलेल्या दातांच्या वृंन छटा दिसतील. हीच या योगी साधूची आहे,अलौकिक शक्ती! 

                                                           क्रमशः.... 

               Writer :- RAHUL DONGARDIVE

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा