निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी भाग : 2
:: शीलवान माता-पिता ::
स्वामी निगमानंद महाराज |
पुत्ररत्न प्राप्तीनंतर विठोबा पार्वती हे दांपत्य आनंदाने मायंबाची सेवा करू लागले. उदरनिर्वाह हाही व्यवस्थित चालला होता . कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नव्हती. दररोज कष्ट करून संतराम चं पालनपोषण सुरू होतं . संतराम जसजसा मोठा होत होता, तसे त्यांचे नामांतरण होत होते . कोणी 'संतराम बुवा 'म्हणत असत, तर कोणी 'संतोबा' म्हणून बोलत असत. संतराम पेक्षा संतोबा हे नाव जास्त बोलले जाई .
संतोबा आता मोठा झाला. प्रत्येक आई-वडिलांच्या मनात सामान्य आई वडीला प्रमाणे संतोबाच्या लग्नाचे विचार येत होते. उतारवयातील पुत्रप्राप्तीचा आनंद हा . चातक पक्षाची , पावसाच्या पहिल्या सरीने तृष्णा भागते, तसंच झालं . विठोबा व पार्वती आता संतोबा च्या मुलांच्या अर्थात नातवंडांचे गोड स्वप्न पाहत होते . लग्नाचा विचार मनात सुरू होता . शेवटी ज्या गोष्टीची अपेक्षा होती ती पूर्ण झाली . संतोबा साठी योग्य अशी वधू त्यांना मिळाली . नाव होतं , शेवंता . ठरल्याप्रमाणे संतोबा व शेवंताचा विवाह झाला. निर्विघ्न मंगल सोहळा पार पडला. वंशाला दिवा म्हणून विठोबा पार्वतीचा त्याग व कष्ट यांची जाणीव दोघांच्या मनात सारखीच होती . त्याच वंशाचा 'दिवा 'आज विवाह बंधनात गुंफतांना स्वतःला दे धन्य मानत होते . मायंबाची सेवा मात्र सुरू होती.
मंगल सोहळा पार पडला . शेवंता तशी नवखीच, आई- वडिलांच्या लाडाच्या छायेत वाढलेली. सर्व जरी नवीन असलं , तरी सासू सासरे यांमध्ये स्वतःच्या आई-वडिलांना पाहत होती . ती सासरी आल्यानंतर सर्वांशी मिळून मिसळून वागत होती. माहेरचे सद्गुण पावलोपावली दिसून येत होते. संसाराची अवीट गोडी मात्र जगावेगळी होती . एवढी सद्गुणी सून मिळाली म्हणून ते देवाचे आभार मानत होते . मनातल्या मनात सद्गदित होत होते.
आई-वडिलांप्रमाणे संतोबा व शेवंता आपल्या संसाराला लागले . परंपरेनुसार संतोबा व शेवंतानं संसारा बरोबर मायंबा ची सेवा चालू ठेवली . सेवा अविरतपणे आणि संसार जिद्दीने करायचा , हे सुत्र मनाशी ठेवलं होतं . प्रत्येक स्त्रीसाठी एक जगातील सर्वात मोठा बहुमान असतो. तो म्हणजे 'मातृत्व' ! शेवंताबाई नाही आई ची स्वप्न पडू लागले . कुलवंत भूषण माता जिजाऊंनी स्वराज्याच स्वप्न पाहिलं . कारण त्या स्वतः एक सरदाराची पत्नी होत्या . रयतेचा त्रास त्यांना सहन झाला नाही . म्हणून त्यांनी एक 'राजा' पाहिला . जनतेच्या कल्याणाचा विचार करणारा . आणि 'जनसेवा हीच ईश्वर सेवा', हाच ध्यास बाळगला - अर्थात कल्याणकारी राजा जन्मालाा. नाव त्याचं ' शिवबा!' पण....संसाराचा गाडा हाकताना, अनेक समस्यांना तोंड देता- देता नाकी नऊ यायचे . असा सामान्य संसार तोही गरिबीचा . पण..शेवंताबाई कधीही डगमगल्या नाहीत . सदैव संतोबाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला.
शेवंताबाई ज्याप्रमाणे 'आई' या शब्दासाठी आसुसल्या होत्या . त्या शब्दामागे काठिण्यपातळी व त्यागही होता . देवदैठण ची संपत्ती त्यांना थोडाही स्पर्श करत नव्हती. संतोबा नांदेवालीतच काम करत असायचे. स्वातंत्र्योत्तर काळात देवदैठणहुन संपत्तीच्या नोटिसा येत. पण जेव्हा तेथील इतिहास त्यांच्या लक्षात येई, तेव्हा मात्र त्यांनी देवदैठण च्या संपत्तीचा मोह सोडून दिला. येथे राहायचे आणि देवाची सेवा करायची .एवढेच मणी होत . देवदैठण व तेथील जमीन जुमला संपत्ती ही संकल्पनाच त्यांच्या मनातून निघाली , ती कायमची. कारण ,त्यांना आता मायंबा च्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. येथेच कामे करत असताना, त्यांना पुढे देशमुखाच्या, कूळ कायद्यांतर्गत जमिनी मिळाल्या होत्या.
बिकट परिस्थितीतून ही शेवंताबाई संसार पुढे नेत होत्या . मातृत्वाची अतृप्त भावना मनाला सारखी फुंकर घालत होती . मायंबाची सेवा मात्र अखंडित होती. शेवटी मनातील घालमेल , अस्वस्थता , मातृत्व इच्छा, कुलदीपक याविषयीची भावना , मागणं , मायंबाला बोलली, "देवा मला दोन मुले दे , एक माझ्यासाठी व दुसरा तुझ्या अखंड सेवेसाठी! "
असा नवस किंवा मागणं असाधारण असंच होतं. एक वंशाला कुलदीपक व एक मायंबाजी सेवा करण्यासाठी . बोलण आणि त्यानुसार वागणे ,काही समान्य गोष्ट नव्हती . शेवंताबाईनी निर्धार केला होता. का कुणास ठाऊक ? पण एक असामान्य शक्ती त्यांच्या पोटी जन्माला येणार होती की काय ? या प्रश्नाचे उत्तर त्या मातेलाच माहिती, की ज्यांनी हा संकल्प केला होता.
शेवंताबाईचा नवस , हा त्यांना आधार होता . कालांतराने मायंबा चा प्रसाद त्यांना मिळाला . पहिले मूल जन्माला आले ,आणि तोही मुलगा! संंतोबा शेवंताबाई आनंदाने नाहून गेले. पहिल्या मुलाचे नाव त्यांनी 'नरहरी' असं ठेवलं. शेवंता बाईंना माहित होत नरहरी फक्त माझा आहे . पुढेही मला मुलगाच होणार, तो मात्र , मायंबाचा! पुन्हा अशीच काही वर्ष निघून गेली . शेवंता बाईंना दुसरे पुत्ररत्न झाले. केलेली सेवा, साधना, कष्ट फळाला आले होते . शेवंताबाई थोड्या ही थरथरल्या नाहीत. कारण दुसरे पुत्र् रत्न माझं नसून मायंबा चा सेवक आहे . मी त्याला दान करणार . हे वास्तव त्या विसरल्या नाहीत . दुसऱ्या मुलाचं नाव त्यांनी सिताराम ठेवले. दुसऱ्या रत्नप्राप्तिनंतर त्यांना मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी सावित्रा ठेवले . शेवंताबाई चेेेेेेेेे बहुमोल असे आई बनण्याचे स्वप्न साकारले. देवगुंडेे घराण्याला कुलदीपक मिळाला होता . आता घरात साक्षात गोकुळ अवतरले होते.
फुललेला संसार पाहून संतोबा आणि शेवंताबाई नेटाने काम करत होते. मनोभावे देवाची सेवा तर सुरूच होती. नरहरी थोरला होता . नरहरीला देवाचा नाद ,अध्यात्माची गोडी अत्यंत होती. सिताराम उंचपुरा, रुबाबदार व्यक्तिमत्व ,मत मांडण्याची एक वेगळीच हातोटी होती. प्रत्येक बाबतीत सीताराम! नरहरीला ला मात्र नमते घ्यावे लागत असे. दोन्ही बंधूंच्या छत्रछायेखाली धाकटी बहीण सावित्रा अक्का वाढत होती.
सिताराम ला सर्व मायंबा किंवा बुवा म्हणून आवाज देत असत. बाळ सीतारामांना याचा अर्थ सुरुवातीला समजत नसे. पण जसजसा बालक सिताराम मोठा होऊ लागला, तसे त्या पाठीमागचे गमक त्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यांच्या लक्षात या गोष्टी आल्यानंतर त्यांच्यामुळे स्वभावात बदल जाणवू लागला. त्यांचा करारीपणा , निर्णय क्षमता , बालवयातच भक्कम होती . नरहरी बंधूंना अध्यात्माची गोडी त्यांच्या पेक्षा जास्त होती. पोथ्या पुराणे त्यांच्या अवताच्या दांडीला बांधलेले असायचे . प्रत्येक वेळेला त्यांना संसार सुखातुन मुक्त होऊन भक्तिमार्ग अवलंबावा असेही वाटे. पण. .. सीताराम त्यांना त्यांच्या आईच्या शब्दाची आठवण करून देत असत, - "तुम्हि संसारासाठी, मी मायंबा साठी! " म्हणून सितारामांना गावात मायंबा म्हणूनही बोलत असत.
शेवंताबाई नि ठरल्याप्रमाणे पहिलं मूल स्वतःला , आणि दुसरे मूल मायंबाला! हा संकल्प मोठ्या मनाने पूर्ण केला. सिताराम मायंबा वर सेवेसाठी दिला , नरहरी स्वतःला, त्यांनी स्वतःचा कुलदीपक म्हणून ठेवला. मायंबा च्या सेवेसाठी दिलेला सिताराम हा सामान्य बालक नसून आजचे ते श्री हरिभक्त परायण स्वामी निगमानंद महाराज आहेत.
Writer :
- डोंगरदिवे राहुल
श्री निगमानंद विद्यालय निमगाव , ता.शिरूर
Superb
उत्तर द्याहटवाखूप छान सर खूप अशी काही माहिती साक्षात अनुभवायला मिळाली आणि आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
हटवाVery Nice sir
उत्तर द्याहटवा